शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

'एकास 5 वर्षाचा मुलगा तर दुसऱ्याला 3 वर्षांची चिमुकली', बुलडाण्याचे दोघे शहीद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 21:35 IST

देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथील शहीद जवान सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे हे पोलीस दलात दोन मार्च २०११ मध्ये भरती झाले होते.

बुलडाणा : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलींनी महाराष्ट्र दिनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे (३०, आळंद, ता. देऊगाव राजा) आणि मेहकर येथील राजू नारायण गायकवाड (३२) या जवांनांचाही समावेश आहे. गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभूरखेडा येथे सी ६० या पथकामध्ये समावेश असलेले हे दोन्ही जवान आपल्या सहकाऱ्यांसह खासगी वाहनाने जात असताना नक्षलींनी भूसुरूंगाचा स्फोट केला होता, त्यात हे दोघे ठार झाले.

शहीद शहीद राजू गायकवाड यांचे आई-वडील घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगोलग गडचिरोलीकडे रवाना झाले आहे. मेहकर शहरातील अण्णाभाऊ साठे नगरमधील वॉर्ड क्र. सात मध्ये ते कुटुंबियांसह वास्तव्यास होते. दोन वर्षापूर्वीच त्यांचा मोठा भाऊ हा वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी आजारपणात मृत्यूमुखी पडला होता. शहीद राजू गायकवाड हे २००९ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. त्यांना पाच वर्षाची मुलगी (गायत्री), आठ महिन्याचा एक मुलगा (समर्थ) व बराच मोठा आप्त परिवार आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील त्यांची सासुरवाडी असून १५ फेब्रुवारी २०१३ मध्ये त्यांचा विवाह झाला होता.

दरम्यान, देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथील शहीद जवान सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे हे पोलीस दलात दोन मार्च २०११ मध्ये भरती झाले होते. पत्नी स्वाती, एक मुलगी नयना (३), आई, वडील व एक भाऊ असा त्यांचा परिवार आहे. दरम्यान, सकाळपासून पतीचा फोन लागत नसल्यामुळे पत्नी स्वाती हीने आळंद येथे कुटुंबियांना माहिती दिली होती. तेवढ्यात दृकश्राव्य माध्यमावर गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर संदीप खार्डेचे कुटुंबीय व नातलग हे गडचिरोलीकडे रवाना झाले होते.दरम्यान, या दुर्देवी घटनेची शहीद जवानांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. वरिष्ठ पातळीवरून येणार्या सुचनेनुसार शहीद जवानांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्याबाबत अद्याप स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत. गडचिरोली नियंत्रण कक्षासह तेथील अधिकाऱ्यांच्या आपण संपर्कात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

जिल्ह्यावर दु:खाचा डोंगरगेल्या महिनाभरापूर्वीच पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नियतीने बुलडाणा जिल्ह्यातील दोन कर्तबागर जवान हिरावून घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून सोशल मीडियातून शहीद जवानांप्रती शोकसंवेदना व्यक्त करीत त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीMartyrशहीदGadchiroliगडचिरोलीgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरPoliceपोलिसbuldhanaबुलडाणा