शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘उन्नत भारत’ने ग्रामीण भागाशी जोडली विद्यार्थ्यांची नाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:59 IST

केंद्र शासनाच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयामार्फत उन्नत भारत हा अभियान राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाच गावांमधील कुटुुंबांचे सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे.

ठळक मुद्देमुनघाटे महाविद्यालयाचा उपक्रम : पाच गावांचा सर्वे करून अहवाल शासनाकडे सादर

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : केंद्र शासनाच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयामार्फत उन्नत भारत हा अभियान राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाच गावांमधील कुटुुंबांचे सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाण होण्यास मदत झाली आहे.महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी व्हावा. त्याबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नाळ या माध्यमातून ग्रामीण भागाशी जोडण्यास मदत होईल. या उद्देशाने शासनाने उन्नत भारत हा अभियान सुरू केला आहे. या अभियानासाठी कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे.उन्नत भारत अभियानाची सुरूवात करण्यासाठी महाविद्यालयाने कुरखेडा तालुक्यातील पाच गावांची निवड करून मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. निवडलेल्या पाच गावांमध्ये नवरगाव(आंधळी), नान्ही, धमदीटोला, जांभूळखेडा व येरंडी यांचा समावेश आहे. यासाठी महाविद्यालयाने समन्वयक म्हणून प्रा. डॉ. दीपक बन्सोड, सह-समन्वयक म्हणून प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. अमित रामटेके, प्रा. डॉ. गुणवंत वडपल्लीवार, प्रा. डॉ. रवींद्र विखार, प्रा.संजय महाजन व प्रा. राखी शंभरकर यांची नियुक्ती केली आहे.पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाने निवड केलेल्या पाचही गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर प्रश्नावलीच्या माध्यमातून गावात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, ग्रामस्थांना झालेला लाभ, ग्रामीण समस्या, आर्थिक स्तर, कुटुंबाची संपूर्ण माहिती याची माहिती गोळा करण्यात आली.ग्रामीण भागात प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव, कष्टदायी जीवन, पिण्याच्या पाण्याची समस्या, शेतीतील अडचणी, प्राथमिक शिक्षणाची दुरावस्था, गावात जाण्यासाठी रस्त्याचा अभाव, रोजगाराचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना दारिद्र्यात जीवन जगावे लागत आहे. या सर्व विपरित परिस्थितीमुळे युवक वर्गाचा ओढा शहराकडे वाढत चालला आहे. परिणामी ग्रामीण भाग ओस पडत चालला आहे. याचे दुरगामी परिणाम भविष्यात शहर व ग्रामीण भागातील जनतेलाही भोगावे लागणार आहेत. ग्रामीण भाग सक्षम झाल्यास शहरात येणारे युवकांचे लोंढे थांबविण्यास मदत होईल, यासाठी सर्वप्रथम समस्यांची जाण होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने उन्नत भारत हा अभियान राबविला जात आहे.विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालाचे मूल्यांकन झाल्यानंतर त्यानुसार ग्रामीण भागासाठी योजना राबविण्यास शासनाला मदत होणार आहे.मोजक्याच महाविद्यालयांची निवडउन्नत भारत अभियानासाठी केंद्र शासनाच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयामार्फत देशातील मोजक्या २५० महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाची निवड झाली आहे. विशेष म्हणजे गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून या अभियानासाठी निवड झालेले हे एकमेव महाविद्यालय आहे.उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी ग्रामीण भागाच्या समस्यांचे निराकरण करणारे दूत ठरणार आहेत. शासनाच्या विविध योजना ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या विकासात हातभार लावण्याकरिता श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय प्रयत्नशील आहे.- डॉ.राजाभाऊ मुनघाटे, प्राचार्य, श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय, कुरखेडा