शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

स्थानिक परिस्थितीनुसारच पोषण आहारात हवा बदल; आदिवासी बालकांना केंद्रस्थानी ठेवायला हवे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 2:08 AM

आदिवासीबहुल भागात गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेखाली ताज्या जेवणाची व्यवस्था केली जाते; पण त्यासाठी दुर्गम भागात भाजीपाला उपलब्ध होत नाही.

- मनोज ताजनेगडचिरोली : बालकांचे कुपोषण टाळण्यासाठी सरकारकडून विविध योजनांवर महिन्याकाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. तरीही कुपोषण पूर्णपणे संपणे दूरच, त्याचे प्रमाणही कमी होताना दिसत नाही. सरकारी योजनांची आखणीच चुकीच्या पद्धतीने होत असल्यामुळे हे सारे घडत आहे.ज्यांच्यासाठी योजना आखली जाते ते याचा लाभ घेण्यासाठी कितपत समर्थ आहेत, याचा सारासार विचार न करता योजना लादली जाते. वास्तविक कुपोषणाचे प्रमाण जास्त असणाऱ्या भागातील भौगोलिक व सामाजिक परिस्थितीनुसार पोषण आहारात योग्य तो बदल केल्यास आणि अंमलबजावणी यंत्रणेच्या कार्यपद्धतीत योग्य ती सुधारणा केल्यास परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही, असे तज्ज्ञांना वाटते.शहरी भागांपेक्षा आदिवासीबहुल आणि भौतिक सुविधांपासून दूर असणाºया भागांत कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. या भागातील आदिवासी बालकांना केंद्रस्थानी ठेवून योजना आखणे गरजेचे आहे. ही बालके सरकारने पाठविलेला पाकीटबंद आहार खातच नाहीत. पोषक घटक असलेला कोणत्या पद्धतीचा स्थानिक आहार ते खाऊ शकतात, याचा विचार करून मगच त्यांचा आहार निश्चित करणे गरजेचे आहे.आदिवासीबहुल भागात गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेखाली ताज्या जेवणाची व्यवस्था केली जाते; पण त्यासाठी दुर्गम भागात भाजीपाला उपलब्ध होत नाही. त्यावर उपाय म्हणून अंगणवाडीच्या परिसरातच परसबाग फुलवून भाजीपाल्याची व्यवस्था करता येऊ शकते. गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यामधील काही अंगणवाड्यांत हा प्रयोग गेल्या वर्षी झाला; पण उन्हाळ्यात या परसबागा सुकून गेल्या. त्याला सरकारी पाठबळ मिळायला हवे.कुपोषणाची स्थिती अतिशय गंभीर असणा-या भागांमध्ये अधिकाऱ्यांपासून तर अंगणवाडीतील मदतनिसापर्यंत कोणतेही पद रिक्त राहणार नाही, याची खबरदारी घेतली गेली पाहिजे.याशिवाय या योजनांसाठी जो निधी लागतो, त्याकडे दुर्लक्ष किंवा त्यात अंतर पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जानेवारी ते एप्रिल या काळात अनेक ठिकाणी अमृत आहार योजनेचे पैसेच आले नाहीत. त्यामुळे गरोदर-स्तनदा मातांना आहार मिळू शकला नाही.दुर्गम भागांमधील गावांत पोहोचण्यासाठी बारमाही रस्तेच नाहीत. अशा गावांमध्ये पोषण आहाराची स्थिती जाणून घेण्यासाठी राज्य सरकारचे अधिकारीही जाऊ शकत नाहीत. गर्भवती महिला किंवा बालकांची प्रकृती बिघडली, तर त्यांना उपचारांसाठी रस्त्यांअभावी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातही नेणे अवघड वा अशक्य होते. यातून काही वेळा बालके आणि अनेक वेळा गरोदर मातांनाही आपला जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी बारमाही सुरू राहणाºया पक्क्या रस्त्यांची निर्मिती होणे गरजेचेआहे.पाळणाघरे पुन्हा सुरू करादुर्गम भागांत रोजगाराच्या निमित्ताने कुटुंबातील सर्वांनाच घराबाहेर पडावे लागते. अशावेळी छोट्या मुलांना सांभाळण्यासाठी आधी केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून ठिकठिकाणी पाळणाघरे होती; पण दोन वर्षांपूर्वी केंद्राने पाळणाघरांची जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवली. राज्य सरकारने ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ढकलली. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांनीही त्याकडे लक्ष दिले नाही. परिणामी, राज्यभरातील १,२०० पेक्षा अधिक पाळणाघरे बंद पडली आहेत. ही पाळणाघरे पुनरुज्जीवित केल्यास हजारो बालकांची आबाळ दूर होईल.बायोमेट्रिक हजेरी हवीग्रामीण आणि दुर्गम भागांत सरकारी यंत्रणेच्या कामात पारदर्शकता नाही. एकमेकांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा प्रामाणिकपणे काम करण्याऐवजी निधीच्या गैरव्यवहारात वाटेकरी होतात.हे टाळण्यासाठी लाभार्थ्याची बायोमेट्रिक हजेरी किंवा यासारखे इतर काही उपाय करणे गरजेचे आहे.अंगणवाडीच्या रजिस्टरमध्ये नमूद असलेल्या लाभार्थ्यांना आपल्यासाठी काय-काय योजना आहेत हेही माहीत नसते. योजनांच्या जनजागृतीची जबाबदारी काही सामाजिक संस्थांवरही दिली जाऊ शकते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली