शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सोने ७४ तर चांदी ८७ हजारांवर; दिवाळीत आणखी भाव वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 15:49 IST

तेजी-मंदी कायम : मागणी-पुरवठ्यातील असंतुलनाचा परिणाम

विलास चिलबुले लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : मागील दोन वर्षांपासून सोने व चांदी खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सोने व चांदीच्या भावातसुद्धा बाजारामध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचे भाव ७४ हजार ३०० रुपये प्रतितोळे, तर चांदीचे भाव ८७ हजार रुपये प्रतिकिलो आहेत. येत्या काही महिन्यांत सण, उत्सव, लग्न पाहता सोने-चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज सराफा बाजारपेठेत व्यक्त केला जात आहे.

मधल्या काळात सोने आणि चांदीच्या भावात तेजी-मंदी होती; परंतु आता पुन्हा सोन्याचे भाव वधारले आहेत. विवाहानंतर सोने आणि चांदीची खरेदी खास करून दिवाळीमध्ये केली जाते. त्यामुळे दिवाळीपर्यंत सोने आणि चांदीच्या भावात आणखी वाढ होऊ शकतो.

बुकिंग फायद्याचे लग्नप्रसंगासाठी गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाकडून सोन्याचे दागिने कमी- अधिक प्रमाणात का होईना खरेदी केले जातात. लग्न समारंभ असतो, ते दिवाळीआधीच सोने-चांदीच्या दागिन्यांचे बुकिंग करतात.

मागणी वाढल्यास पुन्हा वाढू शकतो भाव अर्थशास्त्राच्या नियमानुसार एखाद्या वस्तूची मागणी वाढल्यास भाव वाढतो. त्यामुळे दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ होईल. परिणामी, किमतीतही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोने-चांदीचे भाव काय?महिना                         सोने (प्रति तोळा)               चांदी (प्रति किलो)१ जून                             ७२५००                                   ८५०००१५ जून                           ७१७००                                   ८५९००१ जुलै                             ७१७५०                                   ८४७००१५ जुलै                           ७३०००                                   ८३८०० १ ऑगस्ट                         ७१३५०                                   ८७१००१५ ऑगस्ट                       ७२७००                                   ८६२००२६ ऑगस्ट                       ७४३००                                   ८७०००

"दिवाळीमध्ये ग्राहकांकडून सोने आणि चांदीची खरेदी केली जाते. त्यामुळे भाव तेजीत असतो. त्यामुळे दिवाळीपर्यंत आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे." - अक्षय बेहरे, सराफा व्यावसायिक, आरमोरी.

"सोने-चांदीच्या दरात चढउतार ही नित्याचीच बाब असली तरी मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात दर वाढले. त्यामुळे सोने घेणे सर्वसामान्यांना अवघडच झाले आहे." - पंकज खरवडे, सराफा व्यावसायिक, आरमोरी.

  

टॅग्स :GoldसोनंGadchiroliगडचिरोली