शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

दारू-तंबाखूमुक्ती महिलांमुळेच शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST

मुक्तिपथ तालुका कार्यालयाच्या वतीने चामोर्शी येथील नगर पंचायत सभागृहात शनिवारी व्यसनमुक्ती संमेलन घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, पंचायत समिती सदस्य उषाताई सातपुते, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देडॉ.अभय बंग यांचे प्रतिपादन : चामोर्शी येथे तालुकास्तरीय व्यसनमुक्ती संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : जिल्ह्यातील दारूबंदीसाठी १९८७ पासून सुरू झालेल्या आंदोलनात चामोर्शी तालुका सुरुवातीपासूनच सक्रिय होता. कारण येथील लोकांना दारूबंदी हवी होती. महिलांचा या आंदोलनात पुढाकार होता. त्यामुळे शासनावर दबाव वाढून १९९३ पासून गडचिरोली जिल्ह्यात शासकीय दारूबंदी लागू झाली. तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात सुरू झालेल्या मुक्तिपथ अभियानाने या दारूबंदीला बळ दिले. या अभियानात सहभागी झालेल्या चामोर्शी तालुक्यातील महिला दारूबंदीसाठी संघर्ष करीत आहेत. तब्बल ८९ गावांतील महिलांनी विक्री बंद केली आहे. त्यामुळे आमचा पद्मश्री पुरस्कार अशाच धाडसी महिलांचा व गाव संघटनांचा आहे, असे प्रतिपादन मुक्तिपथ अभियानाचे संस्थापक डॉ.अभय बंग यांनी केले.मुक्तिपथ तालुका कार्यालयाच्या वतीने चामोर्शी येथील नगर पंचायत सभागृहात शनिवारी व्यसनमुक्ती संमेलन घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, पंचायत समिती सदस्य उषाताई सातपुते, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर आदी उपस्थित होते.डॉ. अभय बंग म्हणाले, राज्यातच नाही तर देशातही स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना आपण वारंवार ऐकतो. या घटनांमध्ये एक साम्य आढळते. हिंसा करताना आरोपी हा दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे हे हिंसाचार थांबवायचे असेल तर दारुला नाही म्हणणे आवश्यक आहे. चामोर्शी तालुक्याच्या ८९ गावांनी ही हिम्मत दाखवली आहे. यामध्ये त्यांचा संघर्ष, दारूबंदीसाठी असलेली तळमळ या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्यामुळे ही गावे आणि येथील महिला व पुरुष अभिनंदनास पात्र आहेत, असे बंग म्हणाले. चामोर्शी तालुका संघटक आनंद इंगळे, उपसंघटक रूपेश अंबादे, प्रेरक विनायक कुनघाडकर, जितेंद्र कुनघाडकर यांनी संपूर्ण संमेलनाचे यशस्वी नियोजन केले.७२ गावांतील ३३७ महिला व पुरुष यावेळी उपस्थित होते.खºर्याचे भूत उतरवणे गरजेचेदारूबंदीसाठी गावागावातील महिलांचा संघर्ष सुरूच आहे. पण खर्रा या पदार्थाचे व्यसन सर्वांच्या मानगुटीवर बसलेले आहे. पुरुषांसोबतच स्त्रिया आणि लहान मुलेही या व्यसनाच्या आहारी जात आहेत. यातून पानठेलाधारकांचे घर भरते पण या बदल्यात जिल्ह्यातील लोकांना तोंडाचा कॅन्सर, लकवा, रक्तदाब असे आजार मिळतात. खर्रा या विषारी पदार्थाचे भूत उतरवून त्याची सवय सोडणे गरजेचे आहे असे डॉ. बंग म्हणाले.यात्रा तंबाखूमुक्त करूविदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले मार्र्कंडादेव मंदिर चामोर्शी तालुक्यात आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही जत्रा मुक्तिपथ, मार्र्कंडा येथील गावकरी, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने दारू आणि तंबाखूमुक्त केली आहे. यंदाही ही यात्रा दारू व तंबाखूमुक्त करायची असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :liquor banदारूबंदी