शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

जोगीसाखरा भागातील १९ मजूर कर्नाटकात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:00 AM

मागील चार महिन्यांपूर्वी जोगीसाखरा, शंकरनगर येथील मजूर रोजगारासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी कर्नाटकात गेले. महाराष्ट्राच्या पुणे येथील राज ग्रुप कंट्रक्शन कंपनीमार्फत कर्नाटक राज्याच्या बिजापूर जिल्ह्यातील बागेवाडी तालुक्यातील कोलार येथे गेले. दरम्यान देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला. आता संचारबंदीमुळे हे मजूर अडकून पडले आहेत.

ठळक मुद्देकोरोना संचारबंदीचा परिणाम : सीसी रस्त्याच्या कामासाठी गेले होते

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : भूमिगत नाली व सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामावर मजूर म्हणून आरमोरी तालुक्याच्या जोगीसाखरा परिसरातील १९ मजूर कर्नाटक राजाच्या बिजापूर तालुक्यातील कोलार येथे चार महिन्यापूर्वी गेले. सदर मजूर कोरोनाच्या संचारबंदीमुळे कर्नाटक राज्यात अडकले आहेत. त्यांच्याकडील जीवनावश्यक साहित्य संपले असून काम बंद झाल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे.महाराष्ट्र सरकारने सदर १९ मजुरांना मदत करावी, अशी मागणी अडकलेल्या मजुरांनी केली आहे. मागील चार महिन्यांपूर्वी जोगीसाखरा, शंकरनगर येथील मजूर रोजगारासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी कर्नाटकात गेले. महाराष्ट्राच्या पुणे येथील राज ग्रुप कंट्रक्शन कंपनीमार्फत कर्नाटक राज्याच्या बिजापूर जिल्ह्यातील बागेवाडी तालुक्यातील कोलार येथे गेले. दरम्यान देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला. आता संचारबंदीमुळे हे मजूर अडकून पडले आहेत. त्यांच्याकडील जीवनावश्यक वस्तू व इतर साधन सामग्री पूर्णत: संपल्याने १९ मजुरांना कोलारचे पोलीस स्टेशन गाठले. आम्हाला महाराष्ट्र राज्यात जाण्याची परवानगी द्या, नाही तर भोजनाची व्यवस्था करा, अशी विनंती केली. मात्र त्यांना हवी तशी मदत मिळाली नाही. तसेच जाण्यासाठी परवानगी मिळाली नाही. अशी माहिती लोकमत प्रतिनिधीला दिली. देशभर संचारबंदी लागू झाली असून जिल्हा बंदी करण्यात आली आहे. गाव सोडून कर्नाटक राज्यातील कोलार शहरातील गेलेले १९ मजूर अडकून पडले. या मजुरांना सरकारने मदत करावी, अशी मागणी मजुरांनी केली आहे. अडकून पडलेल्या मजुरांमध्ये अनिल चौके, नितीन मानकर, विकास देवनाथ, देव्रत माझी, निखील सूर्यवशी, देवेंद्र राय, सुनिल माझी, पंकज सरकार, सचिन ठाकरे, रियाज शेख, अश्विन नेवारे, अजय मडावी, मुकेश माझी, त्रिलोक धोगडे, शूक्षय मंडल, सपन मुजुमदार, त्रिदेव मित्री, प्रदिप माटे, सुजल सरकार व दिनेश माझी आदींचा समावेश आहे.नेहरपायलीतील १४ मजूर अडकलेकुरखेडा तालुक्याच्या नेहरपायली या गावातील १४ मजूर मिरची तोडण्याच्या कामासाठी तेलंगणातील पिंजरमडगू गावात गेले. मात्र आता कोरोनामुळे संचारबंदी झाल्याने ते मजूर तेलंगणातच अडकून पडले आहेत. तेलंगणा राज्यातील खमम जिल्ह्याच्या कानपल्ली तालुक्यातील पिंजर मडगू गावात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मिरची तोडण्यासाठी कुरखेडा तालुक्यातील मजूर या गावात रोजगारासाठी गेले. मात्र आता संचारबंदीने हे मजूर तेलंगणात अडकले आहेत. स्थानिकस्तरावर त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत.भेंडाळा परिसरातील नागरिकही दुसऱ्या राज्यातचामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा परिसरातील कान्होली, कळमगाव, एकोडी, सगणापूर, घारगाव, खोपुर्डी, रामाळा, दोटकुली, मोहुर्ली, फराडा, वाघोली, भेंडाळा, वेलतूर आदी गावातील मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्याकरिता गेले आहेत. कान्होली येथील जवळपास १०० नागरिक तेलंगणाच्या खमंग जिल्ह्यातील केसपल्ली येथे अडकले आहेत. परंतु संचारबंदी लागू असल्याने त्यांना स्वगावी येण्यासाठी अडचणी येत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLabourकामगार