शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

CoronaVirus : महानगरांनी घेतला मोकळा श्वास; कोरोनाची आपत्ती प्रदूषण नियंत्रणात ठरली इष्टापत्ती

By गजानन दिवाण | Published: April 15, 2020 1:34 PM

दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या पाहणीत ‘लॉकडाऊन’दरम्यान देशातील सर्वच महानगरांमधील प्रदूषण जवळपास ६१ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे देशातील सर्वच शहरांमधील स्थिती सुधारत आहे.लॉकडाऊनमुळे ही शहरे माणसांना श्वास घेण्यासारखी झाली आहेत.

- गजानन दिवाणऔरंगाबाद : ‘कोरोना’ची आपत्ती प्रदूषण नियंत्रणासाठी इष्टापत्ती ठरली आहे. कुठल्याच कायद्याने, प्रदूषणामुळे जाणाऱ्या मृत्यूच्या भीतीने वा आर्थिक नुकसानीमुळे जे होऊ शकले नाही, ते ‘कोरोना’मुळे झाले. विषारी वायूमध्ये जगणाऱ्या दिल्ली, मुंबईसह देशभरातील सर्वच महानगरांनी मोकळा श्वास घेतला. देशभरातील ‘लॉकडाऊन’मुळे सर्वच महानगरांतील प्रदूषण जवळपास ६१ टक्क्यांनी कमी झाले.

दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या पाहणीत ‘लॉकडाऊन’दरम्यान देशातील सर्वच महानगरांमधील प्रदूषण जवळपास ६१ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे. मुंबईत पीएम (पर्टिक्युलेट मॅटर) २.५ स्तर ६१ टक्के कमी नोंदविला गेला. दिल्लीत २६ टक्के, कोलकात्यात ६० टक्के, तर बंगळुरूमध्ये १२ टक्के कमी नोंद झाली.

जगभरातील ५० अति प्रदूषित शहरांमध्ये भारतातील २५ शहरे असल्याची नोंद गतवर्षी ‘आयक्यूएअर’ या स्वीसमधील संस्थेने केली होती. उद्योगांमुळे, वाहनांमुळे आणि कोळसा प्रकल्पांमुळेच भारतात प्रदूषण वाढत असल्याचे ‘आयक्यूएअर’ने म्हटले होते. आज लॉकडाऊनमुळे देशातील सर्वच शहरांमधील स्थिती सुधारत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १३ एप्रिलच्या नोंदींनुसार नागपूर, भिवंडी, ठाणे, चंद्रपूर, आग्रा, दिल्ली, गुडगाव, गुवाहाटी,  इंदूर, पटणा या शहरांमधील प्रदूषणाची स्थिती सध्या सुधारत आहे. अहमदाबाद, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर या शहरांची स्थिती बरी आहे. अमृतसरमध्ये ठीक, तर बंगळुरू, लुधियाना, चेन्नई, औरंगाबाद आणि अमरावती या शहरांमधील प्रदूषणनियंत्रण चांगल्या स्थितीत आहे. मुंबईचा मार्च २०१९मध्ये एअर क्वालिटी इंडेक्स १५३ होता. म्हणजे आर्थिक राजधानी असलेले हे शहर माणसांना श्वास घेण्यायोग्य नव्हते. दिल्ली (एअर क्वालिटी इंडेक्स १६१)ची स्थिती तर यापेक्षा वाईट होती. लॉकडाऊनमुळे ही शहरे माणसांना श्वास घेण्यासारखी झाली आहेत.

- दिल्ली देशाची राजधानी दिल्लीत लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ५१ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ४९ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ३२ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

- मुंबईमहाराष्ट्राची राजधानी मुंबईत लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ४९ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ४५ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ६० टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

- पुणेमहाराष्ट्रातील पुण्यात लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ३२ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ३१ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ३६ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

- अहमदाबादगुजरातमधील अहमदाबादेत लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ४७ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ५७ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ३२ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

स्रोत - शासनाची ‘सफर डॉट ट्रॉपमेट डॉट रेस डॉट इन’ वेबसाईट (ढोबळमानाने दोन प्रकारचे धूलिकण हवेत असतात. श्वसनामार्फत शरीरात जाणारे २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान असे पीएम २.५ कण आणि श्वसनातून शरीरात न जाणारे १० मायक्रोमीटरपेक्षा लहान पीएम १० कण.)

उद्या वाचा - रस्त्यांवरील आणि हवेतीलही ‘ट्राफिक’ कमी होणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसenvironmentपर्यावरण