शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

FIFA U-17 World Cup : चुरशीच्या लढतीत भारताचा 2-1नं पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 22:53 IST

१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर यजमान भारतीय संघाला दुस-या सामन्यात कोलंबियाविरुद्ध 2-1नं पराभवाला सामोर जावं लागलं आहे

नवी दिल्ली - १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर यजमान भारतीय संघाला दुस-या सामन्यात कोलंबियाविरुद्ध 2-1नं पराभवाला सामोर जावं लागलं आहे. येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारतानं कोलंबियाला चांगलीच टक्कर दिली. कोलंबियानं पहिला गोल करत भारतीय संघावर दडपण निर्माण केलं. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही भारताचा एकतर्फी पराभव होईल असे वाटत असतानाच भारतानं गोल नोंदवत सामन्यात बरोबरी केली. मात्र पुढच्याच क्षणाला कोलंबियानं गोल नोंदवत भारतावर आघाडी घेतली. त्यानंतर त्यांनी शेवटपर्यंत भारताला संधी दिली नाही. आणि भारतानं हा सामना 2-1 अशा फरकानं गमावला.  लागोपाठ दोन सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागल्यामुळे या स्पर्धेत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवण्याच्या भारताच्या मनसुब्यांवर पाणी फिरलं आहे. साखळी फेरीत भारत आपला शेवटचा सामना घानाविरुद्ध 12 ऑक्टोबरला खेळणार आहे. त्यामुळे आपला शेवटचा सामना जिंकून भारत या स्पर्धेचा शेवट गोड करतो का हे पहावं लागणार आहे.पहिल्या सत्रात भारतीय संघाने कोलंबियाच्या संघाला चांगलच झुंजवलं. पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आलं. कोलंबियाच्या खेळाडूंनी केलेलं आक्रमण यजमान संघाचा गोलकिपर धीरज सिंहने मोठ्या शिताफीने परतवून लावलं. पहिल्या सत्रात कोलंबियाच्या संघाला एकही गोल करु न देण्यात धीरज सिंहचा मोठा वाटा होता. त्याने कोलंबियाच्या खेळाडूंनी मारलेले सुरेख फटके गोलपोस्टमध्ये जाण्यापासून रोखले. पहिल्या सत्रात भारतीय खेळाडूंनीही कोलंबियावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न हे फोल ठरले.मात्र दुसऱ्या सत्रात कोलंबियाच्या खेळाडूंनी आपल्या आक्रमणात आणखी धार आणत 48 व्य़ा मिनीटाला आपला पहिला गोल झळकावला. ज्युआन पेनालोझाने पहिला गोल झळकावत कोलंबियाला आघाडी मिळवून दिली. कोलंबियाच्या या आक्रमणामुळे भारतीय संघ काहीसा बॅकफूटवर गेलेला पहायला मिळाला. यानंतर भारतीय संघाने कोल्हापूरचा खेळाडू अनिकेत जाधवला संघात जागा दिली. मात्र भारतीय खेळाडूंना गोल करण्यात यश येत नव्हतं. अखेर 82 व्या मिनीटाला जॅक्सन सिंहने ही कोंडी फोडत हेडरवर सुरेख गोल झळकावत सामन्यात बरोबरी साधली. हा भारताचा विश्वचषक स्पर्धेतला पहिला गोल ठरला.मात्र यानंतर अवघ्या एका मिनीटाच्या आत भारतीयांच्या आनंदावर विरझण पडलं. पहिल्या गोलनंतर जल्लोषात रमलेल्या भारतीय खेळाडूंचा फायदा उचलत कोलंबियाच्या खेळाडूंनी भारतीय गोलपोस्टवर आक्रमण केलं. 83 व्या मिनीटाला ज्युआन पेनालोझाने सामन्यात आणखी एक गोल झळकावत कोलंबियाला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. कोलंबियाच्या या गोलदरम्यान भारताच्या बचावफळीचा एकही खेळाडू आपल्या जागेवर हजर नव्हता. याचा फायदा उचलत कोलंबियाने पुन्हा एकदा सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.

टॅग्स :Footballफुटबॉल2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017