शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

मूल्यांकन आणि प्रवेशाच्या कार्यपद्धतींनी वाढला गुंता; शिक्षक, मुख्याध्यापक गोंधळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 06:44 IST

मुंबई : गेले वर्षभर शाळा बंद, ऑनलाईन शिक्षण, त्यात शिक्षण विभागाकडूनच आलेले परीक्षा न घेण्याचे फतवे आणि आता तोंडी ...

मुंबई : गेले वर्षभर शाळा बंद, ऑनलाईन शिक्षण, त्यात शिक्षण विभागाकडूनच आलेले परीक्षा न घेण्याचे फतवे आणि आता तोंडी परीक्षा या सगळ्या अस्पष्ट आणि नेमकेपणाचा अभाव असणाऱ्या शिक्षण विभागाच्या निर्णयाने शाळा प्रशासन, मुख्याध्यापक आणि शिक्षक गोंधळले आहेत. अंतर्गत मूल्यमापनामुळे दहावीचा निकाल लावताना गुंता अधिक वाढणार आहे. तसेच निकालाबाबत समाधानी नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा होणार असेल, तर मग दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेणे शक्य होते, असे काही शिक्षणतज्ज्ञांना वाटत आहे. दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची कार्यपद्धती आणि अकरावीसाठी होणारी ‘सीईटी’ याबाबत शिक्षण क्षेत्रातून विशेषतः शिक्षक, मुख्याध्यापकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.नववीची परीक्षा विद्यार्थी फारशा गांभीर्याने देत नाहीत. बहुतांश विद्यार्थी दहावीला बोर्डाची परीक्षा असल्यामुळे ती गांभीर्याने देतात. त्यामुळे त्या आधारे मूल्यमापन करण्यासाठी ५० गुण देणे हे योग्य वाटत नाही. त्यातच शिक्षण विभागाच्या सूचनांप्रमाणे मुंबई, पुण्यासारख्या शहरांत उपसंचालकांनी दिलेल्या निर्देशानुसारच परीक्षा घेतल्या नाहीत, मग आता त्या परीक्षांचे नियोजन प्रचलित पद्धतीने करायचे म्हणजे नेमके काय यात स्पष्टता नसल्याची प्रतिक्रिया मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पांडुरंग केंगार यांनी दिली.श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच आहे तर तीन तीन मूल्यांकनाचा घाट घालण्याऐवजी दहावीच्या उत्तीर्णतेसाठी सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शक्य होते, असे मत त्यांनी मांडले आहे. दरम्यान, शिक्षण विभागाचा निर्णय कितीही संभ्रमात असणारा असला तरी आम्ही तो विद्यार्थी हितासाठी डावलू शकत नाही. मात्र, सद्य:स्थितीत आम्ही वाट पाहत असल्याची भूमिका मुख्याध्यापक संघटनेने मांडली आहे.परीक्षांची गुणविभागणी कशी करणार?राज्यातील जवळपास ४० टक्के शाळांमध्ये लेखी परीक्षा झालेली नाही. मग या गुणांचे समानीकरण कसे होणार हा प्रश्न आहे. तोंडी परीक्षा झाली नाही, गुण देण्यासाठी आता या परीक्षा कशा घ्यायच्या हेही शाळांना कळत नाही. अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ‘सीईटी’ परीक्षा होणार आहेत. त्याशिवाय दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनातून जाहीर झालेल्या निकालाबाबत विद्यार्थी समाधानी नसतील, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र परीक्षा होणार आहे. मग सर्वच विद्यार्थ्यांसाठी दहावीची परीक्षा घेण्याला काय हरकत आहे, अशी प्रतिक्रिया उपनगरातील एका मराठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.एकूणच शिक्षण विभागाच्या नवीन मूल्यमापन धोरणामुळे दहावीच्या निकालाची इत्यंभूत जबाबदारी शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनावर येऊन पडल्याने आता तेही गोंधळले आहेत. त्यात न्यायालयीन प्रक्रिया अशीच चालू राहिली तर जूनअखेरपर्यंत निकाल लावणेही अवघड होईल, असा सूर त्यांच्यामधून मांडला जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने हा गोंधळ मार्गी लावण्याची मागणी ते करत आहेत.