शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

'एकास 5 वर्षाचा मुलगा तर दुसऱ्याला 3 वर्षांची चिमुकली', बुलडाण्याचे दोघे शहीद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 21:35 IST

देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथील शहीद जवान सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे हे पोलीस दलात दोन मार्च २०११ मध्ये भरती झाले होते.

बुलडाणा : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलींनी महाराष्ट्र दिनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे (३०, आळंद, ता. देऊगाव राजा) आणि मेहकर येथील राजू नारायण गायकवाड (३२) या जवांनांचाही समावेश आहे. गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभूरखेडा येथे सी ६० या पथकामध्ये समावेश असलेले हे दोन्ही जवान आपल्या सहकाऱ्यांसह खासगी वाहनाने जात असताना नक्षलींनी भूसुरूंगाचा स्फोट केला होता, त्यात हे दोघे ठार झाले.

शहीद शहीद राजू गायकवाड यांचे आई-वडील घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगोलग गडचिरोलीकडे रवाना झाले आहे. मेहकर शहरातील अण्णाभाऊ साठे नगरमधील वॉर्ड क्र. सात मध्ये ते कुटुंबियांसह वास्तव्यास होते. दोन वर्षापूर्वीच त्यांचा मोठा भाऊ हा वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी आजारपणात मृत्यूमुखी पडला होता. शहीद राजू गायकवाड हे २००९ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. त्यांना पाच वर्षाची मुलगी (गायत्री), आठ महिन्याचा एक मुलगा (समर्थ) व बराच मोठा आप्त परिवार आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील त्यांची सासुरवाडी असून १५ फेब्रुवारी २०१३ मध्ये त्यांचा विवाह झाला होता.

दरम्यान, देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथील शहीद जवान सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे हे पोलीस दलात दोन मार्च २०११ मध्ये भरती झाले होते. पत्नी स्वाती, एक मुलगी नयना (३), आई, वडील व एक भाऊ असा त्यांचा परिवार आहे. दरम्यान, सकाळपासून पतीचा फोन लागत नसल्यामुळे पत्नी स्वाती हीने आळंद येथे कुटुंबियांना माहिती दिली होती. तेवढ्यात दृकश्राव्य माध्यमावर गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर संदीप खार्डेचे कुटुंबीय व नातलग हे गडचिरोलीकडे रवाना झाले होते.दरम्यान, या दुर्देवी घटनेची शहीद जवानांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. वरिष्ठ पातळीवरून येणार्या सुचनेनुसार शहीद जवानांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्याबाबत अद्याप स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत. गडचिरोली नियंत्रण कक्षासह तेथील अधिकाऱ्यांच्या आपण संपर्कात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

जिल्ह्यावर दु:खाचा डोंगरगेल्या महिनाभरापूर्वीच पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नियतीने बुलडाणा जिल्ह्यातील दोन कर्तबागर जवान हिरावून घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून सोशल मीडियातून शहीद जवानांप्रती शोकसंवेदना व्यक्त करीत त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीMartyrशहीदGadchiroliगडचिरोलीgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरPoliceपोलिसbuldhanaबुलडाणा