शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

पिढ्यांवर धम्म संस्कार रूजवा

By admin | Updated: November 15, 2015 00:55 IST

तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म जीवन जगण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. भगवान गौतम बुद्धांची शिकवण समाजापर्यंत पोहोचवून ...

कोठरी येथे वर्षावासाचा समारोप : भंते भगीरथ यांचे उपासक-उपासिकांना आवाहन
घोट : तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म जीवन जगण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. भगवान गौतम बुद्धांची शिकवण समाजापर्यंत पोहोचवून शांतताप्रिय समाज निर्माण करण्याकरिता धम्म संस्कार पुढच्या पिढीवर रूजविण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पेलावी, असे आवाहन भंते भगीरथ यांनी केले.
चामोर्शी तालुक्यातील कोठरी येथील अरण्यवास बुद्ध विहारात आयोजित वर्षावास समापण सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी भंते प्रज्ञानंद, भंते धम्मरक्षित, भंते गुणानंद, भंते बोधीरथ, विदर्भ भिक्कू संघाचे सचिव डॉ. भदंत धम्मसेवक महाथेरो, माताजी सुजाता, माताजी शीलरक्षिता, श्रामणेर प्रवर्तक, श्रामणेर अमोलरत्न, श्रामणेर धम्मदीप, श्रामणेर धम्मरक्षीत, श्रामणेर अनोमदर्शी, श्रामणेर मोगलायन, श्रमण बोधीप्रिय आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना भगीरथ म्हणाले, बौद्ध धम्म हा वैज्ञानिक धम्म आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक धर्माचा अभ्यास केल्यानंतर धम्मदीक्षा घेतली. जगाला आज धम्माच्या शिकवणीची आवश्यकता आहे. बौद्ध धम्माची शिकवण पुढील पिढीकडे संक्रमीत करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. त्यामुळे धम्माचा प्रसार व प्रचार करण्याकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अरण्यवास सोहळ्याच्या कार्यक्रमाला नागपूर, दिल्ली, मुंबई, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून आलेले बहुसंख्य बौद्ध समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)