शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात १३५ पाणी नमूने दूषित

By admin | Updated: August 18, 2016 01:28 IST

पावसाळ्यात जलजन्य व साथीच्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छ पाणी पिणे आवश्यक आहे.

आरोग्य धोक्यात : उपाययोजना करण्याकडे ग्रा.पं. चे दुर्लक्ष दिलीप दहेलकर  गडचिरोली पावसाळ्यात जलजन्य व साथीच्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छ पाणी पिणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. शिवाय हातपंप, विहीर, नळ व इतर पाणी स्त्रोताच्या सभोवताल स्वच्छता राखणे गरजेचे आहे. यासंदर्भात आरोग्य विभाग, तालुका व जिल्हा प्रशासन वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देऊन कार्यवाही करण्यास सांगत आहे. मात्र असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे जुलै महिन्यात बाराही तालुक्यातील तब्बल १३५ पाणी नमूने तपासणीअंती दूषित आढळल्याने संबंधित गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतस्तरावर कार्यरत असलेल्या जलसुरक्षकामार्फत गावातील पाणी नमूने तपासणीसाठी पंचायत समितीस्तरावरून जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत पाठविले जातात. जुलै महिन्यात बाराही तालुक्यातील गावांमधून एकूण ३ हजार ९०५ पाणी नमूने जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी आणण्यात आले. तपासणीअंती यापैकी १३५ पाणी नमूने दूषित आढळले असून याचे प्रमाण ३.४६ आहे. विशेष म्हणजे कुरखेडा तालुक्यातील सर्वाधिक ४६ व अहेरी तालुक्यातील ४३ पाणी नमूने दूषित आढळून आले आहे. या तालुक्यातील गावांमध्ये दूषित पाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे जि. प. च्या आरोग्य विभागाच्या तपासणी अहवालात नमूद आहे. १ जानेवारी ते ३१ जुलै २०१६ या कालावधीत बाराही तालुक्याच्या गावांमधून एकूण १८ हजार १२ पाणी नमूने तपासणीसाठी जिल्हास्तरावर प्राप्त झाले. या पाणी नमून्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. यापैकी ८०४ पाणी नमूने दूषित आढळून आले असून यातील दूषित पाण्याचे प्रमाण ४.४६ आहे. सात महिन्यांच्या कालावधीत अहेरी तालुक्यातील सर्वाधिक २४०, चामोर्शी तालुक्यातील १३३, धानोरा तालुक्यातील ११३, कुरखेडा तालुक्यातील १२० व आरमोरी तालुक्याच्या गावातून १०१ पाणी नमूने दूषित आढळून आले आहे. गेल्या महिनाभरापासून गडचिरोली जिल्ह्यात वायरल फिव्हरचा प्रकोप सुरू असून गावागावात अनेक नागरिक तापाने फणफणत आहेत. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, डायरिया, उलटी, अतिसार व इतर जलजन्य आजार मोठ्या प्रमाणात बळावतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचीही संख्या सध्या जिल्ह्यात मोठी आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबतच्या कार्यवाहीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा जलजन्य आजारातून नागरिकांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणी गुणवत्ता कार्यशाळा आयोजित करून जिल्हाभर पाणी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. मात्र अनेक ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे.