शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

'त्या' दिशेने आपण कधी वाटचाल करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 04:27 IST

जनतेला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मिळवून देण्याबरोबर विचार व धार्मिक उपासनेच्या स्वातंत्र्याचेही अभिवचन राज्यघटनेने दिले आहे. भारताची प्रतिष्ठा व अखंडता त्यातूनच अबाधित राहू शकते.

जनतेला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मिळवून देण्याबरोबर विचार व धार्मिक उपासनेच्या स्वातंत्र्याचेही अभिवचन राज्यघटनेने दिले आहे. भारताची प्रतिष्ठा व अखंडता त्यातूनच अबाधित राहू शकते. भारताचा आज ७0वा प्रजासत्ताक दिन! भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक देश बनविणारी राज्यघटना २६ जानेवारी, १९५0 रोजी आपण स्वीकारली. स्वतंत्र देश म्हणून भारत जरी १५ आॅगस्ट, १९४७ रोजी अस्तित्वात आला, तरी देशाचे स्वप्नांकित भवितव्य घडविणारी राज्यघटना तयार करण्यासाठी तब्बल २ वर्षे ११ महिने १८ दिवस लागले. या कालखंडात घटना समितीच्या १६६ बैठका झाल्या. सखोल विचारमंथनातून भारताचे स्वप्नांकित भवितव्य घडविणारी राज्यघटना २६ नोव्हेंबर, १९४९ रोजीच तयार झाली होती. तथापि, हा पवित्र दस्तऐवज प्रत्यक्षात २६ जानेवारी, १९५0 रोजी स्वीकारण्यात आला. कारण स्वातंत्र्य चळवळीतल्या ऐतिहासिक घटनेची पार्श्वभूमी या दिवसाला होती. ब्रिटिश पार्लमेंटने १९३0 साली भारताला ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वायत्त प्रदेश (डोमिनियन स्टेटस) प्रदान करण्याचे ठरविले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ते कदापि मान्य नव्हते. प्रस्तावाला कडाडून विरोध करण्यासाठी २६ जानेवारी, १९३0 रोजी काँग्रेसने ‘संपूर्ण स्वराज’चे घोषणापत्र जारी केले. या ऐतिहासिक घटनेच्या दस्तऐवजाशी राज्यघटनेचा आत्मा जोडला गेला आहे, म्हणूनच २६ जानेवारीचा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून भारतात प्रचंड उत्साहाने साजरा केला जातो. लोकशाही व्यवस्थेच्या ७ दशकांच्या वाटचालीनंतर, नव्या संकल्पाबरोबर राज्यघटनेने नमूद केलेली मार्गदर्शक तत्त्वे व उद्दिष्टांबाबत आपण नेमके कुठे पोहोचलो, याचे अवलोकन करण्यासाठीही प्रजासत्ताक दिनाचे औचित्य आहे. देशातल्या जनतेला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मिळवून देण्याबरोबर विचार, अभिव्यक्ती व धार्मिक उपासनेच्या स्वातंत्र्याचेही अभिवचन राज्यघटनेने दिले आहे. भारताची प्रतिष्ठा व अखंडता त्यातूनच अबाधित राहू शकते. ७0व्या प्रजासत्ताक दिनी या उद्दिष्टांचे स्मरण करताना काय स्थिती दिसते? याबाबत आॅक्सफॅम संस्थेचा आरसा दाखविणारा अहवाल नेमका जानेवारी महिन्यातच प्रकाशित झाला आहे. हा अहवाल म्हणतो, भारताच्या एकूण संपत्तीपैकी निम्म्याहून अधिक संपत्ती आज केवळ १ टक्का लोकांच्या हाती आहे. अवघ्या १0 टक्के लोकांकडे देशाची ७७ टक्के संपत्ती एकवटली आहे. प्रतिवर्षी नवे अब्जाधीश भारतात तयार होत आहेत. गतवर्षापर्यंत त्यांची संख्या ११९वर पोहोचली आहे, तर दुसरीकडे देशातल्या ६0 टक्के लोकसंख्येकडे केवळ ४.८ टक्के म्हणजे जवळपास ४0 हजार कोटींचीच संपत्ती आहे. श्रीमंत अन् गरिबांमधली ही दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. समता मूलक समाजनिर्मिती करण्याचे राज्यघटनेचे स्वप्न या अहवालामुळे अद्याप अनेक योजने दूर असल्याचे दिसते. दारिद्र्यरेषेखालील ७0 टक्के लोकांना कोण आणि कधी बाहेर काढणार? जनतेला एक चांगले आयुष्य जगण्याची संधी देण्याचे अभिवचन राज्यघटनेने दिले आहे. त्या दिशेने आपण कधी वाटचाल करणार? असे प्रश्न या निमित्ताने निश्चितच उपस्थित होतात. प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय उत्सवाचे राजधानी दिल्ली केंद्रस्थान आहे. राजपथापासून लाल किल्ल्यापर्यंत विविध मंत्रालयांद्वारे भारताच्या प्रगतीचे, विकासाचे अन् संरक्षण सिद्धतेचे विराट दर्शन घडविणारे लक्षवेधी चित्ररथ या संचलनात सहभागी होतात. भारताच्या शक्तिशाली सार्वभौमत्वाचे दर्शन घडविणाऱ्या या शानदार सोहळ्यासाठी प्रतिवर्षी विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांना विशेष अतिथी या नात्याने निमंत्रित केले जाते. गेल्या ७0 वर्षात एखाद दुसºया वर्षाचा अपवाद वगळता, जगातल्या अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी या विलोभनीय सोहळ्याचे निरीक्षण केले आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसॅक यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले. भारत यंदा महात्मा गांधींचे १२५वे जयंती वर्ष साजरे करीत असल्याने, दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारतातल्या आगमनाला वेगळेच औचित्य आहे. सात दशके अनेक संकटे व विपरित स्थितीला सामोरे जात, जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताने आपली लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवली, त्याचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. मात्र, राज्यघटना स्वीकारल्याचा प्रजासत्ताक दिन साजरा करताना, आपल्या पूर्वसंकल्पांचे आत्मचिंतन करण्याचीही गरज आहे.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन