शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘पहिली’ आवश्यक; मग ‘दुसरी’ कशाला? बोर्ड परीक्षा आता देणार सुधारणेची दुसरी संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 10:18 IST

वर्षातून दोन बोर्ड परीक्षा हे ताणमुक्त, लवचिक आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणव्यवस्थेकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार, गुण सुधारण्याची संधी, क्रीडा विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद आणि पारदर्शक निकाल प्रक्रिया या सर्व बाबी लक्षात घेतल्यास ही योजना परिवर्तनकारी ठरू शकते. 

सुदाम कुंभारसमुपदेशक

देशातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाचा बदल घडवून आणणारा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतला आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एका शैक्षणिक वर्षात दोन बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार आहेत. म्हणजेच आता सुरू असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची पहिली परीक्षा असेल आणि नंतर येत्या मे महिन्यात दुसरी परीक्षा होईल. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या दृष्टिकोनात मोलाचे परिवर्तन घडवणारा आहे.

हा निर्णय ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ मधील तरतुदींशी सुसंगत आहे. शिक्षण धोरणात असे स्पष्ट नमूद केले आहे की, बोर्ड परीक्षा ‘हाय-स्टेक’ स्वरूपाच्या राहू नयेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एकच परीक्षा त्यांच्या संपूर्ण भवितव्याचा निर्णय घेणारी ठरू नये. त्यामुळे एका शैक्षणिक वर्षात दोन प्रयत्नांची संधी द्यावी. एक मुख्य परीक्षा आणि दुसरी सुधारणा म्हणून. तसेच ‘बेस्ट ऑफ टू अटेम्पट्स’ या तत्त्वानुसार दोन प्रयत्नांतील सर्वोत्तम निकाल ग्राह्य धरण्याची भूमिका या धोरणात आहे.

पारंपरिक पद्धतीत एकाच अंतिम परीक्षेवर संपूर्ण निकाल अवलंबून असतो. त्यामुळे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करीत असले तरी शेवटच्या काही दिवसांतील तणाव, प्रकृतीतील चढ-उतार किंवा वैयक्तिक अडचणी यांचा परिणाम अंतिम निकालावर होतो. अपेक्षित यश न मिळाल्यास आत्मविश्वास डळमळीत होतो.  नव्या पद्धतीमुळे पहिल्या प्रयत्नात अपेक्षित गुण न मिळाल्यास दुसऱ्या परीक्षेद्वारे सुधारणा करण्याची संधी मिळेल. त्यामुळे अपयशाची भीती कमी होईल. विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेनंतर स्वतःच्या कमकुवत विषयांची जाणीव होईल. दुसऱ्या प्रयत्नात सुधारित कामगिरी करता येईल. ही प्रक्रिया गुण सुधारण्यापुरती मर्यादित नसून समज, विश्लेषण क्षमता व आत्मविश्वास वाढवणारी ठरेल, असे धोरणकर्त्यांना वाटते. यामुळे शिकण्याकडे केवळ निकालाच्या दृष्टीने बघणे कमी होईल.

नव्या धोरणाचा अर्थ कुणासाठी काय?

मानसिक ताण कमी : पालकांच्या दृष्टीने हा निर्णय मोठा दिलासादायक म्हणावा लागेल. एकदाच होणाऱ्या परीक्षेच्या निकालावर संपूर्ण भविष्य अवलंबून राहणार नसल्याने मानसिक ताण कमी होईल. मुलांच्या प्रगतीसाठी अतिरिक्त वेळ आणि संधी उपलब्ध असतील. तसेच तातडीच्या कोचिंगचा दबाव किंवा अनावश्यक स्पर्धात्मक वातावरण कमी होण्याची अपेक्षा आहे.

आधी स्पर्धा, मग पेपर : क्रीडा क्षेत्रात निपुण विद्यार्थ्यांसाठी ही योजना विशेष उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांच्या तारखा बोर्ड परीक्षांशी जुळल्यास दुसऱ्या परीक्षेला बसण्याची संधी त्यांना मिळेल. त्यामुळे शिक्षण आणि क्रीडा यांचा समतोल राखणे शक्य होईल. विद्यार्थ्यांच्या बहुआयामी क्षमतांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा सकारात्मक बदल आहे.

शाळांची जबाबदारी महत्त्वाची : या प्रक्रियेत पालक आणि विद्यार्थ्यांना धोरणाची स्पष्ट व सविस्तर माहिती देणे, अर्ज प्रक्रियेत अचूकता राखणे, विषय निवडीत मार्गदर्शन करणे आणि सुधारणा परीक्षेसाठी विशेष अध्यापनाची व्यवस्था करणे शाळांना आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कमतरता ओळखून पूरक अध्यापन करणे हीदेखील शाळांची जबाबदारी ठरेल.

पहिली परीक्षा अनिवार्य : विद्यार्थ्यांनी पहिली परीक्षा गांभीर्याने देणे अनिवार्य आहे. दुसऱ्या परीक्षेला केवळ आवश्यक असल्यासच प्रवेश घ्यावा. गुण सुधारण्यासाठी योग्य विषयांची निवड, कागदपत्रांची अचूक पूर्तता आणि शाळेशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवणेही तेवढेच गरजेचे असेल. ही संधी केवळ ‘दुसरी संधी’ म्हणून न पाहता, स्वतःला अधिक सक्षम बनविण्याची प्रक्रिया म्हणून स्वीकारणे महत्त्वाचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : First Exam Essential, Why a Second? Board Exam Offers Improvement Chance!

Web Summary : CBSE's two-exam system from 2025-26 offers students a chance to improve scores. This aligns with the National Education Policy 2020, reducing exam pressure. Schools must support students, guiding them through the process. The first exam is compulsory.
टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी