शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

Exams: ...अखेर दहावीचा तिढा सुटला, नववी आणि दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापनाचे धोरण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 07:41 IST

SSC Exams: शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी यासंबंधी तब्बल २४ बैठका घेतल्यानंतर दहावीच्या मूल्यांकनाची पद्धत तयार करण्यात आल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली असून, शिक्षण विभागाने मूल्यमापनाचे धाेरण जाहीर केले आहे. त्यानुसार, दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के अंतर्गत मूल्यमापनानुसार, तर ५० टक्के गुण नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणानुसार देण्यात येतील. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत हे मूल्यमापन धाेरण जाहीर केले.शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी यासंबंधी तब्बल २४ बैठका घेतल्यानंतर दहावीच्या मूल्यांकनाची पद्धत तयार करण्यात आल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. नववीतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन  कोविड स्थितीत वस्तुनिष्ठ पद्धतीने झाले होते. त्याची नोंद सरल प्रणालीत आहे, त्याचाच आधार घेत यंदाचे दहावीचे मूल्यमापन  

होईल. दहावीचा निकाल जूनअखेरपर्यंत जाहीर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची निकाल समिती असेल, तसेच या निकालाच्या अभिलेखांची पडताळणी विभागस्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकारी करतील. 

...तर परीक्षा देता येईलज्या नियमित विद्यार्थ्यांना निकाल समाधानकारक वाटणार नाही त्यांना कोविडची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेंतर्गत लगतच्या २ परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी मिळेल. शिवाय या सर्व प्रक्रियेसाठी शाळांना माहिती देण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात येईल. 

असे आहे निकालाचे सूत्रनववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के वापरून दहावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल. दहावीच्या अंतर्गत मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला ३० गुण तर गृहपाठ/तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे  २० गुण दिले जातील.  

अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी, पण ऐच्छिक  दहावीच्या मूल्यांकनाचा तिढा सुटल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात एकच सीईटी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान, ही सीईटी पूर्णपणे ऐच्छिक असून, दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. याचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. १०० गुणांची ही सीईटी दोन तासांची असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. अकरावी प्रवेशात एकवाक्यता राहावी व व सर्वांना समान संधीसाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थ्यांना असे मिळणार गुणn पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी ते मंडळाच्या ज्या परीक्षांना बसले होते त्यापैकी उत्तीर्ण  झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेचे ८० पैकी प्राप्त गुणांच्या सरासरीएवढे गुण संगणक प्रणालीमार्फत देण्यात येतील, तर उर्वरित गुण अंतर्गत तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षेच्या आधारे देण्यात येतील. n खासगी पुनर्परीक्षार्थींसाठी यापूर्वीच्या अंतिम इयत्तेत (५ वी ते ९ वी) प्राप्त एकूण गुणांची टक्केवारी लक्षात घेतली जाईल. n खासगीरीत्या परीक्षेला बसणाऱ्यांच्या संपर्क केंद्रामार्फत घेतल्या गेलेल्या चाचण्या, सराव परीक्षा, गृहकार्य, स्वाध्याय पुस्तिका, प्रकल्प यांचे ८० पैकी गुण देण्यात येतील, तर उर्वरित २० गुण अंतर्गत मूल्यमापनावर आधारित असतील. 

टॅग्स :ssc examदहावीEducation Sectorशिक्षण क्षेत्र