शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान

By admin | Updated: August 15, 2016 00:46 IST

गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगलाला लागुन आहेत. वन्यप्राणी शेतामध्ये शिरून पिकांचे नुकसान करीत असल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

आष्टी परिसरातील शेतकरी त्रस्त : बंदोबस्त करण्याची मागणीआष्टी : गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगलाला लागुन आहेत. वन्यप्राणी शेतामध्ये शिरून पिकांचे नुकसान करीत असल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.आष्टी परिसरातील शेतकरी धानपिकाचे उत्पादन घेतात. तर काही शेतकरी धानाच्या पाऱ्यांवर तसेच बांधीमध्ये भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतात. पावसाळ्यामध्ये या परिसरातील शेतकरी शेतामध्ये भेंडी, कारले, चवळीच्या शेंगा, काकडी आदी पिकांचे उत्पादन घेतात. अनेक शेतकऱ्यांचे शेत जंगलाला लागुन आहेत. जंगलातील रानडुक्कर, हरीण व इतर वन्यजीव शेतामध्ये येवून भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान करीत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्रीच्या सुमारास जागल राहणेसुद्धा शेतकऱ्यांना शक्य होत नाही. काही शेतकऱ्यांचा भाजीपाला जंगली प्राण्यांनी फस्त केला असल्याने उत्पादन खर्चही भरून निघणे अशक्य झाले आहे. भाजीपाला पिकाबरोबरच पाळीवर लावलेले तूर, पोपट आदी पिकांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. वन्य जीवांच्या हैदोसामुळे काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पीक लावणे सुध्दा बंद केले आहे. वन्य जीवांकडून शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान होत असल्यास पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी वन विभागावर आहे. शेतकऱ्यांनी सदर बाब वन विभागाला कळविली आहे. वन विभागाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. (प्रतिनिधी)