शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

३७१ कक्षांमधील बांबू परिपक्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:15 IST

वन विभागाने केलेल्या पाहणीदरम्यान पेसा क्षेत्रांतर्गत येणाºया २४४ गावांमधील ३७१ कक्षांमधील बांबू तोडण्यासाठी परिपक्व झाला असल्याचा अहवाल पेसा विभागाला सादर केला आहे. जवळपास फेब्रुवारी ते मे या कालावधीत बांबूची तोड केली जाते.

ठळक मुद्दे२४४ गावे : वन विभागाने केले नुकतेच सर्वेक्षण;बांबूविक्रीतून ग्रामसभा बनणार लखपती

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वन विभागाने केलेल्या पाहणीदरम्यान पेसा क्षेत्रांतर्गत येणाºया २४४ गावांमधील ३७१ कक्षांमधील बांबू तोडण्यासाठी परिपक्व झाला असल्याचा अहवाल पेसा विभागाला सादर केला आहे. जवळपास फेब्रुवारी ते मे या कालावधीत बांबूची तोड केली जाते. बांबूच्या माध्यमातून हजारो नागरिकांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होणार आहे.पेसा कायद्यांतर्गत गावाच्या सभोवताल असलेल्या जल, जंगल व जमिनीवर संबंधित ग्रामस्थांना मालकी हक्क बहाल करण्यात आले आहे. या अंतर्गतच मागील तीन वर्षांपासून बांबू व तेंदूपत्त्याची तोड ग्रामसभा करीत आहेत. ग्रामसभांना जरी बांबू तोडण्याचे अधिकार देण्यात आले असले तरी बांबू तोडण्यायोग्य झाला किंवा नाही. याचे तांत्रिक ज्ञान ग्रामसभांना राहत नाही. त्यामुळे वन विभाग स्वत: सर्वेक्षण करून ज्या कक्षातील बांबू परिपक्व आहे. अशा कक्षातील बांबू तोडण्याची परवानगी ग्रामसभांना देते. त्यानंतर ग्रामसभा स्थानिक मजूर व गावकरी यांच्या मदतीने बांबूची तोड करते.२०१७-१८ या वर्षात २४४ गावांमधील ३७१ कक्षांमधील बांबू परिपक्व झाला असल्याचा अहवाल पेसा विभागाला सादर केला आहे. यामध्ये भामरागड व गडचिरोली विभागातील सर्वाधिक क्षेत्र आहे. गडचिरोली विभागातील ९८ पेसा गावांमधील १३३ कक्षांमधील बांबू परिपक्व झाला आहे. भामरागड विभागातील १०४ पेसा गावांमधील १५५ कक्षांमधील बांबू तोडण्यायोग्य झाला आहे. देसाईगंज वन विभागातील ३६ गावांमधील ७६ कक्ष, आलापल्ली वन विभागातील २ गावांमधील ३ कक्ष व सिरोंचा विभागातील ४ गावांमधील ४ कक्षांमधील बांबू तोडण्यायोग्य झाले आहे. धान पिकाची फसल निघाल्यानंतर येथील मजुरांना मजुरीसाठी वनवन भटकावे लागते. काही मजूर मजुरीच्या शोधात दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये किंवा नजीकच्या छत्तीसगड किंवा तेलंगणा राज्यात जातात. मे महिन्यात तेंदूपत्ता हंगाम सुरू होतो. जून महिन्यात शेतीची कामे सुरू होतात. त्यामुळे फेब्रुवारी ते मे हा बांबू तोडण्यासाठी सर्वाधिक योग्य कालावधी मानल्या जातो. या कालावधीत कमी मजुरीत भरपूर मजूर मिळतात. जंगलात तोडलेला बांबू वाहनाच्या मदतीने सहज बाहेर काढता सुद्धा येतो. वन विभागाच्या परवानगीनंतर आता बांबू तोडण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे.बांबू विक्रीतही दलालांकडून लूटपर्याय दोन निवडलेल्या ग्रामसभांना पेसा कायद्यानुसार बांबू तोडून ते विक्रीचे अधिकार आहेत. मात्र बाजारपेठेचे ज्ञान नसल्याने तेंदूप्रमाणेच बांबू सुद्धा दलालांच्या मार्फत विकले जातात. बराचसा पैसा दलाल व व्यापारी हडपत असल्याने ग्रामसभांची लूट होत आहे. ही बाब वन विभागाच्या अधिकाºयांना माहित असली तरी प्रत्यक्ष ते हस्तक्षेप करू शकत नाही. दलाल व व्यापारी गावातील काही निवडक नागरिकांना हाताशी धरून सौदा करीत असल्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे ग्रामसभेची लूट होत आहे.ग्राम पंचायतींकडे दोन पर्यायतेंदूपत्ताप्रमाणेच ग्रामसभांना एक व दोन पर्याय निवडण्याची संधी वन विभागाने दिली आहे. यासाठी संबंधित ग्रामसभांकडून ठराव मागितले जात आहेत. पर्याय दोनची निवड केलेल्या ग्रामसभा स्वत:च बांबूची तोड करून वाहतूक व विक्री करणार आहेत. यासाठी संबंधित वन परिक्षेत्राधिकारी तांत्रिक मार्गदर्शन करतील. पर्याय एकची निवड केलेल्या ग्रामसभांच्या बांबूची तोड व विक्रीची कार्यवाही वन विभागाच्या मार्फत केली जाणार आहे. वन विभाग खर्च वगळता उर्वरित रक्कम संबंधित ग्रामसभेला देणार आहे.

टॅग्स :Bambu Gardenबांबू गार्डन