शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

केंद्रीय पथक पूरग्रस्त भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 5:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली/देसाईगंज : केंद्र सरकारच्या पथकाने शनिवारी (दि.१२) गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांशी संवाद । शेतावर जाऊन जाणून घेतली पीकांची दुरवस्था, गावांमध्येही पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/देसाईगंज : केंद्र सरकारच्या पथकाने शनिवारी (दि.१२) गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन आॅगस्टच्या अखेरीस निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना दिलासाही देण्याचा प्रयत्न या पथकाने केला. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, यात खचून न जाता धीर धरा. झालेल्या नुकसानासाठी निकषाप्रमाणे मदत मिळेल, असा विश्वास शेतकऱ्यांना दिला.यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर, आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार दहाट आणि देसाईगंजमधील अधिकाºयांसह संबंधित विभागाचे सर्व विभाग प्रमुख, स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यावेळी उपस्थित होते.शेतकºयांनी आपल्या शेतामध्ये उभे राहून नुकसानाबाबतची माहिती सांगितली. केंद्रीय पथकात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे सहसचिव तथा पथक प्रमुख रमेशकुमार गंटा, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर.बी. कौल व कार्यकारी अभियंता तुषार व्यास यांचा समावेश होता.दौºयाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरणाद्वारे या पथकाला नुकसानाची माहिती देण्यात आली.या पथकाने कनेरी, पारडी, गोगाव, देऊळगाव, ठाणेगाव, देसाईगंजमधील हनुमान वार्ड व सावंगी या ठिकाणी भेट दिली. यादरम्यान पथकाने स्थानिक नागरिकांसोबतही संवाद साधताना घरांचे, जनावरांचे तसेच शेतीमधील पिकांचा, झालेल्या इतर नुकसानाचा मोबदला मिळेल. त्याकरीताच आम्ही येथे आलो असल्याचे सांगितले. नुकसानाची संपूर्ण माहिती ग्रामसेवक, तलाठी तसेच शासनस्तरावरील वरिष्ठ अधिकारी यांना पंचनामा करताना द्यावी, असे त्यांनी सांगितले. देसाईगंज येथील बायपास रस्त्याचे झालेले नुकसान, तसेच सावंगी गावातील घरांची झालेली पडझड, महावितरणचे वीज पुरवठ्याबाबत झालेले नुकसान, शेतीविषयक नुकसान याबाबत त्यांनी सविस्तर पाहणी केली.स्थानिक लोकप्रतिनीधींचा ेपथकातील सदस्यांशी संवादआरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, स्थानिक सभापती, सरपंच यांनी यावेळी गावस्तरावर उपस्थित राहून पथकातील सदस्यांशी संवाद साधला. जिल्हयातील पूरिस्थतीबाबत पथकाला निवेदनातून माहिती सादर केली. जिल्हयातील नागरिकांनी असा विनापावसाचा पूर कधीही पाहिला नाही. गेल्या २५ वर्षापूर्वीच्या पूरापेक्षा हा पूर जास्त मोठा असून जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी त्यांनी पथकाकडे केली.

टॅग्स :floodपूरagricultureशेती