शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कुंकू, टिकलीसाठी आग्रही असणारे मराठी शाळांसाठी का नाही?, राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत चिन्मयी सुमित यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 06:33 IST

टिकली लावा, कुंकू लावा असे सांगत त्यासाठी आग्रही असणारे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असणाऱ्या मातृभाषेचा आग्रह धरताना का दिसत नाहीत

मुंबई :

टिकली लावा, कुंकू लावा असे सांगत त्यासाठी आग्रही असणारे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असणाऱ्या मातृभाषेचा आग्रह धरताना का दिसत नाहीत, असा प्रश्न ‘मराठी शाळा आपण टिकविल्या पाहिजेत’च्या सदिच्छादूत असणाऱ्या चिन्मयी सुमित यांनी उपस्थित केला आहे.

मराठी शाळांचे प्रश्न, कमी पटसंख्या दाखवत बंद होणाऱ्या शाळा आणि त्यांचे भविष्यातील अस्तित्व या पार्श्वभूमीवर मराठी शाळा संस्थाचालक संघाने मुंबई विद्यापीठात राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत मराठी शाळा, त्यासाठीची चळवळ आणि सरकारची भूमिका यावर विषयावर चिन्मयी सुमित यांनी आपली भूमिका मांडली. 

चिन्मयी सुमित पुढे म्हणाल्या, मी मराठीतून शिक्षण घेतले, माझ्या मुलांनाही मराठी शाळांमध्ये शिकविले. मात्र, सरकार दरबारी शिक्षण आणि मराठी शाळांचे प्रश्न मांडताना त्यांच्या विविध छटा मला कळू लागल्या आहेत. त्यामुळे या समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी मराठी चळवळीतील विविध संघटनांसाठी एकत्र लढा द्यायला हवा. भाषेला आर्थिक मूल्य आले तरच ती जगणार आहे. शिवाय संकेतस्थळापासून ते विविध खात्यांतील नोकऱ्या, प्रवेश यासारख्या मूलभूत अर्ज प्रक्रिया मराठीतून झाल्यास मराठीचे महत्त्व अधोरेखित होईल, अशा प्रतिक्रियाही आल्या. मराठी शाळांचा प्रश्न राजकीय पटलावर आणला पाहिजे, तरच मराठी शाळा पुन्हा भरभराटीला येतील, असा सूर परिषदेत उमटला.

एकीकडे मुंबई महानगरपालिकांच्या भाषिक शाळा पटसंख्येअभावी बंद होत आहेत, तर दुसरीकडे सीबीएसई, आयसीएसई, आयबी मंडळाच्या शाळा पालिकेकडूनच सुरू केल्या जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे खासगी संस्थेशीही यासाठी करार केले जात आहेत, मात्र मराठी माध्यमात शिकलेल्या व्यक्तींना या शाळांमध्ये नोकऱ्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे मराठी शाळांसाठी न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे, या मुद्द्यांवरही परिषदेत चर्चा झाली.

राज्यभरातील संघटनांची उपस्थिती  मराठी भाषेचे महत्त्व समजून घेतले तर मराठी शाळा टिकणार आहेत, असा सूर उमटला. या परिषदेला राज्यभरातील ४० ते ५० संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चर्चेच्या आधारे शासनाला मराठी शाळांच्या प्रश्नांसंदर्भात निवेदन द्यावे, असा ठराव परिषदेत करण्यात आला आहे. सरकारने पटसंख्येअभावी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे एकमताने ठरवण्यात आले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र