शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

School Reopening: ८० टक्क्यांहून अधिक शाळा राज्यात पहिल्याच दिवशी सुरू; लवकरच संख्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 7:25 AM

शहरी, ग्रामीण मिळून उपस्थिती ४७ टक्के, शाळेतील विद्यार्थी शाळॆत येत असल्याने पालकांच्या मनातील धास्ती अजून कायम असली तरी यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी आणि शहरी भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा व विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या शाळांमध्ये ग्रामीणमधील आणि शहरी भागातील मिळून ५४ लाख १५ हजार १३६ विद्यार्थी आहेत.स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती

मुंबई : सोमवारपासून राज्यातील शहरी भागात ८ वी ते १२ वी तर ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी शाळा सुरू झाल्या आहेत. या शिक्षणोत्सवाच्या पहिल्या दिवशीच रात्री ९ पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २० जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील मिळून ८३ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत तर ४७ टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी आणि शहरी भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा व विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रात्री ९ पर्यंतच्या माहितीमध्ये राज्यातील आणखी काही जिल्ह्यांची माहिती येणे अपेक्षित असल्याने या संख्येत वाढ होण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, बऱ्याच कालावधीनंतर शाळेतील विद्यार्थी शाळॆत येत असल्याने पालकांच्या मनातील धास्ती अजून कायम असली तरी यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील २० जिल्ह्यातील शाळांच्या माहितीनुसार ग्रामीण व शहरी भाग मिळून एकूण ३२ हजार १३ शाळा आहेत, त्यापैकी २६ हजार ६९४ शाळा सोमवारी सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये ग्रामीणमधील आणि शहरी भागातील मिळून ५४ लाख १५ हजार १३६ विद्यार्थी आहेत. त्यापैकी सोमवारी २५ लाख ३७ हजार ३३४ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये उपस्थिती दर्शविल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. राज्यातील सर्व जिल्ह्यांत शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला असून विविध पद्धतींनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र यावेळी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. याचे तंतोतत पालन शाळांमध्ये झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा