शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
5
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
6
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
7
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
8
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
9
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
10
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
11
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
12
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
13
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
14
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
15
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
16
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
17
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
18
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
19
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
20
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
Daily Top 2Weekly Top 5

१५ व्यक्तींसह ९२ जनावरे दगावली

By admin | Updated: September 18, 2016 01:46 IST

गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल ते १५ सप्टेंबर २०१६ या साडेपाच महिन्याच्या कालावधीत वीज कोसळून,

नैसर्गिक आपत्तीचा फटका : २ हजार ४३५ घरांची पडझड
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल ते १५ सप्टेंबर २०१६ या साडेपाच महिन्याच्या कालावधीत वीज कोसळून, अतिवृष्टी तसेच पुरात अडकून व इतर प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे १५ व्यक्तींसह लहान व मोठी मिळून एकूण ९२ जनावरे दगावली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. याशिवाय अतिवृष्टीमुळे यंदाच्या पावसाळ्यात २ हजार ४३५ घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे अनेक कुटुंब बेघर झाले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात तीन ते चारदा अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली. गेल्या तीन वर्षातील पावसाची सरासरी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधार पावसाने पूर्ण झाली. अतिवृष्टी व इतर आपत्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले.
नैसर्गिक आपत्तीमुळे १५ इसम ठार झाले. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील दोन, धानोरा एक, कोरची एक, कुरखेडा दोन, आरमोरी एक, चामोर्शी एक, अहेरी एक, सिरोंचा दोन व एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक चार इसमांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा आतापर्यंत ११ इसम जखमी झाले आहेत. यामध्ये चामोर्शी तालुक्यातील दोन, मुलचेरा दोन व अहेरी तालुक्यातील सर्वाधिक पाच इसमांचा समावेश आहे.
नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत २४ लहान जनावरे दगावली आहेत. यामध्ये कुरखेडा तालुक्यातील तीन, आरमोरी एक, अहेरी सहा, एटापल्ली नऊ व सिरोंचा तालुक्यातील पाच जनावरांचा समावेश आहे. दगावलेल्या ६८ मोठ्या जनावरांमध्ये धानोरा तालुक्यातील चार, गडचिरोली चार, कुरखेडा तीन, आरमोरी चार, चामोर्शी दोन, अहेरी १५, भामरागड सात, सिरोंचा पाच व सर्वाधिक एटापल्ली तालुक्यातील २४ जनावरांचा समावेश आहे.
अतिवृष्टीमुळे यावर्षी आतापर्यंत बाराही तालुक्यात एकूण २ हजार ४२० घरांची अशंता पडझड झाली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील २६१, धानोरा १७८, कोरची २७, कुरखेडा १२८, देसाईगंज १६, आरमोरी ५२०, चामोर्शी ७१९, मुलचेरा १२, अहेरी ४१५, एटापल्ली ७२, भामरागड ४ व सिरोंचा तालुक्यातील ६८ घरांचा समावेश आहे. पूर्णत: पडझड झालेल्या १५ घरांमध्ये गडचिरोली तालुक्यातील चार, कुरखेडा एक, अहेरी एक व एटापल्ली तालुक्यातील नऊ घरांचा समावेश आहे. आर्थिक मदत तत्काळ देण्याची मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

६९ लाखांची मदत प्रलंबित
अतिवृष्टी, पूर व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यात यंदा आतापर्यंत नागरिकांचे एकूण ९६ कोटी ९८ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त परिस्थितीची पाहणी व मोकापंचनामा महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी केला असून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. या अहवालानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत पूर पीडित व नुकसानग्रस्तांना शासनाच्या निकषानुसार ९९ लाख ९८ हजार २९० रूपयांची मदत प्रदान करण्यात आली आहे. अद्यापही ६९ लाख ८८ हजार रूपयांची मदत देणे शिल्लक आहे. परिणामी अनेक नुकसानग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित आहे.

जनावरांचे ९४ गोठे कोसळले
अतिवृष्टीमुळे जिल्हाभरात आतापर्यंत शेतकऱ्यांच्या जनावरांचे एकूण ९४ गोठ्यांची पडझड झाली असून जनावर मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात जनावरांच्या निवासाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. यामुळे गडचिरोली तालुक्यातील १४, धानोरा १०, कोरची २, कुरखेडा ३०, वडसा १, आरमोरी २४, मुलचेरा १, अहेरी ८, भामरागड १ व सिरोंचा तालुक्यातील ३ गोठ्यांचा समावेश आहे.