शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शिपाई वगळता सर्वच कर्मचारी निलंबित, रिकाम्या कार्यालयास लावले टाळे

By संजय तिपाले | Updated: August 28, 2023 15:37 IST

अहेरीत उपविभागीय अधिकाऱ्यांचा दणका, कामचुकारांना घडवली अद्दल

गडचिरोली : शासकीय काम अन् सहा महिने थांब... ही म्हण प्रसिद्ध आहे. अहेरी येथील उपविभागीय कार्यालयातील लोकांचा अनुभव देखील असाच काहीसा असल्याची ओरड होती. उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी वारंवार तंबी देऊनही कामकाजात सुधारणा न झाल्याने अखेर शिपाई वगळता नायब तहसीलदारांसह एकूण दहा कर्मचाऱ्यांना निलंबित करुन कार्यालयास टाळे लावले. २८ ऑगस्टला ही बेधडक कारवाई करुन उपविभागीय अधिकाऱ्यांनी कामचुकारांना अद्दल घडवली. 

अहेरी हे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे गाव आहे. येथील उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी दफ्तर दिरंगाईबाबत कर्मचाऱ्यांना ताकीद दिली होती, पण सोपविलेली कामे वेळेत न करणे, अनेक अर्ज व प्रकरणे प्रलंबित ठेवणे, वरिष्ठांचे आदेश न पाळणे असे प्रकार सुरुच होते, त्यामुळे लोकांमधून तक्रारी वाढल्या हाेत्या. या पार्श्वभूमीवर २८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता वैभव वाघमारे हे कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने नायब तहसीलदारांसह एकूण १० कर्मचाऱ्यांचा निलंबनाचे आदेश तयार केले व शिपायामार्फत ते बजावले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना घराचा रस्ता दाखविण्यात आला. शिपाई वगळता सर्वच कार्यालय रिकामे झाल्यावर कार्यालयास टाळे लावण्यात आले. सध्या वैभव वाघमारे हे आपल्या दालनात एकटेच असून बाहेर शिपाई आहे.

कर्तव्यात कुचराई केल्याने शिपाई वगळता सर्वच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात नायब तहसीलदारांचा समावेश आहे. वारंवार सूचना देऊनही कामकाजात सुधारणा न केल्याने ही कारवाई केली आहे.

- वैभव वाघमारे, उपविभागीय अधिकारी, अहेरी

टॅग्स :Employeeकर्मचारीsuspensionनिलंबनaheri-acअहेरीGadchiroliगडचिरोली