शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

लॉकडाऊनमध्ये मुंबईतील ९७ % विद्यार्थ्यांनी घेतले ऑनलाईन शिक्षण, पण ऑफलाईन शिक्षणालाच पालकांची पसंती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 13:59 IST

भविष्यात शिक्षण ऑफलाईन व्हावे अशी ६२ % पालकांची इच्छा, प्रजाच्या अहवालातील शिक्षण क्षेत्रातील निष्कर्ष 

ठळक मुद्देऑफलाईन शिक्षणाला पालकांची पसंतीइंटरनेटमुळे काही विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात अनियमितता

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात मुंबईतील ९७ % विद्यार्थी पालकांनी शिक्षणासाठी ऑनलाईन माध्यमांचा, पर्यायांचा वापर केला. मात्र भविष्यातील शिक्षणासाठी ऑफलाईन शिक्षणपद्धतीच योग्य ठरेल असे मत ६२ % मुंबईकर पालक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. यामधील ६० टक्के पालक हे खासगी शाळांतील आहेत, तर ६७ टक्के पालक हे सरकारी, पालिका, अनुदानित शाळांतील असल्याचे निरीक्षण प्रजाच्या अहवालात नोंदविण्यात आपले आहे. कोविड-१९ मुळे लॉकडाउनच्या काळात नागरिकांना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला, मुंबईकरांच्या उपजीविका, शिक्षण, आरोग्य, घरे , परिवहन अशा विविध घटकांवर कसा व काय परिणाम झाला याचे कुटुंब आधारित सर्वेक्षण प्रजा फाउंडेशनमार्फत करण्यात आले आणि त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

शैक्षणिक क्षेत्राचा विचार करताना सर्वेक्षणामध्ये खासगी व सरकारी दोन्हीही शाळांचा समावेश केला असून ऑनलाईन शैक्षणिक व्यासपीठ वापरण्यासाठी त्यांच्या शाळांनी आवश्यक ते प्रशिक्षण दिल्याचे दिसून आले. सरासरी ४३ टक्के पालक ऑनलाईन शिक्षणामुळे समाधानी असून त्यातील ४५% हे खासगी शाळांतील तर ३६ % पालक सरकारी शाळांतील आहेत. दरम्यान ७८% पालकांनी मुलांनी ऑनलाईन अभ्यासासाठी त्यांचा स्मार्टफोन वापरला असल्याचे नमूद केले आहे. कधी कधी मोबाईलमधील इंटरनेट डेटा संपल्याने ५६ % विद्यार्थ्यांनी पालकांशिवाय इतरांचे स्मार्टफोन ही वापरले आहेत, तर २७ % पालकांना एक्ट्रा डेटासाठी अधिक खर्च करावा लागला असल्याची माहिती सर्वेक्षणात नमूद केली आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसणे, डेटा पॅक संपणे, पालक घरी नसणे अशा कारणांमुळे १७ % विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात अनियमितता दिसून आली आहे.इंटरनेटची समस्याऑनलाईन शिक्षणात ६४ % पालकांनी त्यांच्या मुलांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या आल्याचे सांगितले, त्यामुळे भविष्यात ऑफलाईन शिक्षण पद्धतीच असावी असे मत ही त्यांनी मांडले आहे. ऑनलाईन शिक्षणात अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात ५५% मुलाना यश मिळाले तर १० % पालकाची आपल्या मुलांना ते जमलेच नसल्याचे मान्य केले. राज्यातील पाचवी ते आठवी व नववी ते बारावीच्या मुंबई वगळता इतर जिल्ह्यात शाळा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ५४% पालक आपल्या मुलांना आता शाळेत पाठविण्यास तयार असून यातील ५२ % पालक खासगी शाळांतील तर ६३ % पालक सरकारी शाळांतील आहेत. ४६ % पालकांनी अजूनही मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दर्शविला आहे. जे पालक मुलांना शाळांमध्ये पाठविण्यास तयार आहेत त्यांच्यापैकी ३४ % पालकांनी मुलांना शाळेत चालत पाठ्वण्याच्या पर्यायाला जास्त पसंती दिली आहे. लहान असल्यास ४५ % पालकांनी घरातील सदस्य किंवा शेजारी मुलांना शाळेत सोडतील असे मत व्यक्त केले आहे. मात्र रेल्वेसेवा,  रिक्षा , स्कुलबस यांनी मुलांना शाळांमध्ये पाठवण्यास तयार नसल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणMumbaiमुंबईonlineऑनलाइनStudentविद्यार्थीSchoolशाळाInternetइंटरनेट