शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

भाजपचे ग्राम स्वराज अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 1:44 AM

स्वस्थ आणि समृद्ध भारत निर्मितीसाठी शासनामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी व जनसंपर्क वाढविण्यासाठी भाजपने १४ एप्रिलपासून ग्राम स्वराज अभियान सुरू केले आहे.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांची बैठक : ५ मे पर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वस्थ आणि समृद्ध भारत निर्मितीसाठी शासनामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी व जनसंपर्क वाढविण्यासाठी भाजपने १४ एप्रिलपासून ग्राम स्वराज अभियान सुरू केले आहे. हे अभियान ५ मे पर्यंत राबविले जाणार आहे.१८ एप्रिलला स्वच्छ भारत पर्व अंतर्गत प्रत्येक गावात स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गावासाठी प्रचार, प्रसार, हागणदारीमुक्त गाव सर्वेक्षण करून सूचि/यादी प्रसिद्ध करणे, जनजागृती करणे, शौचालय बांधकामाला गती देणे, २० एप्रिलला उज्ज्वला पंचायत होईल. या अंतर्गत गॅस कनेक्शन वितरण मेळावा तसेच पात्र ग्राहकांची नोंदणी करून अभियानाची जागृती केली जाईल. २४ एप्रिलला पंचायती राज दिवस पाळला जाईल. या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन टीव्हीवर थेट दाखविण्यात येईल. याकरिता गावांमध्ये ग्रामसभेचे आयोजन करून संबोधन ऐकविले जाईल. २८ एप्रिलला ग्रामशक्ती अभियान राबविले जाईल. या अभियानांतर्गत मागास गावात प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री सौभाग्य योजना, जनधन, स्वास्थ्य सुरक्षा मिशन, जीवनज्योती, मातृवंदना योजना आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन केले जाईल. ३० एप्रिलला आयुष्यमान भारत अभियानांतर्गत ग्राम पंचायतींमध्ये राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन व आरोग्य योजनांची माहिती दिली जाईल. २ मे ला किसान कल्याण कार्यशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, ५ मे ला आजिविका व कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत पंतप्रधानांचे थेट संबोधन नागरिकांना ऐकविले जाईल, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी सर्किट हाऊसमध्ये आयोजित बैठकीत दिली.यावेळी आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, बाबुराव कोहळे, प्रशांत वाघरे, भारत खटी, कुथे, विलास गावंडे, स्वप्नील वरघंटे, प्रकाश गेडाम, दामोधर अरीगेला यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपा