छत्तीसगड सीमेवरची गावे समस्यांच्या गर्तेत

By Admin | Updated: January 31, 2015 23:20 IST2015-01-31T23:20:48+5:302015-01-31T23:20:48+5:30

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत असलेल्या नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील गावांच्या समस्यांकडे सध्या महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. तर दुसरीकडे छत्तीसगड सरकारने आपल्या सीमावर्ती भागात

Chhattisgarh border villages suffer from problems | छत्तीसगड सीमेवरची गावे समस्यांच्या गर्तेत

छत्तीसगड सीमेवरची गावे समस्यांच्या गर्तेत

धानोरा : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत असलेल्या नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील गावांच्या समस्यांकडे सध्या महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. तर दुसरीकडे छत्तीसगड सरकारने आपल्या सीमावर्ती भागात विकास कामे करण्यावर भर देणे सुरू केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील धानोरा तालुक्यातील सावंगा ग्रामपंचायत अंतर्गत येणारी कनेली, मोरचुल, अलकनार ही गावे विविध समस्यांनी ग्रस्त आहेत.
कनेली, मोरचुल व अलकनार या गावात मागील सात-आठ महिन्यांपासून वीज पुरवठा बंद आहे. गावात वीज पुरवठ्यासाठी १४ ते १५ वीज खांबांची गरज आहे. परंतु महावितरण कपंनीकडील चारचाकी शासकीय वाहन नादुरूस्त असल्याने या भागाकडे महावितरणाचे अधिकारी लक्ष देत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. कनेली गावच्या दशरीबाई बाजीराव आतला, मनकीबाई चमरी बोगा, दुर्गेश कश्यप, देऊ चमरू उसेंडी, मनकू बोगा, शेरगा बोगा यांनी १४ आॅगस्ट २०१४ ला प्रत्येकी एक हजार ५० रूपये प्रमाणे डिमांड विजेसाठी बँकेत भरला. साडेपाच महिने लोटले, परंतु त्यांना विजेचा पुरवठा झाला नाही. कनेलीटोला येथे विहीर आहे. परंतु या विहिरीचे पाणी लवकरच संपते त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना एक किमीची पायपीट उन्हाळ्याच्या दिवसात करावी लागते.

Web Title: Chhattisgarh border villages suffer from problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.