विविध मागण्यांसाठी सुभाषनगर येथे चक्काजाम आंदोलन
By Admin | Updated: February 1, 2015 22:56 IST2015-02-01T22:56:06+5:302015-02-01T22:56:06+5:30
स्वतंत्र अहेरी जिल्हा घोषीत करून नवीन तालुके निर्माण करण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेऊन अहेरी जिल्हा कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरीच्या

विविध मागण्यांसाठी सुभाषनगर येथे चक्काजाम आंदोलन
अहेरी : स्वतंत्र अहेरी जिल्हा घोषीत करून नवीन तालुके निर्माण करण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेऊन अहेरी जिल्हा कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरीच्या वतीने रविवारी सुभाषनगर फाटा येथे तब्बल दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
त्यानंतर नायब तहसीलदार सिल्लमवार व किरंगे हे आंदोलनस्थळी पोहोचले. दरम्याना त्यांना अहेरी जिल्हा कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सुभाषनगर येथील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी गावकऱ्यांशी संवाद साधून समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या आंदोलनाचे नेतृत्व अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, प्रा. नागसेन मेश्राम यांनी केले. या आंदोलनात राहूल मडावी, राजू तोरे, अतुल नागुलवार, माधव मांडरे, गणपत देशमुख, मारोती चौधरी, रावजी बट्टे, प्रदीप डोके, मोरेश्वर मुलकलवार, गणपत पोरेड्डीवार, गजानन सोनटक्के, तिरूपती कावठीवार, संतोष चरडे, उमाजी डोके, रमेश मुद्रकोलवार, सुमन देशमुख, वच्छला मंडरे, सावित्री नागुलवार, शोभा चौधरी, विमला डोके, इंदिरा चौधरी, ताणाबाई बट्टे, सुरेश डोके, संदीप चौधरी, बळीराम डोके, उद्धव कुतरमारे, परशुराम डोके, नामदेव नागुलवार, उमाजी हुलके आदीसह सुभाषनगर, जामगाव, चिंतलपेठ, तानबोडी, महागाव, मुत्तापूर आदी गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान मार्गावर वाहनांची रांग लागून तब्बल दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. (प्रतिनिधी)
या मागण्यांसाठी नागरिक रस्त्यावर
निवेदनात स्वतंत्र अहेरी जिल्हा घोषीत करून जिमलगट्टा, जारावंडी, कसनसूर, पेरमिली, आष्टी, आसरअल्ली व कमलापूर आदी तालुके निर्माण करावे ४सुभाषनगर, जामगाव, चिंतलपेठ, तानबोडी येथील नागरिकांना वनहक्काचे पट्टे देण्यात यावे ४तीन पिढ्याची अट रद्द करण्यात यावी ४सुभाषनगर जिलमगट्टा व आलापल्ली भागातील पाणी समस्या निकाली काढावी ४बालापल्ली-अहेरी-कागजनगर असा रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा ४देवलमरी सिमेंट उद्योग व सुरजागड लोहपोलाद उद्योग निर्माण करण्यात यावा ४मुलचेरा येथील चेन्ना सिंचन प्रकल्प त्वरीत सुरू करण्यात यावा ४प्राणहिता नदीवर वांगेपल्ली येथे पुलाचे बांधकाम करावे.