शहरं
Join us  
Trending Stories
1
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
2
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
5
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
6
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
7
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
8
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
9
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
10
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
11
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
12
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
13
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
14
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
15
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
16
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
17
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
18
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
19
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
Daily Top 2Weekly Top 5

सरकार करत आहे दडपशाहीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:15 IST

विद्यमान सत्ताधाऱ्यांनी खोटा प्रचार करून देशातील जनतेला मूर्ख बनविले. लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकांना सामोरे जाण्याऐवजी दंडूकेशाहीचा वापर करून ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून देशात सत्ता हस्तगत केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांना मुर्ख बनविले. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचे आरक्षण पूर्ववत केले नाही.

ठळक मुद्देनाना पटोले यांचा आरोप : देसाईगंजात महापर्दाफाश सभा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : सध्या देशात गल्ली ते दिल्लीपर्यंत विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करत अनेक चौकशा लावल्या जात आहे. स्वत: केलेले पाप लपविण्यासाठीच सरकारकडून दडपशाहीचा वापर करून विरोधकांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख, माजी खा.नाना पटोले यांनी केला. या फेकू सरकारची सत्ता उलथवून लावणारच, असा विश्वासही त्यांनी येथील जाहीर सभेत व्यक्त केला.देसाईगंज येथील लाखांदूर मार्गावरच्या सभागृहात बुधवारी काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित महापर्दाफाश सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी आ.आनंदराव गेडाम, प्रदेश पदाधिकारी रवींद्र दरेकर, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, अ‍ॅड.संजय गुरू, जीवन नाट, प्रभाकर तुलावी, भागवत नाकाडे, शीला पटले, मनीषा दोनाडकर, अ‍ॅड.गोविंद भेंडारकर, नगरसेवक आरिफ खानानी आदी आजी-माजी पदाधिकारी मंचावर विराजमान होते.पुढे बोलताना पटोले म्हणाले, विद्यमान सत्ताधाऱ्यांनी खोटा प्रचार करून देशातील जनतेला मूर्ख बनविले. लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकांना सामोरे जाण्याऐवजी दंडूकेशाहीचा वापर करून ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून देशात सत्ता हस्तगत केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांना मुर्ख बनविले. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचे आरक्षण पूर्ववत केले नाही. ओबीसींना त्यांच्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपच्या सरकारने केले आहे, असा आरोप पटोले यांनी केला. ज्या संविधानाच्या भरवशावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्याच संविधानाला जाळण्याचे पाप या सरकारच्या काळात होऊनसुद्धा यातील आरोपी मोकाट आहेत, असा ठपका पटोले यांनी ठेवला. काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास सूरजागड लोहप्रकल्प मार्गी लावून लगतच्या चारही जिल्ह्यातील बेरोजगारांना काम देणार, तसेच शेती सुजलाम सुफलाम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार पटोले यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक अ‍ॅड.संजय गुरू, संचालन परसराम टिकले यांनी तर आभार भूषण अलामे यांनी मानले. सभेला कोरची, कुरखेडा, देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन बिघडलेकाँग्रेसच्या महापर्दाफाश सभा देसाईगंज आणि गडचिरोली येथे आयोजित केल्या होत्या. देसाईगंज येथील सभा दुपारी ३ वाजता तर गडचिरोली येथील सभा सायंकाळी ६ वाजता होणार असल्याचे पदाधिकाºयांनी जाहीर केले होते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील सभांना उशीर झाल्यामुळे काँग्रेस नेते नाना पटोले सायंकाळी ६ वाजता देसाईगंजमध्ये पोहोचले. गडचिरोलीतील सभा ही उशिराने सुरू झाली. विशेष म्हणजे जिल्हा काँग्रेस कमिटीने काढलेल्या निमंत्रणात देसाईगंज येथील कार्यक्रमाचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी आणि शह-काटशहचे राजकारण सुरूच असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस