शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कुंकू, टिकलीसाठी आग्रही असणारे मराठी शाळांसाठी का नाही?, राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत चिन्मयी सुमित यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 06:33 IST

टिकली लावा, कुंकू लावा असे सांगत त्यासाठी आग्रही असणारे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असणाऱ्या मातृभाषेचा आग्रह धरताना का दिसत नाहीत

मुंबई :

टिकली लावा, कुंकू लावा असे सांगत त्यासाठी आग्रही असणारे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असणाऱ्या मातृभाषेचा आग्रह धरताना का दिसत नाहीत, असा प्रश्न ‘मराठी शाळा आपण टिकविल्या पाहिजेत’च्या सदिच्छादूत असणाऱ्या चिन्मयी सुमित यांनी उपस्थित केला आहे.

मराठी शाळांचे प्रश्न, कमी पटसंख्या दाखवत बंद होणाऱ्या शाळा आणि त्यांचे भविष्यातील अस्तित्व या पार्श्वभूमीवर मराठी शाळा संस्थाचालक संघाने मुंबई विद्यापीठात राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत मराठी शाळा, त्यासाठीची चळवळ आणि सरकारची भूमिका यावर विषयावर चिन्मयी सुमित यांनी आपली भूमिका मांडली. 

चिन्मयी सुमित पुढे म्हणाल्या, मी मराठीतून शिक्षण घेतले, माझ्या मुलांनाही मराठी शाळांमध्ये शिकविले. मात्र, सरकार दरबारी शिक्षण आणि मराठी शाळांचे प्रश्न मांडताना त्यांच्या विविध छटा मला कळू लागल्या आहेत. त्यामुळे या समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी मराठी चळवळीतील विविध संघटनांसाठी एकत्र लढा द्यायला हवा. भाषेला आर्थिक मूल्य आले तरच ती जगणार आहे. शिवाय संकेतस्थळापासून ते विविध खात्यांतील नोकऱ्या, प्रवेश यासारख्या मूलभूत अर्ज प्रक्रिया मराठीतून झाल्यास मराठीचे महत्त्व अधोरेखित होईल, अशा प्रतिक्रियाही आल्या. मराठी शाळांचा प्रश्न राजकीय पटलावर आणला पाहिजे, तरच मराठी शाळा पुन्हा भरभराटीला येतील, असा सूर परिषदेत उमटला.

एकीकडे मुंबई महानगरपालिकांच्या भाषिक शाळा पटसंख्येअभावी बंद होत आहेत, तर दुसरीकडे सीबीएसई, आयसीएसई, आयबी मंडळाच्या शाळा पालिकेकडूनच सुरू केल्या जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे खासगी संस्थेशीही यासाठी करार केले जात आहेत, मात्र मराठी माध्यमात शिकलेल्या व्यक्तींना या शाळांमध्ये नोकऱ्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे मराठी शाळांसाठी न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे, या मुद्द्यांवरही परिषदेत चर्चा झाली.

राज्यभरातील संघटनांची उपस्थिती  मराठी भाषेचे महत्त्व समजून घेतले तर मराठी शाळा टिकणार आहेत, असा सूर उमटला. या परिषदेला राज्यभरातील ४० ते ५० संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चर्चेच्या आधारे शासनाला मराठी शाळांच्या प्रश्नांसंदर्भात निवेदन द्यावे, असा ठराव परिषदेत करण्यात आला आहे. सरकारने पटसंख्येअभावी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे एकमताने ठरवण्यात आले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र