शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विम्याचे ९९ प्रस्ताव प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST

शेतकऱ्याच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सदर योजनेच्या अंमलबजावणीची गती मंदावली असून ही योजना जाचक अटी व शर्तीत सापडल्यामुळे गेल्या तीन वर्षातील एकूण ९९ प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देप्रक्रियेत गती नाही : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतीची कामे करताना विविध प्रकारचे अपघात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो. अशा मय्यत शेतकऱ्याच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सदर योजनेच्या अंमलबजावणीची गती मंदावली असून ही योजना जाचक अटी व शर्तीत सापडल्यामुळे गेल्या तीन वर्षातील एकूण ९९ प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.सन २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत सदर योजनेअंतर्गत जिल्हाभरातून एकूण १७५ प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यापैकी ५० प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विविध त्रुटींमुळे २६ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. सद्य:स्थितीत विमा कंपनीकडे तीन वर्षाचे मिळून एकूण २० प्रस्ताव प्रलंबित आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालय व वारसदाराकडे मिळून एकूण ७९ प्रस्ताव प्रलंबित आहेत. सन २०१६-१७ या वर्षात विमा कंपनीकडे ८ व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे १० प्रस्ताव प्रलंबित आहेत. २०१८-१९ या वर्षात विमा कंपनीकडे १० व कृषी अधिकारी कार्यालयाकडे ६९ प्रस्ताव तसेच २०१९-२० वर्षातील केवळ दोन प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.शेतकरी अपघात विमा योजनेचे सन २०१७-१८ वर्षात ३८ व २०१८-१९ वर्षात १२ असे एकूण ५० प्रस्ताव मंजूर करण्यात आले. शेतात काम करताना अपघात झाल्यास अथवा नैसर्गिक आपत्तीने जखमी किंवा मृत्यू झाल्यास संबंधितांना नुकसानभरपाई म्हणून आर्थिक लाभ दिला जातो. या लाभासाठी शेतकरी किंवा वारसदाराने विम्याच्या कालावधीत तलाठ्यांच्या प्रमाणपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या प्रस्तावाची नोंद घेऊन शासनाचे विमा सल्लागार असलेल्या विभागीय कार्यालयाकडे हे प्रस्ताव पाठवतात.विमा सल्लागार कार्यालयाकडून प्राथमिक छाननी केल्यानंतर हे प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला जातो. योजनेच्या अटी व शर्तीनुसार पात्र प्रस्तावाला विमा कंपनीकडून मंजुरी दिल्यानंतर संबंधितांना आर्थिक लाभ मिळतो.विमा संरक्षणामध्ये समाविष्ट बाबीरस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू होणे, जंतुनाशके हातळताना किंवा इतर कारणाने झालेली विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू होणे, हत्या, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचू दंश, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत्यू आदी प्रकारच्या बाबींसाठी मृतक शेतकऱ्यांचे वारसदार तसेच जखमी शेतकºयाला विमा दिला जातो.पात्रतेच्या अटी व आवश्यक दस्तावेजगोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक दस्तावेज प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे. शेतकरी म्हणून त्याच्या नावाचा समावेश असलेला सातबारा किंवा आठ अ नमून्यातील उतारा, ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव सातबारावर आले असेल, अशी संबंधित फेरफार नोंद, शेतकऱ्यांचे वारसदार म्हणून तलाठ्याकडील गाव नमूना क्र.६ ची नोंद, अपघाताच्या स्वरूपानुसार विहीत केलेली दस्तावेज.विम्यापोटी मिळणारी नुकसानभरपाईगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास दोन लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकाली झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये तसेच अपघातामुळे जखमी झाल्यास संबंधित शेतकऱ्याला एक लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते.

टॅग्स :Farmerशेतकरी