शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

Ganesh Festival 2019 : बदलता गणेशोत्सव आणि सामाजिक पर्यावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 10:20 AM

गणेशोत्सव आणि समाज यांचे नाते अमर आहे. अनादि काळापासून प्रस्थापित असलेल्या गणेश आणि त्याच्या उत्सवाचे लोकमान्य टिळकांनी नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले.

यादव तरटे पाटील

अमरावती - गणेशोत्सव आणि समाज यांचे नाते अमर आहे. अनादि काळापासून प्रस्थापित असलेल्या गणेश आणि त्याच्या उत्सवाचे लोकमान्य टिळकांनी नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले. मात्र, या गणेशोत्सवाचे स्वरूप आणि त्याचा आयाम आता पूर्णपणे बदलला आहे. काही अपवाद वगळता या उत्सवाच्या उपयुक्ततेकडे आपले सपशेल दुर्लक्ष झाले आहे. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे मातीच्या जागी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचा शिरकाव होय. त्यातून निर्माण झालेल्या प्रदूषणाच्या समस्या म्हणजे एक वेगळेच आवाहन आपल्या समोर निर्माण झाले आहे. सजावटीकरिता प्लास्टिक, थर्माकॉल आणि विघटन न होणाऱ्या साहित्याचा वापर तसेच रासायनिक रंगाचा वापर, अतिरेकी गुलाल उधळण या सर्व प्रकारामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.

ज्या भावनेतून गणेशोत्सवाची निर्मिती झाली त्याच समाजाचे आरोग्यही यातून धोक्यात येत आहे. आपल्या अतिशय महत्त्वाच्या मुख्य गरजा म्हणजे प्राणवायू, प्राणी आणि अन्न... आणि याच नेमक्या धोक्यात येत आहेत. गणेशोत्सवातून होणारे जल, ध्वनी आणि हवेचे प्रदूषण यामुळे केवळ आपलेच नाही तर पृथ्वीचे आरोग्यसुद्धा धोक्यात येत आहे. गणेशोत्सवानंतर पाण्यात न विरघळलेल्या व भंगलेल्या गणेशमूर्ती आपल्याला दिसतात. हे बघून कोण्याही गणेशभक्ताचे मन उद्विग्न झाल्याशिवाय राहणार नाही.

रासायनिक रंग अधिक भयंकर

रासायनिक रंगांनी मूर्ती रंगवल्या जातात हे अधिक भयंकर वास्तव आहे. जल, ध्वनि प्रदूषण आणि मानवी आरोग्यावर याचा दुष्परिणाम होतो आहे.मूत्रसंस्थेचे कार्य, डोळ्यांचे विकार, कर्करोग तर अनेक त्वचेचे आजारदेखील यातून संभवतात. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पाणी प्रदूषित होतेच. शिवाय मातीचा पोतही खराब होतो.

(लेखक दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत)

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवenvironmentपर्यावरण