शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

दिना नदीच्या पाण्यातून धोकादायक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 12:26 AM

दिना नदीवर पूल नसल्याने अनेक नागरिक जीव धोक्यात घालून दिना नदीच्या पाण्यातूनच मार्ग काढतात. पूल बांधण्याची मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील बहुतांश नागरिक जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यासाठी रेगडी-देवदा या मार्गाचा वापर करतात.

ठळक मुद्देपूल निर्मितीची मागणी : एटापल्लीतील नागरिक याच मार्गाने गाठतात जिल्हा मुख्यालय

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : दिना नदीवर पूल नसल्याने अनेक नागरिक जीव धोक्यात घालून दिना नदीच्या पाण्यातूनच मार्ग काढतात. पूल बांधण्याची मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष झाले आहे.एटापल्ली तालुक्यातील बहुतांश नागरिक जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यासाठी रेगडी-देवदा या मार्गाचा वापर करतात. सदर मार्ग अतिशय सरळ आहे. त्यामुळे वेळ व पैसा दोन्हीचीही बचत होते. आलापल्ली मार्गाने गेल्यास १०० रूपये अधिक खर्च येतो व दोन तास उशीर सुध्दा होतो. वेळ व पैशाची बचत करण्यासाठी नागरिक रेगडी-देवदा मार्गे येतात. या मार्गावर दिना नदी आहे. या नदीवर पूल नाही. परिणामी नागरिकांना दिना नदीच्या पाण्यातूनच पुढे मार्गक्रमण करावे लागते. दिना नदीवर बांधलेल्या कन्नमवार जलाशय ओव्हरफ्लो होऊन वाहण्यास सुरूवात झाल्यानंतर या नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढते. मात्र पर्याय नसल्याने नागरिक नदीच्या पाण्यातून प्रवास करतात. कधीकाळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळ्यानंतर कामाला सुरुवातदिना नदीवरील हा पूल अत्यंत महत्त्वाचा असल्याने एटापल्ली व घोट परिसरातील नागरिकांकडून सदर पूल बांधण्याची मागणी वेळोवेळी केली जात होती. याची दखल घेऊन पुलाचे अंदाजपत्रक पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविण्यात आले आहे. पावसाळा झाल्यानंतर पुलाचे सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरूवात होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग चामोर्शीचे सहायक अभियंता नितीन हेडाऊ यांनी दिली आहे.२००९-१० मध्ये पूल निर्मितीसाठी शासनाने अडीच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. हे काम चामोर्शी येथील एका कंपनीला देण्यात आले होते. मात्र नक्षल्यांनी पुलाच्या कामाला विरोध केला. त्यामुळे कंत्राटदाराने काम बंद केले.

टॅग्स :floodपूरriverनदी