शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

साताऱ्यातील ८० टक्के सांडपाणी प्रक्रिया विना थेट जाते ‘वेण्णा’त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:59 AM

जलप्रदूषणासोबतच नदीतील जैवविविधतेचाही ऱ्हास

ठळक मुद्देप्रक्रिया प्रकल्प आकाराला येईना

- प्रगती जाधव-पाटील, सचिन काकडेसातारा : साताऱ्यातील ८० टक्के सांडपाणी वेण्णा नदीत सोडले जात असल्याने नदीसह परिसरातील शेती आणि माणसांचेही आरोग्य बिघडत चालले आहे. सांडपाण्यामुळे जलप्रदूषणासोबतच जैवविविधतेचा ºहास मोठ्या प्रमाणात होत आहे. सातारा पालिकेच्या स्थापनेला तब्बल १६५ वर्षे पूर्ण झाली. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही पालिकेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करता आला नाही.  

सातारा शहराच्या परिसरात कोठेही नदी अथवा मोठा तलाव नाही. त्यामुळे शहराच्या पाण्याची गरज पूर्ण करण्याकरिता प्रारंभी हौदांची उभारणी केली. एकेकाळी शहराला हौदांचे शहर म्हणूनही ओळखले जायचे. संपूर्ण शहराला या हौदांमार्फतच पिण्यासह दैनंदिन कामासाठी पाणीपुरवठा केला जात असे. कालांतराने शहराचा विस्तार वाढत गेला अन् त्याच गतीने लोकसंख्याही. शहरीकरणामुळे पाण्याची उणीव भरून काढण्यासाठी कास तलावाची उभारणी करण्यात आली. खापरी नळांच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा केला जाऊ लागला. पुढे खापरी नळाची जागा बंदिस्त पाईपलाईनने घेतली. सध्या कास योजनेतून शहराला दररोज ५.५० लाख लिटर तर शहापूर योजनेच्या माध्यमातून ७.५० लाख लिटर असा एकूण १३ लाख लिटर पाणीपुरवठा पालिकेमार्फत केला जात आहे.

शहराची एकूण लोकसंख्या १ लाख २० हजार इतकी आहे. यापैकी सुमारे ७० हजार नागरिकांना पालिकेडून तर उर्वरित नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरविले जाते. पालिकेमार्फत प्रतिमाणसी १२५ लिटर तर एका कुटुंबाला सरासरी ५०० लिटर इतका पाणीपुरवठा दररोज केला जातो. एकूण पाण्याचा वापर पाहता तब्बल ८० टक्के पाणी  शौचालय, न्हाणीघर, स्वयंपाकघर, धुणी-भांडी, कारखाने यासह इतर कामकाजासाठी वापरले जाते. हे सांडपाणी बंदिस्त ड्रेनेजच्या माध्यमातून नाले व ओढ्यांमार्फत पुढे वेण्णा नदीत सोडले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेकडून सांडपाणी व्यवस्थापनाबाबत कोणताही प्रकल्प उभारण्यात आला नाही. 

सातारा पालिकेने यंदा भुयारी गटार योजनेचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत केवळ २० ते ३० टक्केच काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्णत्वास येताच शहरात दोन ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा वापरायोग्य केले जाणार आहे. मात्र सध्या या सांडपाण्यामुळे नदीतील जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत आहे. दूषित पाण्यामुळे माशांची नैसर्गिक रचना, रंग बदलत चालला आहे. पूर्वी वेण्णा नदीत काळसर चकचकीत रंगाचे मासे आढळून येत असत. आता निळसर रंगाचे मासे आढळून येतात. त्यांच्या आकारमानातही बदल झाला आहे. नदीत केंजळ व शैवाळाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे माशांचे जैविक खाद्य नष्ट होत चालले आहे. पूर्वी नदीकाठी लहान आकाराचे गवत आढळून यायचे. ही गवती रानं आता घटू लागली आहेत. 

आरोग्य बिघडले माणसांचे : सांडपाणी व्यवस्थापन नसल्याने वर्षभरात नदीकाठच्या तसेच खेड, सदर बझार, लक्ष्मी टेकडी, संगममाहुली, वर्ये या भागात कावीळ, डायरिया तसेच त्वचारोगांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे.

आणि शेतीचेही : सातारा तालुक्यातील संगममाहुली येथे कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम झाला आहे. वेण्णा नदीच्या पाण्यावर सुमारे ३५ ते ४० हजार हेक्टर शेतीक्षेत्र अवलंबून आहे. नदीकाठी वसलेल्या बहुतांश गावांमध्ये स्वत:च्या पाणीयोजना आहेत. मात्र, शेती पूर्णपणे या नदीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. ५० ते ६० टक्के  शेतकरी या पाण्यावर भाजीपाला पिकवितात. आधीच दूषित पाणी, त्यात रासायनिक औषधांची भर पडत असल्याने शेती आणि माणसांचेही आरोग्य बिघडत आहे. 

वाढत्या जलप्रदूषणाचा जितका प्रभाव जलचरांवर, जैवविविधतेवर पडत आहे तितकाच मनुष्यावरदेखील होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लाखो लिटर सांडपाणी दररोज वेण्णा नदीला मिळत आहे. जलप्रदूषण रोखणे गरजेचे आहे. असे न झाल्यास भविष्यात पर्यावरणाची प्रचंड हानी होईल, शिवाय मनुष्याचे अस्तित्वही धोक्यात येईल.  

- सुधीर सुकाळे, पर्यावरणतज्ज्ञ, सातारा

जलप्रदूषण रोखणे ही काळाची गरज ओळखून सातारा पालिकेने भुयारी गटार योजना आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. ही योजना लवकरच मार्गी लागेल. भविष्यात भेडसावणारी जलप्रदूषणाची समस्या कायमस्वरूपी मिटावी यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.  - विशाल जाधव, आरोग्य सभापती, सातारा नगरपालिका 

टॅग्स :Waterपाणीriverनदीpollutionप्रदूषण