शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

‘स्टार’ आहात ना,  फुका मरता कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 6:15 AM

सोशल मीडियाने रातोरात दिलेली प्रसिद्धी टिकवून ठेवण्यासाठी खेळावा लागणारा  “लाइक्स”च्या आकड्यांचा खेळ हा एक नवाच जीवघेणाा फास तयार झाला आहे.

- नंदकिशोर पाटील, कार्यकारी संपादक, लोकमत

समीर गायकवाड, पूजा चव्हाण, रफी शेख, सिया कक्कर ही नावे अनेकांच्या चांगल्याच परिचयाची आहेत. विशेषत: जे सोशल मीडिया नावाच्या आभासी दुनियेत वावरत असतात, त्यांच्यापैकी अनेकांसाठी तर ही मंडळी ‘आयकाॅन’ असू शकतील. वर उल्लेख केलेल्या नावांच्या व्यक्ती नाव, गाव, स्थलपरत्वे भिन्न असतील; पण त्यांच्यात एक साधर्म्य आहे, ते म्हणजे, हे सगळे जण टिक-टाॅक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावरचे स्टार आहेत आणि या सर्वांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा अकाली संपविली आहे. नाचगाणे, अथवा काॅमेडीचा एखादा व्हिडिओ पोस्ट करून ही मंडळी रातोरात स्टार बनली होती. पुढे तो त्यांचा दिनक्रम बनला आणि त्यातून त्यांना लाखो चाहतेही (फाॅलोअर्स) मिळाले. लाइक्स, शेअर अन्‌ कमेंटची अक्षरश: झिंग चढलेले आभासी दुनियेतील हे तथाकथित स्टार आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलतात, हा  चिंतनाचा आणि सामाजिक चिंतेचा विषय आहे. एखाद्याच्या आत्महत्येमागे कौटुंबिक, आर्थिक वा इतर काही वैयक्तिक कारणे असू शकतात, पण सोशल मीडियाने रातोरात दिलेली प्रसिद्धी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी खेळावा लागणारा “लाइक्स”च्या  आकड्यांचा खेळ हा एक नवाच जीवघेणा फास  तयार झाला आहे. मिळालेली प्रसिद्धी हाताळू न शकलेले अनेक तरुण चेहेरे अचानक गायब तरी होतात, विस्म्रृतीत जातात. ज्यांना हे असे विसरले जाणे, विसरले जाण्याची शक्यताही सहन करता येत नाही, ते स्वत:लाच संपविण्याचा मार्ग पत्करतात  असे दिसते.  

तारुण्यात आयुष्याचा अकाली अंत करून घेण्यापूर्वी त्यांनी घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला घेतला असता तर कदाचित त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले नसते; पण आजकाल त्यांना विचारते कोण? घरच्यांपेक्षा मित्र-मैत्रिणी, फेसबुक फ्रेंड‌स्‌ जवळचे वाटू लागले आहेत. फेसबुकवरच्या न्यूज फिडवर सतत व्यक्त होणारी ही पिढी इतरांचे काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नसते. व्हर्च्युअल आणि खऱ्या आयुष्याची गल्लत झाल्याने ऑनलाइनवर जे दिसते तेच खरे मानून त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करणारी तरुणाई भावनिक हिंदोळ्यात अडकली, की पुरती गोंधळून जाते. सोशल मीडियात मिळणाऱ्या लाइक्समुळे त्यांच्यात एक प्रकारचा सुपरिऑरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो. स्वत:ला ते आयकॉन, मॉडेल समजू लागतात. त्यामुळे विरोधातली एखादी कमेंटही त्यांना अस्वस्थ करून जाते. आपला स्टारडम कमी होईल की काय, अशा अनामिक भीतीच्या सावटात ते सतत वावरत असतात. नार्सिस्ट होतात म्हणजे स्वतःच्याच प्रेमात असतात. हल्ली हा रोग तर समाजातील अनेकांना जडलेला आहे.

सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण जगभर वाढू लागले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अलीकडच्या आकडेवारीनुसार जगभरात दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते आणि त्यात तरुणांचे प्रमाण ६० टक्के इतके आहे. मानसिक तणाव हे आत्महत्यांमागचे प्रमुख कारण  आहे. व्हर्च्युअल जगात वावरणाऱ्यांना सतत भावनिक चढ-उताराचा सामना करावा लागतो. इथल्या स्पर्धेत आपण अव्वल राहू की नाही, या भीतीपोटी ते अधिकाधिक वेळ ऑनलाइन असतात. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर हे रातोरात स्टार बनलेले नाहीत. त्यांच्या स्टारडममागे अपार मेहनत आहे. त्यांच्याही आयुष्यात मान-अपमानाचे प्रसंग आले, त्यांनाही यशाने अनेकदा हुलकावणी दिली; पण म्हणून ते खचले नाहीत. स्टारडमसुद्धा तितक्याच निगुतीने जपावे लागते. त्यासाठी प्रयत्नांचे सातत्य लागते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मुलांना हे कोणीतरी सांगण्याची गरज आहे. वयात आलेल्या मुलांच्या वर्तनात अचानक झालेला बदल हा सोशल मीडियाचा परिणाम असू शकतो आणि तो वेळीच हेरता आला नाही, तर पुढे आक्रित घडू शकते. 

हल्ली अनेकांना फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटरवर व्यक्त होण्याची इतकी सवय जडली आहे, की पोस्ट टाकली नाही, तर कदाचित आपण जगाच्या मागे राहू, अशी भीती त्यांना वाटते. त्यातूनच ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पोस्टवर पोस्ट टाकत असतात. या व्हर्च्युअल जगाने खऱ्या आयुष्यावर मात केली, की अवतीभवतीचे जगही खोटे वाटू लागते, मग खऱ्या आयुष्यात निर्माण झालेल्या समस्येचा सामना करताना ते नैराश्येच्या गर्तेत ओढले जातात. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकPooja Chavanपूजा चव्हाण