शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Good News : गेल्या चार वर्षांत विस्तारले देशातील वृक्ष आणि वनक्षेत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 1:33 PM

जगात ज्या देशांमध्ये गेल्या काही काळात वनक्षेत्राममध्ये वाढ झाली आहे, अशा देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये घटत जाणारे वनक्षेत्र ही पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरलेली आहे. मात्र भारतासाठी या आघाडीवर चांगली बातमी आली असून, गेल्या चार वर्षांमध्ये देशातील वनक्षेत्रामध्ये सुमारे 13 हजार चौरस किमी एवढी वाढ झाल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. भारतातीलजंगलांच्या स्थितीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या ''इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2019'' मध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार जगात ज्या देशांमध्ये गेल्या काही काळात वनक्षेत्राममध्ये वाढ झाली आहे, अशा देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. दिल्लीसारख्या शहरी परिसरातही वनक्षेत्र वाढले असून, सागरी क्षेत्रामध्येही वनांचा विस्तार झाला आहे.  भारतात 2017 च्या तुलनेत 5 हजार 199 चौरस किमी परिसरात जंगल आणि वृक्षांचा विस्तार वाढला आहे. त्यामध्ये सुमारे  9 हजार 976 चौकिमी क्षेत्रात वनाच्छादन वाढले आहे. तर 1212 चौकिमी क्षेत्रात वृक्षांचा विस्तार झाला आहे.  यासंदर्भातील अहवाल  दर दोन वर्षांनी प्रसिद्ध होत असतो.  या अहवालानुसार देशातील एकूण सात लाख 12 हजार 249 चौकिमी एवढा भूभाग वनाच्छादित आहे. ही आकडेवारी देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 21.67 टक्के एवढे आहे. पूर्वोत्तर भागातील पाच राज्यांमध्ये वनक्षेत्र घटले आहे. येथे आधीच्या काळात बऱ्यापैकी घनदाट जंगले होती.  पूर्वोत्तर भारतातील वनक्षेत्रात 765 चौकिमी एवढी घट झाली आहे. याबाबत असे सांगण्यात आले की येथो अजूनही 70 ते 80 टक्के एवढे वनक्षेत्र कायम आहे. विशेष बाब म्हणजे प्रदूषणाचा सामना करत असलेल्या राजधानी दिल्लीमध्येही वनक्षेत्र विस्तारले आहे. यापूर्वी दिल्लीतील वनक्षेत्र हे 305.41 चौकिमी होते. त्यात आता वाढ होऊन ते 324.44 चौकिमी एवढे झाले आहे. दक्षिण दिल्ली परिसरात विशेष करून वनक्षेत्राची वाढ झाली आहे. 

 समुद्राजवळ असलेल्या किनारी भागातही वनक्षेत्र विस्तारले आहे. खारफुटीच्या वनांमध्ये गेल्या दोन वर्षांत 54 चौकिमी एवढी वाढ झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि ओदिशा या राज्यांमध्ये खारफुटीच्या वनांमध्ये वाढ झाली आहे. देशातील एकूण 6.5 लाख गावांपैकी सुमारे 1.7 लाख गाव हे वनांजवळ वसलेले आहेत. तसेच देशात वृक्षारोपनाबाबत वाढत असलेल्या जागरुकतेमुळे शहर आणि ग्रामीण भागांत वनक्षेत्राबाहेरही वनक्षेत्र विस्तारत आहे. 2017 मध्ये वनक्षेत्राबाहेर सुमारे एक लाख 94 हजार 507 चौकिमी एवढे वनक्षेत्र होते. आता त्यात वाढ होऊन ते एक लाख 98 हजार 813 चौकिमी पर्यंत पोहोचले आहे.  तसेच गेल्या काही वर्षांत जंगलांमध्ये लागणाऱ्या आगींमध्येही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये वनक्षेत्राचा लक्षणीय विस्तार झाला आहे. 

टॅग्स :forestजंगलIndiaभारतenvironmentपर्यावरण