शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

73 हजार 443 नागरिकांनी घेतली काेराेनाची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात प्राथमिक उपकेंद्र, आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हास्तरावरील शासकीय रुग्णालय मिळून एकूण ६८ शासकीय लसीकरण केंद्र आहे, तर गडचिराेली शहरात दाेन खासगी रुग्णालयात लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यात आतापर्यंत काेराेनाचे एकूण १६ हजार ९३६ रुग्ण झाले आहे. यापैकी १२ हजार ७७३ जण काेरेानामुक्त झाले आहे.

ठळक मुद्देप्रभावी उपाय, लसीकरणानंतर मृत्यूचा धोका कमीच

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला तरी हा प्रादुर्भाव राेखण्यासाठी तेवढ्याच ताकदीने आराेग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. लस घेणे हे काेराेनावर प्रभावी उपाय आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने लसीकरणाची माेहीम एकूण ७२ केंद्रांवरून राबविली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७३ हजार ४४३ नागरिकांनी काेराेनाची लस घेतली. एक-दोन अपवाद सोडल्यास लसीकरणानंतर जिल्ह्यात कोणाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 
गडचिराेली जिल्ह्यात प्राथमिक उपकेंद्र, आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हास्तरावरील शासकीय रुग्णालय मिळून एकूण ६८ शासकीय लसीकरण केंद्र आहे, तर गडचिराेली शहरात दाेन खासगी रुग्णालयात लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यात आतापर्यंत काेराेनाचे एकूण १६ हजार ९३६ रुग्ण झाले आहे. यापैकी १२ हजार ७७३ जण काेरेानामुक्त झाले आहे. आतापर्यंत एकूण ५९ हजार ७३७ जणांनी काेराेनाचा पहिला डाेस घेतला तर १३ हजार ७०५ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला आहे. मध्यंतरी काही दिवस लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने ही माेहीम थंडबस्त्यात पडली हाेती. मात्र आता पुरवठा हाेऊ लागल्याने लसीकरण माेहिमेला हळूहळू वेग येत आहे. 

राेगप्रतिकारशक्ती वाढते
काेराेनावर लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. लस घेतल्यानंतर बऱ्याच दिवसांनी संबंधित नागरिकाचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला तरी त्याचा मृत्यू हाेण्याची शक्यता फार कमी आहे. लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याने लस घेतलेल्या नागरिकांची राेगप्रतिकारक शक्ती बरीच वाढते. त्यामुळे लागण झाली तरी फारसा परिणाम हाेत नाही.

दाेन्ही डाेस घेतलेले नागरिक बिनधास्त
काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययाेजनांसाेबतच लस घेणे गरजेचे आहे. पहिला व दुसरा डाेस घेणे आवश्यक आहे. जिल्हाभरात आतापर्यंत एकूण १३ हजार ७०५ नागरिकांनी काेराेनाचे दाेन्ही डाेस घेतले. दाेन्ही डाेस घेतलेले नागरिक आता काेराेना संसर्गाबाबत काही प्रमाणात बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस