शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

फुटबॉल स्पर्धेतील सहभागावरून वादामुळे भारत चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 00:34 IST

अवघे जग रशियातील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माहोलात मश्गुल असताना भारतीय फुटबॉल विश्वात मात्र वादाची ठिणगी पडली. आगामी आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय संघाला मान्यता न दिल्याने भारतीय आॅलिम्पिक संघटनेवर (आयओए) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) टीकास्त्र सोडले. मात्र ‘आयओए’ नमण्याची चिन्हे दिसत नसल्याने एआयएफएफने या स्पर्धेसाठी स्वत:च्या हिमतीवर संघ पाठविणार असल्याचे जाहीर केले आहे. 

- सचिन खुटवळकर

अवघे जग रशियातील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माहोलात मश्गुल असताना भारतीय फुटबॉल विश्वात मात्र वादाची ठिणगी पडली. आगामी आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय संघाला मान्यता न दिल्याने भारतीय आॅलिम्पिक संघटनेवर (आयओए) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) टीकास्त्र सोडले. मात्र ‘आयओए’ नमण्याची चिन्हे दिसत नसल्याने एआयएफएफने या स्पर्धेसाठी स्वत:च्या हिमतीवर संघ पाठविणार असल्याचे जाहीर केले आहे. 

जागतिक क्रमवारीत ९७व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला विश्वचषक पात्रता फेरीचे दार काही उघडता आलेले नाही. त्यामुळे एआयएफएफला नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागते. अलीकडील काही वर्षांत भारतीय फुटबॉलमध्ये बरीच सुधारणा झाली. मात्र, संघाला हवा तसा पाठिंबा मिळत नसल्याने क्रिकेट, हॉकीच्या तुलनेत फुटबॉलची पिछेहाट थांबताना दिसत नाही. आयओए व एआयएफएफमधील वादामुळे हाच मुद्दा पुन्हा नव्याने समोर आला आहे. भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या नियमांनुसार, कुठल्याही स्पर्धेच्या क्रमवारीत १ ते ८ या दरम्यान राष्ट्रीय संघ असेल, तरच त्या स्पर्धेत सहभागी होण्यास मान्यता दिली जाते. सध्या भारतीय संघ आशियाई फुटबॉल क्रमवारीत १४व्या स्थानावर आहे. त्यामुळे आयओएच्या नियमांत संघाची कामगिरी बसत नाही. साहजिकच संघाला आशियाई फुटबॉल स्पर्धेत सहभागी होण्यास नकार देण्यात आला.

या प्रकारानंतर भडकलेल्या एआयएफएफने भारतीय आॅलिम्पिक संघटनेला फुटबॉलचा गंध नसल्याची बोचरी टीका केली. आम्ही क्रमवारीत पिछाडीवर असल्याचे मान्य करतो. मात्र, आम्हाला अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधीच मिळत नसेल, तर खेळाडूंना मातब्बर संघांविरुद्ध खेळण्याचा अनुभव तरी कसा मिळणार? असे अनुभव मिळाल्याशिवाय कोणत्याही देशाच्या क्रीडा विश्वाचा विकास होत नाही. फुटबॉल हा सर्वांत मोठा खेळ असून तो २१२ देश खेळतात. सध्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पाच आशियाई संघ सहभागी झाले आहेत. भारतीय संघाला ही मजल मारण्यासाठी बरीच वर्षे वाट पाहावी लागेल. त्यासाठी खेळाडूंच्या कौशल्य विकासाकरिता मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभाग महत्त्वाचा ठरतो.

- प्रशिक्षक व खेळाडूंच्या कठोर परिश्रमांमुळे भारतीय फुटबॉल संघाने १७३व्या क्रमांकावरून ९७व्या स्थानापर्यंत सुधारणा केली आहे.

- आयएसएलसारख्या स्पर्धांतील विदेशी खेळाडू, प्रशिक्षकांच्या सहभागामुळे राष्ट्रीय खेळाडूंना तांत्रिकदृष्ट्या सुधारणा करण्याचा मोठा अनुभव मिळतो.

- भारतात ब-यापैकी फुटबॉल संस्कृती रुजलेली असतानाही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघाचे प्रदर्शन निराशाजनकच राहिले आहे.

- ही स्थिती बदलण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच खेळाडूंसाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतSportsक्रीडा