शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘उन्नत भारत’ने ग्रामीण भागाशी जोडली विद्यार्थ्यांची नाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:59 IST

केंद्र शासनाच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयामार्फत उन्नत भारत हा अभियान राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाच गावांमधील कुटुुंबांचे सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे.

ठळक मुद्देमुनघाटे महाविद्यालयाचा उपक्रम : पाच गावांचा सर्वे करून अहवाल शासनाकडे सादर

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : केंद्र शासनाच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयामार्फत उन्नत भारत हा अभियान राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाच गावांमधील कुटुुंबांचे सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाण होण्यास मदत झाली आहे.महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी व्हावा. त्याबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नाळ या माध्यमातून ग्रामीण भागाशी जोडण्यास मदत होईल. या उद्देशाने शासनाने उन्नत भारत हा अभियान सुरू केला आहे. या अभियानासाठी कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे.उन्नत भारत अभियानाची सुरूवात करण्यासाठी महाविद्यालयाने कुरखेडा तालुक्यातील पाच गावांची निवड करून मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. निवडलेल्या पाच गावांमध्ये नवरगाव(आंधळी), नान्ही, धमदीटोला, जांभूळखेडा व येरंडी यांचा समावेश आहे. यासाठी महाविद्यालयाने समन्वयक म्हणून प्रा. डॉ. दीपक बन्सोड, सह-समन्वयक म्हणून प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. अमित रामटेके, प्रा. डॉ. गुणवंत वडपल्लीवार, प्रा. डॉ. रवींद्र विखार, प्रा.संजय महाजन व प्रा. राखी शंभरकर यांची नियुक्ती केली आहे.पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाने निवड केलेल्या पाचही गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर प्रश्नावलीच्या माध्यमातून गावात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, ग्रामस्थांना झालेला लाभ, ग्रामीण समस्या, आर्थिक स्तर, कुटुंबाची संपूर्ण माहिती याची माहिती गोळा करण्यात आली.ग्रामीण भागात प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव, कष्टदायी जीवन, पिण्याच्या पाण्याची समस्या, शेतीतील अडचणी, प्राथमिक शिक्षणाची दुरावस्था, गावात जाण्यासाठी रस्त्याचा अभाव, रोजगाराचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना दारिद्र्यात जीवन जगावे लागत आहे. या सर्व विपरित परिस्थितीमुळे युवक वर्गाचा ओढा शहराकडे वाढत चालला आहे. परिणामी ग्रामीण भाग ओस पडत चालला आहे. याचे दुरगामी परिणाम भविष्यात शहर व ग्रामीण भागातील जनतेलाही भोगावे लागणार आहेत. ग्रामीण भाग सक्षम झाल्यास शहरात येणारे युवकांचे लोंढे थांबविण्यास मदत होईल, यासाठी सर्वप्रथम समस्यांची जाण होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने उन्नत भारत हा अभियान राबविला जात आहे.विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालाचे मूल्यांकन झाल्यानंतर त्यानुसार ग्रामीण भागासाठी योजना राबविण्यास शासनाला मदत होणार आहे.मोजक्याच महाविद्यालयांची निवडउन्नत भारत अभियानासाठी केंद्र शासनाच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयामार्फत देशातील मोजक्या २५० महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाची निवड झाली आहे. विशेष म्हणजे गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून या अभियानासाठी निवड झालेले हे एकमेव महाविद्यालय आहे.उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी ग्रामीण भागाच्या समस्यांचे निराकरण करणारे दूत ठरणार आहेत. शासनाच्या विविध योजना ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या विकासात हातभार लावण्याकरिता श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय प्रयत्नशील आहे.- डॉ.राजाभाऊ मुनघाटे, प्राचार्य, श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय, कुरखेडा