शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सारख्या सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
3
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
4
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
5
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
6
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
7
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
8
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
9
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
10
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
11
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
12
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
13
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
14
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
15
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
16
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
17
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
18
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
19
'सैयारा' चित्रपट पाहिला अन् एका गर्लफ्रेंडसाठी दोन तरुण भिडले; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
20
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!

World Environment Day : पर्यावरणाची अधोगती ठरतेय घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 10:29 IST

एकेकाळी दंडाकारण्य अशी ओळख मिरविणाऱ्या नाशिकची अवस्था मागील वीस वर्षांत इतिहासजमा झाली. जमिनीची धूप आणि तापमान वाढत गेले. पर्जन्यमानाचा समतोलही बिघडला अशा अनेक पर्यावरणीय समस्यांना दुर्दैवाने नाशिककरांनाही आता तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरणाची अधोगती रोखण्यासाठी नागरिकांनी स्वार्थी विचार बाजूला सारणे गरजेचे आहे.

अझहर शेख

नाशिकनाशिकच्या हवामानापासून तर गोदावरी नदीपर्यंत या मागील वीस वर्षांमध्ये कमालीचा बदल झालेला दिसून येतो. हवामान तज्ज्ञांच्या मते नाशकात या वीस वर्षांमध्ये हवेची गुणवत्ता अधिकाधिक खराब होत गेली. तसेच वायू, ध्वनी प्रदूषणातही भर पडली. जल तज्ज्ञांच्या मते जलप्रदूषण रोखण्यास या कालावधीत नाशिककरांसह यंत्रणा अपयशी ठरली.

नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर गोदावरीचे  उगमस्थान असून नाशिकचे अस्तित्व व ओळख देशभरात ज्या गोदावरीमुळे आहे, त्या गोदावरीची घुसमटदेखील जन्मस्थळापासूनच सुरू होते. गोदावरी प्रदूषण थेट न्यायालयात पोहचले असले तरीदेखील शासकिय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना गोदावरी नदी संवर्धनाबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत या मागील वीस वर्षांत फारसे यश आलेले नाही. परिणामी गोदेची अवस्था तर बिकट होतच गेली मात्र तिच्या उपनद्याही संकटात सापडल्या. सर्रासपणे शहरातील मैला वाहून नेणारी मलवाहिनी अशी सध्या गोदावरीची अवस्था झाली आहे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही.

जैवविविधता विकसित होत असताना वाढत्या शहरीकरणांतर्गत होणाऱ्या रस्ते विकासांमुळे येथील निसर्गाला हानी पोहचण्यास सुरुवात झाली. मागील पंधरा वर्षात यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले. निसर्गाची हानी रोखण्यासाठी शाश्वत विकासाची कास धरण्यास शासकिय व राजकिय इच्छाशक्ती अपुरी पडली. गावाबाहेरील खुरट्या जंगलात राहणारा बिबट्या आता शहराजवळील मळे भागात ऊसशेतीत आश्रयाला आला अन् शेवटी दोषीही तोच ठरविला जातो, अशी खंत वन्यजीवप्रेमी वैभव भोगले यांनी व्यक्त केले.

वीस वर्षांपुर्वी शहराच्या अवतीभोवती वृक्षराजी बहरलेली दिसत होती ती आता बरीच नाहीसी झाली आहे. शहालगत जंगलांची वाढ चांगली होती. शेतीचा हरित पट्टाही प्रचंड विस्तारलेला दिसत होता. सिमेंट-कॉँक्रीटचे जंगल मर्यादित होते. सीबीएस ते मुंबईनाक्यापर्यंतचा परिसरसुध्दा त्यामुळे शहराचे तापमान उन्हाळ्यात कधीही ३७अंशाच्या पुढे सरकले नाही; मात्र मागील सहा ते सात वर्षांमध्ये या तापमानाने चाळीशीही पार केल्याच्या नोंदी आहेत. नुसती हिरवळ आणि पर्यावरणपुरक वृक्षांची लागवड यामध्ये फरक आहे, हा फरक जोपर्यंत समजून घेतला जात नाही, तोपर्यंत जमिनीची धूप कमी होऊन  पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही, असे मत वृक्ष अभ्यासक शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

सन २००० ची स्थिती

१. २००५ सालानंतर पर्ज्यन्यमान शहरासह जिल्ह्यात घसरले.

२. शहर व जिल्ह्यातून निसर्गाचा सफाई कामगार गिधाड नाहीसा झाला.

३. गोदाकाठी तसेच शहराच्या अवतीभोवती समृध्द पक्षीजीवन पाहावयास मिळत होते.

४.२०१२ पासून सातत्याने उन्हाळ्यात कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार सरकला.

५.मलनिस्सारण केंद्रांची संख्या तोकडी आणि अवस्था बिकट. परिणामी गोदा प्रदूषणाचा स्तर उंचावला.

६. २००५ साली एफएसआयच्या अहवालानुसार जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत केवळ ७.१८ टक्के वनाच्छादन होते.

सध्याची स्थिती

१. २०१७ सालापासून पर्जन्यमानात काहीशी सुधारणा झाली; मात्र असमतोल जैसे-थे.

२. २०१२ सालापासून जिल्ह्यात गिधाडे पुन्हा दिसू लागली.

३. पक्ष्यांना निवारा व खाद्य देणारी वृक्ष प्रजाती कमालीची घटल्याने पक्षीजीवन धोक्यात आले.

४. गेल्या सात वर्षातील सर्वाधिक ४२.८ इतक्या तापमानाची नोंद मागील वर्षी झाली तर यंदा १५ एप्रिल रोजी ४०.५ अंश तापमान नोंदविले गेले.

५. नवीन मलनिस्सारण केंद्र अस्तित्वात आले; मात्र जुनाट यंत्रणा जैसे-थे.

६. २०१७-२०१९ सालचा एफएसआयने यावर्षी प्रसिध्द केलेल्या अहवालात एकूण वनाच्छादन केवळ ६.९३ टक्के आहे. २०१७ साली ८.५५ टक्के इतके होते.गोदावरीचे प्रदूषण रोखण्यास अद्याप  यश आलेले नाही तर तीच्या उपनद्यांच्या अवस्थेबाबत न बोललेलेच बरे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी शासकिय धोरणांचा अभाव प्रकर्षाणे जाणवतो. मागील वीस वर्षांत नदीकाठालगत झालेला एकतर्फी विकास पर्यावरणाला हानीकारक ठरत आहे. गोदावरीच्या उगमस्थानापासूनच तीची घुसमट सुरू होते, हे दुर्दैवच

- डॉ. प्राजक्ता बस्ते, नदी अभ्यासक

टॅग्स :World Environment DayWorld Environment DayNashikनाशिकpollutionप्रदूषणgodavariगोदावरीenvironmentपर्यावरण