शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

आठवडा संपूनही 40 हजार विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 5:00 AM

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या शैक्षणिक सत्रात सर्वच शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद हाेती.  विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्याचे निर्देश शासनामार्फत दिले हाेते. मात्र अनेक पालकांकडे स्मार्ट फाेन नाही. कनेक्टीव्हीटीचा अभाव आहे. तसेच ऑनलाईन शिकण्याच्या अनेक मर्यादा आहेत. दिवाळीनंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली. पुढील चार महिन्यात परीक्षेचा कालावधी येणार आहे. अशास्थितीत शाळा सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांचे आणखी माेठे नुकसान हाेण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकाेराेनाची भीती कायमच : अपेक्षेपेक्षा विद्यार्थ्यांची वर्गात उपस्थिती कमी

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शासनाच्या आदेशानुसार २३ नाेव्हेंबरपासून जिल्हाभरातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहिजे त्या प्रमाणात वाढत नसल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ४६ हजार ५५० विद्यार्थ्यांपैकी केवळ ६ हजार ९२६ विद्यार्थी उपस्थित आहेत.  उपस्थितीचे प्रमाण १४.८७ टक्के आहे. अजुनही ३९ हजार ६२४ विद्यार्थी शाळेत येत नसल्याचे स्पष्ट हाेत आहे.  काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या शैक्षणिक सत्रात सर्वच शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद हाेती.  विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्याचे निर्देश शासनामार्फत दिले हाेते. मात्र अनेक पालकांकडे स्मार्ट फाेन नाही. कनेक्टीव्हीटीचा अभाव आहे. तसेच ऑनलाईन शिकण्याच्या अनेक मर्यादा आहेत. दिवाळीनंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली. पुढील चार महिन्यात परीक्षेचा कालावधी येणार आहे. अशास्थितीत शाळा सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांचे आणखी माेठे नुकसान हाेण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. पहिल्या दिवशी केवळ पाच टक्के विद्यार्थी उपस्थित हाेते. हळुहळू विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल, असा अंदाज हाेता. मात्र दुसरा आठवडा आता संपण्याच्या मार्गावर आहे. तरीही केवळ १५ टक्के विद्यार्थी हजर आहेत. यातही बहुतांश विद्यार्थी केवळ दहावी व बारावीचे आहेत. नववी व अकरावीचे अनेक विद्यार्थी येत नसल्याची स्थिती आहे.  विद्यार्थी उपस्थितीसाठी पालकाची सहमती आवश्यक केली आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सहमतीपत्र भरवून घेतले जात आहे. मात्र अनेक पालकांनी अजुनही सहमतीपत्र दिले नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बऱ्यापैकी उपस्थिती दिसून येत आहे. मात्र तालुका व जिल्हास्तरावरील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अतिशय कमी आहे. काेराेनाचे संकट अजुनही कायम आहे. त्यामुळे बरेचशे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाही. दिवाळीनंतर काेराेना रूग्णांची संख्या वाढली हाेती. मागील पाच ते सहा दिवसांपासून मात्र रूग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे शिक्षकांनी पालकांना मार्गदर्शन करून त्यांचे मन वळविण्याची गरज आहे. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी