शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शेतकरी अपघात विम्याचे ९९ प्रस्ताव प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST

शेतकऱ्याच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सदर योजनेच्या अंमलबजावणीची गती मंदावली असून ही योजना जाचक अटी व शर्तीत सापडल्यामुळे गेल्या तीन वर्षातील एकूण ९९ प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देप्रक्रियेत गती नाही : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतीची कामे करताना विविध प्रकारचे अपघात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो. अशा मय्यत शेतकऱ्याच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सदर योजनेच्या अंमलबजावणीची गती मंदावली असून ही योजना जाचक अटी व शर्तीत सापडल्यामुळे गेल्या तीन वर्षातील एकूण ९९ प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.सन २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत सदर योजनेअंतर्गत जिल्हाभरातून एकूण १७५ प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यापैकी ५० प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विविध त्रुटींमुळे २६ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. सद्य:स्थितीत विमा कंपनीकडे तीन वर्षाचे मिळून एकूण २० प्रस्ताव प्रलंबित आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालय व वारसदाराकडे मिळून एकूण ७९ प्रस्ताव प्रलंबित आहेत. सन २०१६-१७ या वर्षात विमा कंपनीकडे ८ व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे १० प्रस्ताव प्रलंबित आहेत. २०१८-१९ या वर्षात विमा कंपनीकडे १० व कृषी अधिकारी कार्यालयाकडे ६९ प्रस्ताव तसेच २०१९-२० वर्षातील केवळ दोन प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.शेतकरी अपघात विमा योजनेचे सन २०१७-१८ वर्षात ३८ व २०१८-१९ वर्षात १२ असे एकूण ५० प्रस्ताव मंजूर करण्यात आले. शेतात काम करताना अपघात झाल्यास अथवा नैसर्गिक आपत्तीने जखमी किंवा मृत्यू झाल्यास संबंधितांना नुकसानभरपाई म्हणून आर्थिक लाभ दिला जातो. या लाभासाठी शेतकरी किंवा वारसदाराने विम्याच्या कालावधीत तलाठ्यांच्या प्रमाणपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या प्रस्तावाची नोंद घेऊन शासनाचे विमा सल्लागार असलेल्या विभागीय कार्यालयाकडे हे प्रस्ताव पाठवतात.विमा सल्लागार कार्यालयाकडून प्राथमिक छाननी केल्यानंतर हे प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला जातो. योजनेच्या अटी व शर्तीनुसार पात्र प्रस्तावाला विमा कंपनीकडून मंजुरी दिल्यानंतर संबंधितांना आर्थिक लाभ मिळतो.विमा संरक्षणामध्ये समाविष्ट बाबीरस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू होणे, जंतुनाशके हातळताना किंवा इतर कारणाने झालेली विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू होणे, हत्या, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचू दंश, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत्यू आदी प्रकारच्या बाबींसाठी मृतक शेतकऱ्यांचे वारसदार तसेच जखमी शेतकºयाला विमा दिला जातो.पात्रतेच्या अटी व आवश्यक दस्तावेजगोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक दस्तावेज प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे. शेतकरी म्हणून त्याच्या नावाचा समावेश असलेला सातबारा किंवा आठ अ नमून्यातील उतारा, ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव सातबारावर आले असेल, अशी संबंधित फेरफार नोंद, शेतकऱ्यांचे वारसदार म्हणून तलाठ्याकडील गाव नमूना क्र.६ ची नोंद, अपघाताच्या स्वरूपानुसार विहीत केलेली दस्तावेज.विम्यापोटी मिळणारी नुकसानभरपाईगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास दोन लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकाली झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये तसेच अपघातामुळे जखमी झाल्यास संबंधित शेतकऱ्याला एक लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते.

टॅग्स :Farmerशेतकरी