शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

एका मिरचीचा जगभरातला प्रवास..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 06:07 IST

Food: ‘कानामागून आली आणि तिखट झाली’ ही म्हण अस्तित्वात आली ती मिरच्यांच्या संदर्भात. अवघ्या पाचेकशे वर्षांपूर्वी भारतात आगमन होण्यापासून ते आज भारत लाल मिरच्यांचा जगातला सर्वात बडा निर्यातदार बनण्यापर्यंतचा हा  प्रवास भलताच नवलपूर्ण.

-  मेघना सामंत (लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)‘कानामागून आली आणि तिखट झाली’ ही म्हण अस्तित्वात आली ती मिरच्यांच्या संदर्भात. अवघ्या पाचेकशे वर्षांपूर्वी भारतात आगमन होण्यापासून ते आज भारत लाल मिरच्यांचा जगातला सर्वात बडा निर्यातदार बनण्यापर्यंतचा हा  प्रवास भलताच नवलपूर्ण. सोळाव्या शतकापर्यंत भारतीय उपखंडाला मिरची कशी असते हेच ठाऊक नव्हतं असं म्हटलं की, आजही अनेकांचा विश्वास बसत नाही. पण खाद्य इतिहासकारांचं एकमत आहे की, भारतीय स्वयंपाकाला पोर्तुगीजांनीच मिरचीचा परिचय घडवला. तिकडे कोलंबस चटकदार मसाल्यांच्या शोधात निघालेला. विशेषतः भारतीय काळ्या मिरीच्या. पण त्याचं तारू भरकटलं आणि तो पोचला मध्य अमेरिकेच्या किनाऱ्यावर. तिथे इतरही भरपूर एक्झॉटिक झाडा-पिकांची मांदियाळी त्याची वाट पाहत होती म्हणा. पण, सगळ्यात आवडली ती मिरची.काळ्या मिरीशी या मिरचीचा झणका थोडा मिळताजुळता. काळी नाही तर नाही, हिरवी चालेल म्हणून हिलाच ‘पेपर’ हे नाव चिकटलं. तिथून मिरची युरोपला पोचली. सपक फिरंगी जेवणाला मिरचीची गरजच होती. त्या काळात भारतीय काळ्या मिरीचे भाव युरोपात सोन्याच्या तोडीचे झालेले, अशा वेळी थोड्या फिकट कॅप्सिकमचा पर्याय त्यांना पसंत पडला.तिथून मग मिरचीची भ्रमंती सुरू झाली. भारतातही तिचा प्रवेश झाला तो पोर्तुगीजांनी गोव्यावर आक्रमण केलं त्यावेळी. इथे आधी काळ्या मिरीशी ओळख असल्यामुळे या नव्या तिखट शेंगेला ‘मिरशेंग/ मिरश्यांग’ असं नाव पडलं. त्यावरूनच आला ‘मिरची’ हा शब्द.पोर्तुगीजांनी स्वतःसोबत आणलेली बटाटा, अननस, टोमॅटो अशी नवनवी पिकं इथे रुळायला, इथल्या स्वयंपाकात सामावून जायला कमीअधिक वेळ लागला ; पण, मिरचीने बाजी मारली. इथल्या मातीत ती जोमाने रुजली. स्वयंपाकघरांत तिच्याविना पान हालेना. आधी गोवा-महाराष्ट्र, नंतर संपूर्ण दक्षिण भारत तिने पादाक्रांत केला. खरंखोटं माहिती नाही पण, असं म्हणतात की, शिवाजी महाराजांच्या युद्धमोहिमांमुळे उत्तर भारताला मिरचीशी तोंडओळख झाली. जेवणातल्या मिरचीमुळे मराठी सैन्य अधिक त्वेषाने लढू शकतं असा उत्तरेकडे समज होता... (पूर्वार्ध)(askwhy.meghana@gmail.com)

टॅग्स :foodअन्न