शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

स्थलांतरित पक्ष्यांची अजूनही कोल्हापूरकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2020 11:18 AM

environment birdsweek, wildlife, kolhapur पश्चिम घाटातील सर्वांत समृद्ध भाग म्हणून ओळख असल्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या परदेशी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या नैसर्गिक अधिवासांना धोका पोहोचत असल्यामुळे घटत चालली आहे. दरवर्षी ऑक्टोबरअखेरीस येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी यंदाही पाठ फिरवली आहे. ही लक्षणे म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने धोक्याची घंटा असल्याचे पक्षीप्रेमींचे मत आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक अधिवासाला धोका पर्यावरणदृष्ट्या धोक्याची घंटा 

संदीप आडनाईककोल्हापूर : पश्चिम घाटातील सर्वांत समृद्ध भाग म्हणून ओळख असल्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या परदेशी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या नैसर्गिक अधिवासांना धोका पोहोचत असल्यामुळे घटत चालली आहे. दरवर्षी ऑक्टोबरअखेरीस येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी यंदाही पाठ फिरवली आहे. ही लक्षणे म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने धोक्याची घंटा असल्याचे पक्षीप्रेमींचे मत आहे.पक्षीनिरीक्षक हिमांशू स्मार्त, सतपाल गंगलमाले यांच्या चमूने गेल्या चार दिवसांत कळंबा आणि रंकाळा परिसरात आलेल्या पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत. त्यांना अनेक स्थलांतरित पक्षी यंदा आढळलेले नाहीत. २०१४ पासून हे पक्षीप्रेमी रंकाळ्यावरच्या नोंदी घेत आहेत. २०१९ पर्यंत सुमारे ३६ पक्ष्यांची नोंद त्यांच्याकडे आहे, परंतु यावेळी केवळ ११ प्रजातींचीच नोंद झालेली आहे.कोल्हापुरात येणाऱ्या पक्ष्यांमध्ये बहुसंख्येने युरोपियन, सैबेरियन पक्षी आहेत. याशिवाय पठारावर आढळणारे शिकारी पक्ष्यांचीही नोंद झालेली आहे, परंतु आता ही संख्याही कमी झाली आहे. मॉन्टीगिव्ह हारिण हा शिकारी पक्षी सध्या दिसतो, पण अजून काही पक्षी आढळलेले नाहीत.या ठिकाणी आहे पक्ष्यांचा अधिवास :कळंबा, रंकाळा, पन्हाळा, आंबा, राधानगरी, गगनबावडा, चांदोली, तिलारी, आंबोली या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास आहे.कोल्हापुरात नोंदवलेले स्थलांतरित पक्षीपाणपक्षी : पिवळा धोबी, पांढरा धोबी, करडा धोबी, भुवई बदक, साधी तुतारी, कैकर, युरेशियन दलदल हारिण.झुडूपवर्गीय पक्षी : वेळूतला दंगेखोर वटवट्या, ब्लिथचा वेळूतला वटवट्या, काळ्या डोक्याचा कहुआ, सायबेरियन स्टोन चॅट, सुलोही.ही आहेत कारणे...पाणवठ्याच्या आणि दलदलीच्या कमी झालेल्या जागा, पाण्यातील वाढते प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, रस्ते विकास प्रकल्प यामुळे या पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. मोठमोठी विकासकामे, मानवी हस्तक्षेप होऊ लागल्याने पक्ष्यांना ही ठिकाणे सुरक्षित वाटत नाहीत. शहरातील तळ्यांवर मानवी वावर वाढला आहे. रंकाळा, कळंबा येथे फिरायला येणाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे.

रंकाळा आणि कळंबा या दोन तलावांमुळे जैवविविधता टिकून आहे. कोल्हापुरात येणारे बहुतेक पक्षी हे झाडांवर आढळणारे आणि पाण्यात विहरणारे आहेत, पण यंदा पावसाळा अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे दलदलीच्या जागा आढळत नाहीत, त्यामुळे नियमित येणारे काही पक्षी आढळत नाहीत.- हिमांशू स्मार्त, पक्षीनिरीक्षक.

 

 

टॅग्स :environmentपर्यावरणbirds sanctuaryपक्षी अभयारण्यwildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर