शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

यावर्षी १ कोटी ९ लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:17 AM

येत्या पावसाळ्यात राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १ कोटी ९ लाख रोपट्यांच्या लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यासाठी वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग जोमाने तयारीला लागला आहे. दोन्ही विभाग मिळून ८२ हजार रोपे तयार आहेत.

ठळक मुद्दे८२ लाख रोपटे तयार : सागवानासह विविध फळ आणि फुलझाडांच्या रोपट्यांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या पावसाळ्यात राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १ कोटी ९ लाख रोपट्यांच्या लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यासाठी वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग जोमाने तयारीला लागला आहे. दोन्ही विभाग मिळून ८२ हजार रोपे तयार आहेत. आणखी काही रोपांची निर्मिती केली जाणार आहे.येत्या १ जुलैपासून शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत रोपट्यांची लागवड सुरू होणार आहे. १ कोटी ९ लाखांच्या उद्दीष्टापैकी सर्वाधिक ५७ लाख रोपटे लागवडीचे उद्दिष्ट वनविभागाला आहे. महाराष्टÑ वनविकास महामंडळाला २४ लाख ७४ हजार, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना १४ लाख ५९ हजार, सामाजिक वनीकरण विभागाला ६ लाख तर शासनाच्या इतर विभागांना ७ लाख २६ हजार वृक्षारोपण करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.सदर वृक्षारोपण मोहिमेसाठी ग्रामपंचायतींना मोफत रोपे दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे रोपे ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचवून देण्याचा खर्चही वनविभाग करणार आहे. यावर्षी वृक्षारोपण केल्या जाणाऱ्या भागाला तारांचे कुंपण लावले जाणार आहे. त्यामुळे खर्चात ४ ते ५ पटींनी वाढ झाली आहे. सध्या वृक्षारोपणासाठी वनविभागाकडे जवळपास ७५ लाख रोपे तर सामाजिक वनीकरण विभागाकडे ७ लाख ४० हजार रोपे तयार आहेत. त्यात सागवान, जांभूळ, सीताफळ, बांबू, फणस, गुलमोहर, पेरू, निलगिरी अशा रोपट्यांचा समावेश आहे. रोपे तयार करण्याची सुरूवात नोव्हेंबर महिन्यातच होते. त्यामुळे कोणत्या विभागाला कोणत्या झाडांची रोपे हवी त्याची मागणी तेव्हाच कळली तर तशी रोपे तयार करणे शक्य होते, पण ती माहिती आधी कळविली जात नसल्याची खंत विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.नैसर्गिकरीत्या उगवणाºया ३६ लाख झाडांचे संगोपन करणारवनविभागाला यावर्षी ५७ लाख रोपटे लागवडीचे उद्दिष्ट असले तरी या विभागाकडे तेवढी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे प्रत्यक्षात ३० लाख खड्डे करून रोपटे लावली जातील. उद्दिष्टातील उर्वरित २७ लाख झाडे नैसर्गिकरीत्या उगवणाºया रोपट्यांच्या संगोपनातून विकसित केली जाणार आहेत. वनविकास महामंडळाला २३.७४ लाख रोपटे लागवडीचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १५ ते १६ लाख खड्डे केले जाणार असून उर्वरित झाडे नैसर्गिकरित्या उगवणाºया रोपट्यांमधील विकसित केली जाणार आहेत. त्यामुळे वृक्षारोपणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्यक्षात ७३ लाख रोपांचीच गरज भासणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग