शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान

By admin | Updated: August 15, 2016 00:46 IST

गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगलाला लागुन आहेत. वन्यप्राणी शेतामध्ये शिरून पिकांचे नुकसान करीत असल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

आष्टी परिसरातील शेतकरी त्रस्त : बंदोबस्त करण्याची मागणीआष्टी : गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगलाला लागुन आहेत. वन्यप्राणी शेतामध्ये शिरून पिकांचे नुकसान करीत असल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.आष्टी परिसरातील शेतकरी धानपिकाचे उत्पादन घेतात. तर काही शेतकरी धानाच्या पाऱ्यांवर तसेच बांधीमध्ये भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतात. पावसाळ्यामध्ये या परिसरातील शेतकरी शेतामध्ये भेंडी, कारले, चवळीच्या शेंगा, काकडी आदी पिकांचे उत्पादन घेतात. अनेक शेतकऱ्यांचे शेत जंगलाला लागुन आहेत. जंगलातील रानडुक्कर, हरीण व इतर वन्यजीव शेतामध्ये येवून भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान करीत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्रीच्या सुमारास जागल राहणेसुद्धा शेतकऱ्यांना शक्य होत नाही. काही शेतकऱ्यांचा भाजीपाला जंगली प्राण्यांनी फस्त केला असल्याने उत्पादन खर्चही भरून निघणे अशक्य झाले आहे. भाजीपाला पिकाबरोबरच पाळीवर लावलेले तूर, पोपट आदी पिकांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. वन्य जीवांच्या हैदोसामुळे काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पीक लावणे सुध्दा बंद केले आहे. वन्य जीवांकडून शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान होत असल्यास पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी वन विभागावर आहे. शेतकऱ्यांनी सदर बाब वन विभागाला कळविली आहे. वन विभागाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. (प्रतिनिधी)