शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

World Environment Day : पर्यावरणाची अधोगती ठरतेय घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 10:29 IST

एकेकाळी दंडाकारण्य अशी ओळख मिरविणाऱ्या नाशिकची अवस्था मागील वीस वर्षांत इतिहासजमा झाली. जमिनीची धूप आणि तापमान वाढत गेले. पर्जन्यमानाचा समतोलही बिघडला अशा अनेक पर्यावरणीय समस्यांना दुर्दैवाने नाशिककरांनाही आता तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरणाची अधोगती रोखण्यासाठी नागरिकांनी स्वार्थी विचार बाजूला सारणे गरजेचे आहे.

अझहर शेख

नाशिकनाशिकच्या हवामानापासून तर गोदावरी नदीपर्यंत या मागील वीस वर्षांमध्ये कमालीचा बदल झालेला दिसून येतो. हवामान तज्ज्ञांच्या मते नाशकात या वीस वर्षांमध्ये हवेची गुणवत्ता अधिकाधिक खराब होत गेली. तसेच वायू, ध्वनी प्रदूषणातही भर पडली. जल तज्ज्ञांच्या मते जलप्रदूषण रोखण्यास या कालावधीत नाशिककरांसह यंत्रणा अपयशी ठरली.

नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर गोदावरीचे  उगमस्थान असून नाशिकचे अस्तित्व व ओळख देशभरात ज्या गोदावरीमुळे आहे, त्या गोदावरीची घुसमटदेखील जन्मस्थळापासूनच सुरू होते. गोदावरी प्रदूषण थेट न्यायालयात पोहचले असले तरीदेखील शासकिय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना गोदावरी नदी संवर्धनाबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत या मागील वीस वर्षांत फारसे यश आलेले नाही. परिणामी गोदेची अवस्था तर बिकट होतच गेली मात्र तिच्या उपनद्याही संकटात सापडल्या. सर्रासपणे शहरातील मैला वाहून नेणारी मलवाहिनी अशी सध्या गोदावरीची अवस्था झाली आहे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही.

जैवविविधता विकसित होत असताना वाढत्या शहरीकरणांतर्गत होणाऱ्या रस्ते विकासांमुळे येथील निसर्गाला हानी पोहचण्यास सुरुवात झाली. मागील पंधरा वर्षात यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले. निसर्गाची हानी रोखण्यासाठी शाश्वत विकासाची कास धरण्यास शासकिय व राजकिय इच्छाशक्ती अपुरी पडली. गावाबाहेरील खुरट्या जंगलात राहणारा बिबट्या आता शहराजवळील मळे भागात ऊसशेतीत आश्रयाला आला अन् शेवटी दोषीही तोच ठरविला जातो, अशी खंत वन्यजीवप्रेमी वैभव भोगले यांनी व्यक्त केले.

वीस वर्षांपुर्वी शहराच्या अवतीभोवती वृक्षराजी बहरलेली दिसत होती ती आता बरीच नाहीसी झाली आहे. शहालगत जंगलांची वाढ चांगली होती. शेतीचा हरित पट्टाही प्रचंड विस्तारलेला दिसत होता. सिमेंट-कॉँक्रीटचे जंगल मर्यादित होते. सीबीएस ते मुंबईनाक्यापर्यंतचा परिसरसुध्दा त्यामुळे शहराचे तापमान उन्हाळ्यात कधीही ३७अंशाच्या पुढे सरकले नाही; मात्र मागील सहा ते सात वर्षांमध्ये या तापमानाने चाळीशीही पार केल्याच्या नोंदी आहेत. नुसती हिरवळ आणि पर्यावरणपुरक वृक्षांची लागवड यामध्ये फरक आहे, हा फरक जोपर्यंत समजून घेतला जात नाही, तोपर्यंत जमिनीची धूप कमी होऊन  पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही, असे मत वृक्ष अभ्यासक शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

सन २००० ची स्थिती

१. २००५ सालानंतर पर्ज्यन्यमान शहरासह जिल्ह्यात घसरले.

२. शहर व जिल्ह्यातून निसर्गाचा सफाई कामगार गिधाड नाहीसा झाला.

३. गोदाकाठी तसेच शहराच्या अवतीभोवती समृध्द पक्षीजीवन पाहावयास मिळत होते.

४.२०१२ पासून सातत्याने उन्हाळ्यात कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार सरकला.

५.मलनिस्सारण केंद्रांची संख्या तोकडी आणि अवस्था बिकट. परिणामी गोदा प्रदूषणाचा स्तर उंचावला.

६. २००५ साली एफएसआयच्या अहवालानुसार जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत केवळ ७.१८ टक्के वनाच्छादन होते.

सध्याची स्थिती

१. २०१७ सालापासून पर्जन्यमानात काहीशी सुधारणा झाली; मात्र असमतोल जैसे-थे.

२. २०१२ सालापासून जिल्ह्यात गिधाडे पुन्हा दिसू लागली.

३. पक्ष्यांना निवारा व खाद्य देणारी वृक्ष प्रजाती कमालीची घटल्याने पक्षीजीवन धोक्यात आले.

४. गेल्या सात वर्षातील सर्वाधिक ४२.८ इतक्या तापमानाची नोंद मागील वर्षी झाली तर यंदा १५ एप्रिल रोजी ४०.५ अंश तापमान नोंदविले गेले.

५. नवीन मलनिस्सारण केंद्र अस्तित्वात आले; मात्र जुनाट यंत्रणा जैसे-थे.

६. २०१७-२०१९ सालचा एफएसआयने यावर्षी प्रसिध्द केलेल्या अहवालात एकूण वनाच्छादन केवळ ६.९३ टक्के आहे. २०१७ साली ८.५५ टक्के इतके होते.गोदावरीचे प्रदूषण रोखण्यास अद्याप  यश आलेले नाही तर तीच्या उपनद्यांच्या अवस्थेबाबत न बोललेलेच बरे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी शासकिय धोरणांचा अभाव प्रकर्षाणे जाणवतो. मागील वीस वर्षांत नदीकाठालगत झालेला एकतर्फी विकास पर्यावरणाला हानीकारक ठरत आहे. गोदावरीच्या उगमस्थानापासूनच तीची घुसमट सुरू होते, हे दुर्दैवच

- डॉ. प्राजक्ता बस्ते, नदी अभ्यासक

टॅग्स :World Environment DayWorld Environment DayNashikनाशिकpollutionप्रदूषणgodavariगोदावरीenvironmentपर्यावरण