शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

४१ हजार शेतकऱ्यांना सन्मान निधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:35 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : केंद्र शासनाने सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील ७४ हजार २३८ शेतकऱ्यांना देण्यात ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या चकरा : ७४ हजार जणांना मिळाला पहिला हप्ता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र शासनाने सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील ७४ हजार २३८ शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. अजूनही ४१ हजार ६२६ शेतकरी या योजनेचा लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांची नोंदणीची प्रक्रिया सुरूच आहे.लोकसभा निवडणुकीच्या एक महिन्यापूर्वी केंद्र शासनाने किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतीवर्षी सहा हजार रुपये अनुदान तीन टप्प्यांमध्ये दिले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तत्काळ कागदपत्रे मागून काही शेतकऱ्यांना लाभ द्यावा, असे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. ज्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला, त्याची प्रसिद्धी करून विद्यमान केंद्र शासनाने निवडणूक जिंकली. निवडणुकीनंतर मात्र पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्याच्या कामाची गती अतिशय मंदावली आहे. सुरूवातीला दोन हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचे शासनाने घोषित केले होते. त्यानंतर पुन्हा बदल करून सर्वच शेतकऱ्यांना आता लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे.महसूल विभागाने गोळा केलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ लाख १५ हजार ८६४ लाभार्थी अपेक्षित आहेत. या सर्व शेतकऱ्यांचा डाटा पीएम किसान ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. या एकूण शेतकऱ्यांपैकी ७४ हजार २३८ शेतकऱ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. तर ३० हजार २९९ शेतकऱ्यांना दुसरा लाभ देण्यात आला आहे. तर ४१ हजार ६२६ शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.शेतकऱ्यांमध्ये असंतोषकाही शेतकऱ्यांना दुसराही हप्ता उपलब्ध झाला आहे, तर काही शेतकºयांना मात्र पहिल्याच हप्त्याची रक्कम उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपला अर्ज वैध ठरला की नाही, याविषयी काही शेतकऱ्यांमध्ये शंका निर्माण झाली आहे. सदर शेतकरी वेळोवेळी तलाठी कार्यालय व बँकेत जाऊन विचारणा करीत आहेत. योजना सुरू होऊन आता सहा महिन्यांचा कालावधी उलटत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधुक वाढली आहे. पात्र शेतकऱ्यांची नोंदणी करण्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना