शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

प्राध्यापकांवर बिगारी काम करण्याची वेळ, भरती तातडीने सुरू करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 08:55 IST

Education News: पीएच.डी. करूनही शिक्षण क्षेत्रात मनासारखी नोकरी न मिळाल्याने ३०-३५ वयातील अनेक तरुण मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी तर कोणी फरशी फिटिंग तर कोणी रस्त्यावर बसून आंब्याची विक्री करताना दिसून येत आहेत.

- चंद्रकांत दडसमुंबई : उच्च शिक्षित झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात करिअर करायचे ठरवून अनेकांनी नेट, सेट परीक्षा दिली. त्यानंतर संबंधित शाखांमधील पीएच.डी.ही संपादित केली. आता या पदवीमुळे तरी नोकरी नक्की लागेल या आशेवर असणाऱ्यांच्या अपेक्षा वास्तवात मात्र मातीमोल ठरल्या आहेत. पीएच.डी. करूनही शिक्षण क्षेत्रात मनासारखी नोकरी न मिळाल्याने ३०-३५ वयातील अनेक तरुण मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी तर कोणी फरशी फिटिंग तर कोणी रस्त्यावर बसून आंब्याची विक्री करताना दिसून येत आहेत. त्यामुळे या पदव्या आमच्या काय कामाच्या, असा उद्विग्न सवाल पीएच.डी.प्राप्त नेट, सेटधारकांनी केला आहे.पीएच.डी. पदवी प्राप्त डॉ. अशोक उके औरंगाबाद येथील महाविद्यालयात सुरुवातीला तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून काम करीत होते. मात्र वर्षाकाठी मिळणाऱ्या अतिशय तुटपुंज्या मानधनामुळे ते सध्या मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी म्हणून काम करीत आहेत. प्राध्यापक म्हणून काम करीत होतो, त्यापेक्षा थोडे अधिक पैसे बिगारी म्हणून काम करताना शिल्लक राहतात, असेही उके यांनी सांगितले. कोल्हापुरातील गारगोटी तालुक्यातील एमलीब, नेट, सेट तसेच व्यवस्थापन पदविकेचे शिक्षण घेतलेल्या शैलेश देसाई यांनी अनेक वर्षे सीएचबी म्हणून तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून महाविद्यालयामध्ये काम केले. मात्र हातात महिन्याकाठी केवळ ८ ते १० हजार रुपये येत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून ते फरशी फिटिंगचे काम करीत आहेत. पीएच.डी. पदवी घेतलेल्या बीड येथील डॉ. अशोक सारंगकर यांनीही नोकरी मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय सुरू केला असून, डॉ. भारतभूषण पंडित हे घरपोच आंबेविक्री करीत आहेत. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या अनेक प्राध्यपकांनी हाच मार्ग सध्या अनुसरला असून, त्यांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ प्राध्यापक भरती उठवून उच्चशिक्षित तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

प्राध्यापक भरती सुरू करण्यासंदर्भात अद्याप आदेश आलेले नाहीत. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यपकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव अद्याप आला नसून, आदेश आल्यानंतर त्याची कार्यवाही केली जाईल.- डॉ. धनराज माने, संचालक, उच्च शिक्षणकोरोनाच्या काळामध्ये शासनाने नियमित प्राध्यापकांचे वेतन दरमहा अदा केलेले आहे; परंतु त्यांच्याप्रमाणेच काम करणारे तासिका तत्त्वावरील प्राध्यापक मात्र मानधनापासून वंचित आहेत.  राज्य सरकारने प्राध्यापक भरती तत्काळ सुरू करावी.- डॉ. किशोर खिलारे, राज्य समन्वयक, प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलन

टॅग्स :jobनोकरीEducation Sectorशिक्षण क्षेत्र