विविध गावांमध्ये ८७२ विद्युत जोडणी

By Admin | Updated: June 23, 2014 00:05 IST2014-06-23T00:05:13+5:302014-06-23T00:05:13+5:30

जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलीस विभागाने आतापर्यंत ४०७ जनजागरण मेळावे आयोजित केले. सन २०१२ यावर्षी मेळाव्याच्या माध्यमातून विविध गावात

872 electric connections in different villages | विविध गावांमध्ये ८७२ विद्युत जोडणी

विविध गावांमध्ये ८७२ विद्युत जोडणी

गडचिरोली : जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलीस विभागाने आतापर्यंत ४०७ जनजागरण मेळावे आयोजित केले. सन २०१२ यावर्षी मेळाव्याच्या माध्यमातून विविध गावात ११५ व २०१३ मध्ये ७५७ असे एकूण ८७२ नवीन विद्युत लाईन जोडण्यात आल्या. मेळाव्याच्या माध्यमातून आत्मसमर्पण योजनेला बळकटी मिळाली आहे.
सन २०१३ या वर्षात एकूण २०१ जनजागरण मेळावे आयोजित करण्यात आले. त्यात सामूहिक विवाह योजनेत ६६ जोडप्यांचे शुभमंगल झाले. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन २५ हजार २४७ नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तंटामुक्त झालेल्या १६ गावांना ९३ लाखांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. १७ हजार २७६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध गावांमध्ये ७५७ नवीन विद्युत लाईन जोडण्यात आल्या. ८९५ नागरिकांना नवीन वाहन शिकाऊ परवाने देण्यात आले. ७५० कि.ग्रॅ. बी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. ८९० नागरिकांचे बँक खाते उघडण्यात आले. तसेच विविध योजनांचे १७ हजार ५०९ अर्ज वितरित करण्यात आले. एकूण ६२० नागरिकांची आधार कार्ड नोंदणी करण्यात आली. या मेळाव्याला एकूण ३ लाख ५ हजार ९१२ नागरीकांनी हजेरी लावली होती.
त्याचप्रमाणे सन २०१२ या वर्षात एकूण ४३ जनजागरण मेळावे आयोजित करण्यात आले. त्यात सामूहिक विवाह योजनेत ७१ जोडप्यांचे शुभमंगल झाले. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन ६ हजार ७८३ नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तंटामुक्त झालेल्या २३ गावांना ६४ लाखांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. ७ हजार ४८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध गावांमध्ये ११५ नवीन विद्युत लाईन जोडण्यात आल्या. २२५ नागरिकांना नवीन वाहन शिकाऊ परवाने देण्यात आले. २२० कि.ग्रॅ. बी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. ४५ नागरिकांचे बँक खाते उघडण्यात आले. तसेच विविध योजनांचे १ हजार ३१२ अर्ज वितरित करण्यात आले. या मेळाव्याला एकूण १ लाख १६ हजार १५० नागरिकांनी हजेरी लावली होती. सन २००५ ला ३९ मेळावे घेण्यात आले असून त्यात सामूहिक विवाहात ३३८ जोडप्यांचा विवाह करण्यात आला. तसेच या वर्षी २० नक्षल समर्थक व १ नक्षल सदस्याने आत्मसमर्पण केले. सन २००६ मध्ये २१ मेळावे घेऊन नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. सामुहिक विवाहात ३८८ जोडप्यांचा विवाह करण्यात आला. १५ नक्षल समर्थकांनी हत्यारासह आत्मसमर्पण केले. सन २००७ मध्ये १३ जनजागरण मेळावे, सन २००८ मध्ये ९ जनजागरण मेळावे, सन २००९ मध्ये ५ जनजागरण मेळावे, सन २०१० मध्ये ५ जनजागरण मेळावे घेऊन सामूहिक विवाहात ८६ जोडपी विवाहबध्द झाली. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 872 electric connections in different villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.