शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

Ganesh Festival 2019 : हवेतील प्रदूषण टाळून गणेशोत्सव साजरा करायला हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 10:07 IST

मानवी हस्तक्षेपाने थोडेफार प्रदूषण होतेच ते दुरुस्त करण्याची प्रतिभा मुळातच निसर्गात असते; परंतु काही वेळा मर्यादेपलीकडे जाऊन प्रदूषण होते

बी. एन. शिंदे

अहमदनगर -  मानवी हस्तक्षेपाने थोडेफार प्रदूषण होतेच ते दुरुस्त करण्याची प्रतिभा मुळातच निसर्गात असते; परंतु काही वेळा मर्यादेपलीकडे जाऊन प्रदूषण होते. ते आक्राळ-विक्राळ रूप धारण करते. मानवासह जिवाणूंनाही ते घातक ठरते. 

गणेशोत्सव आपल्याकडे पारतंत्र्यात सुरू झाला. लोक यामुळे एकत्र आले. प्रबोधनाबरोबरच ब्रिटिशांविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचा हेतूही सफल झाला; परंतु अलीकडे अफाट लोकसंख्या असलेल्या शहरी भागात उत्सव साजरे होतात. त्यातून ध्वनी, माती, पाणी, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रदूषणाबरोबर हवेचेही प्रदूषण प्रचंड वाढले. त्यामुळे नवनवीन समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. अलीकडे मंडळांची संख्या भरमसाट वाढून मंडपांचा अतिरेक होऊन मूलत: कार्बनडाय ऑक्साईड धूर व वाढलेल्या तापमानाची भर पडून हवा अधिक प्रदूषित होते. या उत्सवात मुंबई पुण्यातून अनेक लोक सुटी घेऊन खेड्यात येतात, तर खेड्यातील लोक पाहुणे म्हणून मोटारीने शहरात जातात. त्यामुळे इंधनाचे ज्वलन कित्येक पटीने वाढते. वाहतूक कोंडीमुळे हवा जास्तच प्रदूषित होऊन दम्यासारखे आजार बळावतात़ प्रचंड गर्दीच्या शहरात गणेशोत्सवात लाखो लोक ये-जा करतात. या काळात इंधन ज्वलन वाढते शिवाय विद्युत रोषणाईसाठी विजेचा वारेमाप वापर होतो. त्यामुळे प्रदूषणाबरोबर तापमान वाढून हवामानात बदल होतो.

पर्यावरणपूरक उत्सव

विसर्जनावेळी निर्माल्य, केमिकल असलेल्या गणेशमूर्ती पाण्यात टाकल्यामुळे पाण्याबरोबर संयोग होऊन नवनवीन धातू वातावरणात मिसळतात़ सार्वजनिक गणपती उत्सवामुळे कलाविष्कार, उत्साह, सांस्कृतिक ऐक्य व काही प्रमाणात प्रबोधन जरूर होते; पण ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. ते मागे पडून सर्व प्रकारचे प्रदूषण वाढते का, याचा विचारही व्हायला हवा. प्रदूषणाला फाटा देऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची आवश्यकता आहे.

आजार पसरतात

निर्माल्य, प्रसाद आदी वस्तू जवळपास टाकल्या जातात. हा उत्सव हवा शांत असताना पावसाळ्यात येतो. त्यामुळे निर्माल्यामुळे विविध वस्तू जागेवरच सडतात. परिणामी, दुर्गंधी पसरते. त्यामुळे परिसरात अनेक साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण होते.

गणरायाला निरोप देताना फटाके फोडण्याची गणेश मंडळांत स्पर्धा लागते. त्यातून धूर, धूळ, कचरा आणि कार्बनडाय ऑक्साईड, कार्बन मेनाक्साईड यासारखे विषारी वायू पसरून हवा अधिक प्रदूषित होते.

(लेखक हवामानतज्ज्ञ आहेत)

 

 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेशोत्सवpollutionप्रदूषण