शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

एका मिरचीचा जगभरातला प्रवास..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 06:07 IST

Food: ‘कानामागून आली आणि तिखट झाली’ ही म्हण अस्तित्वात आली ती मिरच्यांच्या संदर्भात. अवघ्या पाचेकशे वर्षांपूर्वी भारतात आगमन होण्यापासून ते आज भारत लाल मिरच्यांचा जगातला सर्वात बडा निर्यातदार बनण्यापर्यंतचा हा  प्रवास भलताच नवलपूर्ण.

-  मेघना सामंत (लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)‘कानामागून आली आणि तिखट झाली’ ही म्हण अस्तित्वात आली ती मिरच्यांच्या संदर्भात. अवघ्या पाचेकशे वर्षांपूर्वी भारतात आगमन होण्यापासून ते आज भारत लाल मिरच्यांचा जगातला सर्वात बडा निर्यातदार बनण्यापर्यंतचा हा  प्रवास भलताच नवलपूर्ण. सोळाव्या शतकापर्यंत भारतीय उपखंडाला मिरची कशी असते हेच ठाऊक नव्हतं असं म्हटलं की, आजही अनेकांचा विश्वास बसत नाही. पण खाद्य इतिहासकारांचं एकमत आहे की, भारतीय स्वयंपाकाला पोर्तुगीजांनीच मिरचीचा परिचय घडवला. तिकडे कोलंबस चटकदार मसाल्यांच्या शोधात निघालेला. विशेषतः भारतीय काळ्या मिरीच्या. पण त्याचं तारू भरकटलं आणि तो पोचला मध्य अमेरिकेच्या किनाऱ्यावर. तिथे इतरही भरपूर एक्झॉटिक झाडा-पिकांची मांदियाळी त्याची वाट पाहत होती म्हणा. पण, सगळ्यात आवडली ती मिरची.काळ्या मिरीशी या मिरचीचा झणका थोडा मिळताजुळता. काळी नाही तर नाही, हिरवी चालेल म्हणून हिलाच ‘पेपर’ हे नाव चिकटलं. तिथून मिरची युरोपला पोचली. सपक फिरंगी जेवणाला मिरचीची गरजच होती. त्या काळात भारतीय काळ्या मिरीचे भाव युरोपात सोन्याच्या तोडीचे झालेले, अशा वेळी थोड्या फिकट कॅप्सिकमचा पर्याय त्यांना पसंत पडला.तिथून मग मिरचीची भ्रमंती सुरू झाली. भारतातही तिचा प्रवेश झाला तो पोर्तुगीजांनी गोव्यावर आक्रमण केलं त्यावेळी. इथे आधी काळ्या मिरीशी ओळख असल्यामुळे या नव्या तिखट शेंगेला ‘मिरशेंग/ मिरश्यांग’ असं नाव पडलं. त्यावरूनच आला ‘मिरची’ हा शब्द.पोर्तुगीजांनी स्वतःसोबत आणलेली बटाटा, अननस, टोमॅटो अशी नवनवी पिकं इथे रुळायला, इथल्या स्वयंपाकात सामावून जायला कमीअधिक वेळ लागला ; पण, मिरचीने बाजी मारली. इथल्या मातीत ती जोमाने रुजली. स्वयंपाकघरांत तिच्याविना पान हालेना. आधी गोवा-महाराष्ट्र, नंतर संपूर्ण दक्षिण भारत तिने पादाक्रांत केला. खरंखोटं माहिती नाही पण, असं म्हणतात की, शिवाजी महाराजांच्या युद्धमोहिमांमुळे उत्तर भारताला मिरचीशी तोंडओळख झाली. जेवणातल्या मिरचीमुळे मराठी सैन्य अधिक त्वेषाने लढू शकतं असा उत्तरेकडे समज होता... (पूर्वार्ध)(askwhy.meghana@gmail.com)

टॅग्स :foodअन्न