शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा सन्मान नैमित्तीक नसावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 16:08 IST

योगदानाविषयी कृतज्ञता

मिलिंद कुलकर्णी८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातोय. ३६५ दिवसांपैकी एका दिवशी आम्ही नारीशक्तीचा सन्मान, आदर आणि सत्कार करीत असतो. त्यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करीत असतो. अर्धे विश्व म्हणून त्यांचा गौरव करीत असतो. कोणतेही क्षेत्र आता शिल्लक नाही, ज्याठिकाणी महिलांनी स्वकष्टाने, स्वकर्तृत्वाने स्वत:ला सिध्द केलेले नाही, असे आपण अभिमानाने सांगत असतो. हे सारे खरे असले तरी केवळ एकच दिवस आम्ही महिलांचा सन्मान का करायचा? रोज महिलांना सन्मान तर सोडा, समान वागणूक आम्ही देतो का, याचा तमाम पुरुषवर्गाने विचार करायला हवा. आत्मपरीक्षण करायला हवे.महिला दिनाकडे देखील आम्ही विचारसरणीच्या चष्म्यातून पाहत असतो. हिंदुत्त्ववादी विचारसरणीची मंडळी शुभेच्छा देताना पुरातन काळातील अरुंधती, अनुसया, सावित्री, जानकी, सती, द्रोैपदी, कण्णगी, गार्गी, मीरा, दुर्गावती, लक्ष्मी, अहल्या, चन्नमा, रुद्रमाम्बा, सुविक्रमा, निवेदिता, सारदा या मातृस्थानी असलेल्या महिलांचे स्मरण करतात. पुरोगामी मंडळींकडून राजमाता जिजाऊ, लोकमाता अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई, माता रमाई यांचे स्मरण केले जात आहे. त्या त्या काळात या महिलांनी निश्चितच उल्लेखनीय आणि आदर्श स्वरुपाचे काम केले आहे. त्यात कोणाचे कार्य अधिक आणि कोणाचे उणे म्हणायची आवश्यकता भासायला नको. किंवा त्याची विचारसरणीनुसार विभागणीदेखील चुकीची वाटते.मुद्दा हा आहे की, आदर्श मानणाऱ्या या महिलांचे कार्य आणि विचार आम्ही आमच्यात आणि कुटुंबामध्ये आत्मसात केलेले आहेत काय? घरात मुलगा आणि मुलगी यांच्यात आम्ही समानता बाळगतो काय? मुलाला अभियांत्रिकी आणि मुलीला कला, वाणिज्य शाखेचे शिक्षण घेण्यास आम्ही बाध्य करीत नाही काय? तिच्या आवडीचा अभ्यासक्रम घ्यायचा असला तरी आपल्या शहरात उपलब्ध असेल तरच घेऊ देतो, बाहेरगावी मुलीला कसे पाठवायचे? हा प्रश्न एकविसाव्या शतकात आम्हाला पडतोच ना? मुलाची वेशभूषा, केशरचना यासंबंधी भेद होतोच ना? मुलाविषयी आम्ही जेवढे निर्धास्त असतो, तो रात्री उशिरा आला तरी आम्ही फार काही गंभीरतेने घेत नाही, हे मुलीच्या बाबतीत घडले तर ...? याचा अर्थ पुढारलेल्या समाजात अजूनही मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद होतोच. मुली-महिला सुरक्षित नाहीत. समानता तर दूर राहिली.मध्यंतरी ‘मी टू’ चे वादळ घोंगावले तेव्हा भल्या भल्यांचा बुरखा टराटरा फाटला. सोज्वळ व सात्विकतेचा बुरखा पांघरुन समाजात मानमरातब मिरवणाऱ्या या मंडळींची काळी कृत्ये समोर येताच त्यांची निर्भत्सना किती झाली? आणि तक्रारदार महिलेला किती प्रश्न विचारले गेले? याचा प्रामाणिकपणे विचार केला तर समाजाची मानसिकता लक्षात येते. तक्रारदाराने तेव्हाच का तक्रार केली नाही? आताच का केली? प्रसिध्दीचा स्टंट आहे, ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, अशी ओरड सुरु झालीच ना? रावणाच्या तावडीतून सुटलेल्या सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागलीच होती, मर्यादा पुरुषोत्तम राम सोबत असतानाही जनभावनेपुढे त्या राजाने मान तुकवली होतीच. म्हणजे पुरातन काळ असो की, वर्तमान काळ महिलेला समाजाने कायम आरोपीच्या पिंजºयात ठेवले आहे. हीन वागणूक दिली आहे.पंचायत राज व्यवस्थेत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण देण्यात आले. या आरक्षणाचा लाभ खरोखर महिलांना किती मिळतोय? त्यांना अधिकार राबविण्या इतके सक्षम आणि सबल होऊ दिले आहे काय? ‘झेरॉक्स पती’ ही संकल्पना का उदयास आली? पतीला विचारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला जर निर्णय घेऊ शकत नसतील तर त्यांना आरक्षणाचा फायदा काय? सूत्रे सगळी पुरुषांकडे राहत असतील तर ५० टक्के आरक्षणाचे श्रेय घेणाºया मंडळींनी यातून तोडगा देखील काढायला हवा ना?मग केवळ दिवस साजरा करायचा, महिलांविषयी आम्हाला अतीशय आदर, सन्मान आहे हे आत्मसमाधान समाजाला, पुरुषांना मिळावे म्हणून तर महिला सन्मानाचे सोहळे साजरे होत नाही ना, असा प्रश्न पडतो. आपल्या उक्ती, कृती यातून महिलेचा सन्मान प्रकट झाला पाहिजे. तरच खºया अर्थाने महिलांना समानता असल्याची प्रचिती येईल, अन्यथा पुन्हा ८ मार्चची वाट पहावी लागेल.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनJalgaonजळगाव