शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

१७ ग्रामपंचायतींत ८६ महिलांनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:36 IST

देसाईगंज : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींचे निकाल घाेषित झाले आहेत. यात सुमारे ८६ महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे, तर नाेटाला ...

देसाईगंज : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींचे निकाल घाेषित झाले आहेत. यात सुमारे ८६ महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे, तर नाेटाला २००९ मतदारांनी मतदान केले आहे.

देसाईगंज तालुक्यात १७ ग्रामपंचायतींच्या ५९ प्रभागांतील १६१ सदस्यांसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. २६ उमेदवार आधीच अविरोध निवडून आले आहेत. त्यात ५ पुरुष व २१ महिलांचा समावेश आहे. १३५ जागांसाठी मतदान झाले. त्यात महिला उमेदवारांनी बाजी मारली असून तब्बल ८६ जागांवर निवडून आल्या आहेत. तर ७५ पुरुष उमेदवार निवडून आलेले आहेत. तालुक्यातील २००९ मतदारांनी नाेटासाठी मतदान केले आहे. यावरून त्यांना त्यांच्या प्रभागात उभे असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांनी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून मतदारांना माेहित करण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदारांनी आपला काैल मात्र आपल्या पसंतीच्या उमेदवारालाच दिला असल्याचे दिसून येते. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतींवर नवखे उमेदवार निवडून आले आहेत.

तालुक्यातील विसोरा, आमगाव, एकलपूर, किन्हाळा, चोप, कोंढाळा, कोकडी या गावांत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली हाेती, मात्र त्यांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. काही ठिकाणी अटीतटीची लढत हाेऊन प्रस्थापितांचा अत्यंत कमी फरकाने पराभव झाला असल्याचे दिसून येते.

बाॅक्स

सरपंचपदाच्या आक्षणावर सर्व गणिते निर्भर

मागील वर्षीपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगाेदरच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले जात हाेते. सरपंचपद हे ग्रामपंचायतीत महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे ज्या प्रवर्गासाठी सरपंचपद आहे, त्याच जागेसाठी माेठी लढत हाेत हाेती. वेळप्रसंगी भांडणे हाेत हाेती. हे टाळण्यासाठी शासनाने या वर्षी पहिल्यांदाच निकालानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे सरपंचपद अजूनही गुलदस्त्यात आहे. एखाद्या पॅनलकडे स्पष्ट बहुमत असूनही त्यांच्याकडे सरपंचपद जाहीर झालेल्या प्रवर्गाचा उमेदवार नसल्यास त्यांना सरपंचपदावर पाणी फेरावे लागणार आहे. तर बहुमत नसतानाही आरक्षणामुळे काही जणांना सरपंचपद मिळणार आहे.