शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

६३९ मंडळांची नोंदणीकडे पाठ

By admin | Updated: September 8, 2016 01:24 IST

राज्य शासनाने यावर्षी लोकमान्य गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक मंडळांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

स्पर्धांपासून वंचित राहणार : केवळ ४६ मंडळांनी केली धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीगडचिरोली : राज्य शासनाने यावर्षी लोकमान्य गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक मंडळांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित सार्वजनिक मंडळाची नोंदणी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एकूण ६२५ सार्वजनिक मंडळांपैकी ४६ मंडळांनीच गडचिरोली येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी केली आहे. उर्वरित ६३९ मंडळांनी नोंदणीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सदर सार्वजनिक गणेश मंडळे शासनाच्या विविध स्पर्धांच्या सहभागापासून वंचित राहणार आहेत. यावर्षी महाराष्ट्र शासनाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १२५ वी जन्म शताब्दी दिवस साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांसाठी विविध विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये व्यसनमुक्ती, बेटी बचाव, स्वदेशी, साक्षरता, जलसंवर्धन आदी चार विषयांवर गणेश मंडळांना स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे सध्या १६० वे जयंती वर्ष सुरू आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या चळवळीला पुढील वर्षी १२५ वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच’ या लोकमान्य टिळकांच्या जगप्रसिद्ध उद्गारचे चालू वर्ष शतक महोत्सवी वर्ष आहे.गडचिरोली जिल्ह्यात यंदा ९ पोलीस उपविभाग मिळून एकूण ४९३ सार्वजनिक मंडळांमार्फत गणेशोत्सव सुरू आहे. याशिवाय १९२ गावांमध्ये एक गाव, एक गणपतीची संकल्पना राबविण्यात येत असून या गावांमध्येही मोठ्या उत्साहात एकात्मतेने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. एकूण ६८५ सार्वजनिक गणेश मंडळांपैकी केवळ ४६ मंडळांनी धर्मदाय आयुक्त कार्यालय गडचिरोली यांच्याकडे सर्व कागदपत्रे सादर करून रितसर नोंदणी केली आहे. तर एका सार्वजनिक गणेश मंडळाचा अर्ज धर्मदाय आयुक्त कार्यालयात शिल्लक आहे. या मंडळालाही संबधित कार्यालयाकडून परवानगी पत्र देण्यात येणार आहे.विशेष म्हणजे सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सवाच्या दहा दिवसांपूर्वी सर्व आवश्यक कागदपत्र सादर करून नोंदणी करणे गरजेचे होते. शांतता समितीच्या बैठकीत धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या नोंदणीबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र ६०० वर सार्वजनिक गणेश मंडळांनी केवळ आपल्या गावालगतच्या पोलीस ठाण्यात नोंदणी केली आहे. मात्र या मंडळांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या नोंदणीकडे पाठ फिरविली. त्यामुळे या मंडळांना राज्य शासनाच्या विविध स्पर्धांच्या सहभागापासून वंचित राहावे लागणार आहे. परिणामी पुरस्कारालाही सदर मंडळे मुकणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)