शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉल स्पर्धेतील सहभागावरून वादामुळे भारत चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 00:34 IST

अवघे जग रशियातील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माहोलात मश्गुल असताना भारतीय फुटबॉल विश्वात मात्र वादाची ठिणगी पडली. आगामी आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय संघाला मान्यता न दिल्याने भारतीय आॅलिम्पिक संघटनेवर (आयओए) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) टीकास्त्र सोडले. मात्र ‘आयओए’ नमण्याची चिन्हे दिसत नसल्याने एआयएफएफने या स्पर्धेसाठी स्वत:च्या हिमतीवर संघ पाठविणार असल्याचे जाहीर केले आहे. 

- सचिन खुटवळकर

अवघे जग रशियातील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माहोलात मश्गुल असताना भारतीय फुटबॉल विश्वात मात्र वादाची ठिणगी पडली. आगामी आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय संघाला मान्यता न दिल्याने भारतीय आॅलिम्पिक संघटनेवर (आयओए) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) टीकास्त्र सोडले. मात्र ‘आयओए’ नमण्याची चिन्हे दिसत नसल्याने एआयएफएफने या स्पर्धेसाठी स्वत:च्या हिमतीवर संघ पाठविणार असल्याचे जाहीर केले आहे. 

जागतिक क्रमवारीत ९७व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला विश्वचषक पात्रता फेरीचे दार काही उघडता आलेले नाही. त्यामुळे एआयएफएफला नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागते. अलीकडील काही वर्षांत भारतीय फुटबॉलमध्ये बरीच सुधारणा झाली. मात्र, संघाला हवा तसा पाठिंबा मिळत नसल्याने क्रिकेट, हॉकीच्या तुलनेत फुटबॉलची पिछेहाट थांबताना दिसत नाही. आयओए व एआयएफएफमधील वादामुळे हाच मुद्दा पुन्हा नव्याने समोर आला आहे. भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या नियमांनुसार, कुठल्याही स्पर्धेच्या क्रमवारीत १ ते ८ या दरम्यान राष्ट्रीय संघ असेल, तरच त्या स्पर्धेत सहभागी होण्यास मान्यता दिली जाते. सध्या भारतीय संघ आशियाई फुटबॉल क्रमवारीत १४व्या स्थानावर आहे. त्यामुळे आयओएच्या नियमांत संघाची कामगिरी बसत नाही. साहजिकच संघाला आशियाई फुटबॉल स्पर्धेत सहभागी होण्यास नकार देण्यात आला.

या प्रकारानंतर भडकलेल्या एआयएफएफने भारतीय आॅलिम्पिक संघटनेला फुटबॉलचा गंध नसल्याची बोचरी टीका केली. आम्ही क्रमवारीत पिछाडीवर असल्याचे मान्य करतो. मात्र, आम्हाला अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधीच मिळत नसेल, तर खेळाडूंना मातब्बर संघांविरुद्ध खेळण्याचा अनुभव तरी कसा मिळणार? असे अनुभव मिळाल्याशिवाय कोणत्याही देशाच्या क्रीडा विश्वाचा विकास होत नाही. फुटबॉल हा सर्वांत मोठा खेळ असून तो २१२ देश खेळतात. सध्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पाच आशियाई संघ सहभागी झाले आहेत. भारतीय संघाला ही मजल मारण्यासाठी बरीच वर्षे वाट पाहावी लागेल. त्यासाठी खेळाडूंच्या कौशल्य विकासाकरिता मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभाग महत्त्वाचा ठरतो.

- प्रशिक्षक व खेळाडूंच्या कठोर परिश्रमांमुळे भारतीय फुटबॉल संघाने १७३व्या क्रमांकावरून ९७व्या स्थानापर्यंत सुधारणा केली आहे.

- आयएसएलसारख्या स्पर्धांतील विदेशी खेळाडू, प्रशिक्षकांच्या सहभागामुळे राष्ट्रीय खेळाडूंना तांत्रिकदृष्ट्या सुधारणा करण्याचा मोठा अनुभव मिळतो.

- भारतात ब-यापैकी फुटबॉल संस्कृती रुजलेली असतानाही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघाचे प्रदर्शन निराशाजनकच राहिले आहे.

- ही स्थिती बदलण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच खेळाडूंसाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतSportsक्रीडा