शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

महिलांचा सन्मान नैमित्तीक नसावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 16:08 IST

योगदानाविषयी कृतज्ञता

मिलिंद कुलकर्णी८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातोय. ३६५ दिवसांपैकी एका दिवशी आम्ही नारीशक्तीचा सन्मान, आदर आणि सत्कार करीत असतो. त्यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करीत असतो. अर्धे विश्व म्हणून त्यांचा गौरव करीत असतो. कोणतेही क्षेत्र आता शिल्लक नाही, ज्याठिकाणी महिलांनी स्वकष्टाने, स्वकर्तृत्वाने स्वत:ला सिध्द केलेले नाही, असे आपण अभिमानाने सांगत असतो. हे सारे खरे असले तरी केवळ एकच दिवस आम्ही महिलांचा सन्मान का करायचा? रोज महिलांना सन्मान तर सोडा, समान वागणूक आम्ही देतो का, याचा तमाम पुरुषवर्गाने विचार करायला हवा. आत्मपरीक्षण करायला हवे.महिला दिनाकडे देखील आम्ही विचारसरणीच्या चष्म्यातून पाहत असतो. हिंदुत्त्ववादी विचारसरणीची मंडळी शुभेच्छा देताना पुरातन काळातील अरुंधती, अनुसया, सावित्री, जानकी, सती, द्रोैपदी, कण्णगी, गार्गी, मीरा, दुर्गावती, लक्ष्मी, अहल्या, चन्नमा, रुद्रमाम्बा, सुविक्रमा, निवेदिता, सारदा या मातृस्थानी असलेल्या महिलांचे स्मरण करतात. पुरोगामी मंडळींकडून राजमाता जिजाऊ, लोकमाता अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई, माता रमाई यांचे स्मरण केले जात आहे. त्या त्या काळात या महिलांनी निश्चितच उल्लेखनीय आणि आदर्श स्वरुपाचे काम केले आहे. त्यात कोणाचे कार्य अधिक आणि कोणाचे उणे म्हणायची आवश्यकता भासायला नको. किंवा त्याची विचारसरणीनुसार विभागणीदेखील चुकीची वाटते.मुद्दा हा आहे की, आदर्श मानणाऱ्या या महिलांचे कार्य आणि विचार आम्ही आमच्यात आणि कुटुंबामध्ये आत्मसात केलेले आहेत काय? घरात मुलगा आणि मुलगी यांच्यात आम्ही समानता बाळगतो काय? मुलाला अभियांत्रिकी आणि मुलीला कला, वाणिज्य शाखेचे शिक्षण घेण्यास आम्ही बाध्य करीत नाही काय? तिच्या आवडीचा अभ्यासक्रम घ्यायचा असला तरी आपल्या शहरात उपलब्ध असेल तरच घेऊ देतो, बाहेरगावी मुलीला कसे पाठवायचे? हा प्रश्न एकविसाव्या शतकात आम्हाला पडतोच ना? मुलाची वेशभूषा, केशरचना यासंबंधी भेद होतोच ना? मुलाविषयी आम्ही जेवढे निर्धास्त असतो, तो रात्री उशिरा आला तरी आम्ही फार काही गंभीरतेने घेत नाही, हे मुलीच्या बाबतीत घडले तर ...? याचा अर्थ पुढारलेल्या समाजात अजूनही मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद होतोच. मुली-महिला सुरक्षित नाहीत. समानता तर दूर राहिली.मध्यंतरी ‘मी टू’ चे वादळ घोंगावले तेव्हा भल्या भल्यांचा बुरखा टराटरा फाटला. सोज्वळ व सात्विकतेचा बुरखा पांघरुन समाजात मानमरातब मिरवणाऱ्या या मंडळींची काळी कृत्ये समोर येताच त्यांची निर्भत्सना किती झाली? आणि तक्रारदार महिलेला किती प्रश्न विचारले गेले? याचा प्रामाणिकपणे विचार केला तर समाजाची मानसिकता लक्षात येते. तक्रारदाराने तेव्हाच का तक्रार केली नाही? आताच का केली? प्रसिध्दीचा स्टंट आहे, ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, अशी ओरड सुरु झालीच ना? रावणाच्या तावडीतून सुटलेल्या सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागलीच होती, मर्यादा पुरुषोत्तम राम सोबत असतानाही जनभावनेपुढे त्या राजाने मान तुकवली होतीच. म्हणजे पुरातन काळ असो की, वर्तमान काळ महिलेला समाजाने कायम आरोपीच्या पिंजºयात ठेवले आहे. हीन वागणूक दिली आहे.पंचायत राज व्यवस्थेत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण देण्यात आले. या आरक्षणाचा लाभ खरोखर महिलांना किती मिळतोय? त्यांना अधिकार राबविण्या इतके सक्षम आणि सबल होऊ दिले आहे काय? ‘झेरॉक्स पती’ ही संकल्पना का उदयास आली? पतीला विचारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला जर निर्णय घेऊ शकत नसतील तर त्यांना आरक्षणाचा फायदा काय? सूत्रे सगळी पुरुषांकडे राहत असतील तर ५० टक्के आरक्षणाचे श्रेय घेणाºया मंडळींनी यातून तोडगा देखील काढायला हवा ना?मग केवळ दिवस साजरा करायचा, महिलांविषयी आम्हाला अतीशय आदर, सन्मान आहे हे आत्मसमाधान समाजाला, पुरुषांना मिळावे म्हणून तर महिला सन्मानाचे सोहळे साजरे होत नाही ना, असा प्रश्न पडतो. आपल्या उक्ती, कृती यातून महिलेचा सन्मान प्रकट झाला पाहिजे. तरच खºया अर्थाने महिलांना समानता असल्याची प्रचिती येईल, अन्यथा पुन्हा ८ मार्चची वाट पहावी लागेल.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनJalgaonजळगाव