जिल्ह्यात सुगंधी सुपारी व तंबाखूचा व्यापार जोरात
By Admin | Updated: June 21, 2014 23:57 IST2014-06-21T23:57:36+5:302014-06-21T23:57:36+5:30
२००२ मध्ये राज्यातील आघाडी सरकारने गुटखाबंदीची घोषणा केली मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर २०१२ मध्ये याबाबतचा निर्णय सरकारने घेतला व राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या

जिल्ह्यात सुगंधी सुपारी व तंबाखूचा व्यापार जोरात
गडचिरोली : २००२ मध्ये राज्यातील आघाडी सरकारने गुटखाबंदीची घोषणा केली मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर २०१२ मध्ये याबाबतचा निर्णय सरकारने घेतला व राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घातली. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी करून येथे विक्री केली जात आहे. गुटखा बंदी नसताना हे पदार्थ विकण्यासाठी या ठिकाणी वितरक नेमण्यात आले होते. त्यांच्याच माध्यमातून आताही छुप्या मार्गाने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, नांदेड आदी जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात पाठविले जात आहे. सरकारने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची बंदी केल्यानंतर याची वाहतूक व विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे व याची कठोर अंमलबजावणी करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाला दिलेले आहे. मात्र गडचिरोलीतील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी येथील स्थानिक व्यापाऱ्यांशी हात मिळवणी करून आहे. वृत्तपत्राने कारवाईची माहिती मागीतली तरीही व्यापाऱ्यांना फोन करून तशी सूचना या विभागाचे अधिकारी देत असल्याचेही निदर्शनास आले आहे. आरमोरी, वडसा, गडचिरोली, कोरची, कुरखेडा आदी भागात तर स्थानिक स्तरावर कारखाने खोलूनच अशा पदार्थाची विक्री केल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे व्यापारी जादा भावाने या वस्तू बाजारात विकत आहे. बंदीला काहीही अर्थ उरलेला नाही. गडचिरोलीच्या अन्न व औषध प्रशासन विभाग औषधाला कारवाई करावी, अशी थातूरमातूर कारवाई रेकॉर्डकरीता दाखवित आहे, बाकी सर्वत्र आलबेल परिस्थिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)