शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

World Environment Day : पर्यावरणाची अधोगती ठरतेय घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 10:29 IST

एकेकाळी दंडाकारण्य अशी ओळख मिरविणाऱ्या नाशिकची अवस्था मागील वीस वर्षांत इतिहासजमा झाली. जमिनीची धूप आणि तापमान वाढत गेले. पर्जन्यमानाचा समतोलही बिघडला अशा अनेक पर्यावरणीय समस्यांना दुर्दैवाने नाशिककरांनाही आता तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरणाची अधोगती रोखण्यासाठी नागरिकांनी स्वार्थी विचार बाजूला सारणे गरजेचे आहे.

अझहर शेख

नाशिकनाशिकच्या हवामानापासून तर गोदावरी नदीपर्यंत या मागील वीस वर्षांमध्ये कमालीचा बदल झालेला दिसून येतो. हवामान तज्ज्ञांच्या मते नाशकात या वीस वर्षांमध्ये हवेची गुणवत्ता अधिकाधिक खराब होत गेली. तसेच वायू, ध्वनी प्रदूषणातही भर पडली. जल तज्ज्ञांच्या मते जलप्रदूषण रोखण्यास या कालावधीत नाशिककरांसह यंत्रणा अपयशी ठरली.

नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर गोदावरीचे  उगमस्थान असून नाशिकचे अस्तित्व व ओळख देशभरात ज्या गोदावरीमुळे आहे, त्या गोदावरीची घुसमटदेखील जन्मस्थळापासूनच सुरू होते. गोदावरी प्रदूषण थेट न्यायालयात पोहचले असले तरीदेखील शासकिय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना गोदावरी नदी संवर्धनाबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत या मागील वीस वर्षांत फारसे यश आलेले नाही. परिणामी गोदेची अवस्था तर बिकट होतच गेली मात्र तिच्या उपनद्याही संकटात सापडल्या. सर्रासपणे शहरातील मैला वाहून नेणारी मलवाहिनी अशी सध्या गोदावरीची अवस्था झाली आहे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही.

जैवविविधता विकसित होत असताना वाढत्या शहरीकरणांतर्गत होणाऱ्या रस्ते विकासांमुळे येथील निसर्गाला हानी पोहचण्यास सुरुवात झाली. मागील पंधरा वर्षात यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले. निसर्गाची हानी रोखण्यासाठी शाश्वत विकासाची कास धरण्यास शासकिय व राजकिय इच्छाशक्ती अपुरी पडली. गावाबाहेरील खुरट्या जंगलात राहणारा बिबट्या आता शहराजवळील मळे भागात ऊसशेतीत आश्रयाला आला अन् शेवटी दोषीही तोच ठरविला जातो, अशी खंत वन्यजीवप्रेमी वैभव भोगले यांनी व्यक्त केले.

वीस वर्षांपुर्वी शहराच्या अवतीभोवती वृक्षराजी बहरलेली दिसत होती ती आता बरीच नाहीसी झाली आहे. शहालगत जंगलांची वाढ चांगली होती. शेतीचा हरित पट्टाही प्रचंड विस्तारलेला दिसत होता. सिमेंट-कॉँक्रीटचे जंगल मर्यादित होते. सीबीएस ते मुंबईनाक्यापर्यंतचा परिसरसुध्दा त्यामुळे शहराचे तापमान उन्हाळ्यात कधीही ३७अंशाच्या पुढे सरकले नाही; मात्र मागील सहा ते सात वर्षांमध्ये या तापमानाने चाळीशीही पार केल्याच्या नोंदी आहेत. नुसती हिरवळ आणि पर्यावरणपुरक वृक्षांची लागवड यामध्ये फरक आहे, हा फरक जोपर्यंत समजून घेतला जात नाही, तोपर्यंत जमिनीची धूप कमी होऊन  पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही, असे मत वृक्ष अभ्यासक शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

सन २००० ची स्थिती

१. २००५ सालानंतर पर्ज्यन्यमान शहरासह जिल्ह्यात घसरले.

२. शहर व जिल्ह्यातून निसर्गाचा सफाई कामगार गिधाड नाहीसा झाला.

३. गोदाकाठी तसेच शहराच्या अवतीभोवती समृध्द पक्षीजीवन पाहावयास मिळत होते.

४.२०१२ पासून सातत्याने उन्हाळ्यात कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार सरकला.

५.मलनिस्सारण केंद्रांची संख्या तोकडी आणि अवस्था बिकट. परिणामी गोदा प्रदूषणाचा स्तर उंचावला.

६. २००५ साली एफएसआयच्या अहवालानुसार जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत केवळ ७.१८ टक्के वनाच्छादन होते.

सध्याची स्थिती

१. २०१७ सालापासून पर्जन्यमानात काहीशी सुधारणा झाली; मात्र असमतोल जैसे-थे.

२. २०१२ सालापासून जिल्ह्यात गिधाडे पुन्हा दिसू लागली.

३. पक्ष्यांना निवारा व खाद्य देणारी वृक्ष प्रजाती कमालीची घटल्याने पक्षीजीवन धोक्यात आले.

४. गेल्या सात वर्षातील सर्वाधिक ४२.८ इतक्या तापमानाची नोंद मागील वर्षी झाली तर यंदा १५ एप्रिल रोजी ४०.५ अंश तापमान नोंदविले गेले.

५. नवीन मलनिस्सारण केंद्र अस्तित्वात आले; मात्र जुनाट यंत्रणा जैसे-थे.

६. २०१७-२०१९ सालचा एफएसआयने यावर्षी प्रसिध्द केलेल्या अहवालात एकूण वनाच्छादन केवळ ६.९३ टक्के आहे. २०१७ साली ८.५५ टक्के इतके होते.गोदावरीचे प्रदूषण रोखण्यास अद्याप  यश आलेले नाही तर तीच्या उपनद्यांच्या अवस्थेबाबत न बोललेलेच बरे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी शासकिय धोरणांचा अभाव प्रकर्षाणे जाणवतो. मागील वीस वर्षांत नदीकाठालगत झालेला एकतर्फी विकास पर्यावरणाला हानीकारक ठरत आहे. गोदावरीच्या उगमस्थानापासूनच तीची घुसमट सुरू होते, हे दुर्दैवच

- डॉ. प्राजक्ता बस्ते, नदी अभ्यासक

टॅग्स :World Environment DayWorld Environment DayNashikनाशिकpollutionप्रदूषणgodavariगोदावरीenvironmentपर्यावरण