शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

भारत, चीन, रशिया एकत्र येणार? जगाचं लक्ष वेधणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 03:49 IST

तिन्ही देशांत सौहार्द व मैत्र राहावे, अशीच इच्छा अनेकांच्या मनात असली, तरी दुर्दैवाने यातील वास्तव मात्र वेगळे आहे.

भारत, चीन, रशिया एकत्र आल्यास निर्माण होणारी ताकद फार मोठी व साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधू शकणारी आहे. या तिन्ही देशांत सौहार्द व मैत्र राहावे, अशीच इच्छा अनेकांच्या मनात असली, तरी दुर्दैवाने यातील वास्तव मात्र वेगळे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग व रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांची दिशेक या शहरी सुरू असलेली चर्चा आशिया खंडासह जगाच्या राजकारणात समीकरणे बदलू शकणारी व त्याला शांततेचा मार्ग दाखवू शकणारी आहे. भारताचे मनुष्यबळ, चीनचे अर्थबळ आणि रशियाचे शस्त्रबळ या आशिया खंडातील अतिशय मोठ्या व साऱ्या जगाला धास्ती घालू शकणाऱ्या बाबी आहेत. त्या तिन्ही एकत्र आल्या, तर त्यातून निर्माण होणारी ताकद फार मोठी व साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधू शकणारी आहे. या तीन देशांत सौहार्द व मैत्र राहावे, अशीच इच्छा यावेळी अनेकांच्या मनात असेल. दुर्दैवाने यातील वास्तव वेगळे आहे.

चीन पाकिस्तानच्या भूमीतून काढू पाहणारा औद्योगिक कॉरिडॉर हा जगाच्या भीतीचा विषय झाला आहे. भारताची त्याला मान्यता नाही. कारण हा कॉरिडॉर पाकव्याप्त काश्मिरातून जाणारा आहे, शिवाय भारत व चीन यांच्यातला सीमाप्रश्न अजूनही कायम आहे. १९१३ मध्ये सुरू झालेला हा सीमावाद त्यावर १९६२ मध्ये एक युद्ध होऊनही अद्याप तसाच राहिला आहे. तिकडे रशियाची भारताशी असलेली मैत्री जुनी असली, तरी त्या देशाच्या सैन्याने पाकिस्तानी सैनिकांसोबत पाकव्याप्त काश्मीरच्या प्रदेशात अलीकडेच संयुक्त कवायती केल्या आहेत, शिवाय भारत व रशियातील पूर्वीचे मैत्रही आता पातळ झाले आहेत.
जैश-ए-महम्मद या संघटनेचा प्रमुख अजहर मसूद याला आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ठरविण्याच्या प्रश्नावर चीनने दीर्घकाळ नकाराधिकार वापरल्याने त्याचे भारताशी व जगाशीही नाते दुरावले आहे. आता त्याने तो नकाराधिकार परत घेतल्याने, त्यात काहीशी दुरुस्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. झालेच तर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे आता बरेच नमते घेऊ लागले आहेत. दहशतवादाची मोजावी लागणारी किंमत मोठी असते, हे त्यांनाही आता कळले आहे. परिणामी, त्यांची भूमिकाही नरमाईची झाली आहे.
अमेरिकेच्या ट्रम्प यांचे राजकारण, इंग्लंडचे ब्रेक्झिटचे धोरण व युरोपचे अमेरिकेशी दुरावलेले संबंध या साऱ्या पार्श्वभूमीवरही भारत, चीन व रशिया यांच्या संबंधांना महत्त्व आहे. साऱ्या जगावर अमेरिका व युरोपातील वसाहतवादी देशांनी गेली दीडशे वर्षे त्यांचा प्रभाव गाजविला आहे. जगाची बाजारपेठ म्हणून ते देश धनवंत झाले आहेत. भारताने आपल्या प्रगतीची सुरुवात १९४७ मध्ये तर चीनने १९४९ मध्ये केली. रशियाच्या खऱ्या विकासाचा आरंभही याच सुमारास झाला. आता ही राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत, स्वयंपूर्ण आणि एकसंघही आहेत, याउलट युरोपच विकासात माघारल्यागत तर अमेरिका हा देश आपले वर्चस्व शाबूत राखण्यात गुंतला आहे. ही स्थिती आशिया खंडातले जगावरील वर्चस्व वाढवायला अनुकूल आहे. या क्षेत्रातील दहशतवाद, अतिरेक व धर्मांधताच तेवढी आटोक्यात आणायची आहे.
झालेच तर या तीन देशांत असलेले जुने व नवे मतभेद मिटविण्यात त्यांनी यशस्वी होणे आवश्यक आहे. भारत आणि चीनसारखाच चीन व रशिया यांच्यातही सीमावाद आहे. मंचुरियाच्या प्रदेशावरील वर्चस्वाबाबत या दोन देशांत खडाजंगी आहे. अलीकडे चीनने भारताच्या काही प्रदेशांवर हक्क सांगितला असून, त्यातील अनेक शहरांना व क्षेत्रांना आपली नावे दिली आहेत. भारताच्या संमतीवाचून त्याच्या पूर्व टोकावर त्याने ब्रह्मपुत्रेवर धरण बांधले आहे. कोणत्याही क्षणी भारताचा पूर्व भाग पाण्याखाली आणणे त्यामुळे शक्य आहे.
भारत-पाकमधील संघर्षात चीनने सदैव पाकची तर रशियाने भारताची बाजू घेतली. शिवाय या तिन्ही मोठ्या देशात अंतर्गत अशांतता मोठी आहे. सोव्हिएत युनियनचे १५ तुकडे होऊन रशिया हा देश आता निर्माण झाला आहे. चीनच्या झीजियांग या प्रांतात अतिरेक्यांचा हैदोस आहे आणि तिबेटमध्ये धर्मगुरूंचे बंड आहे. भारतात हिंदू-मुस्लीम तेढ वाढीला लागण्याची लक्षणे आहेत, शिवाय या तीनही देशांचे काही कायमस्वरूपाचे प्रश्न आहेत. चीनला हाँगकाँगची डोकेदुखी, रशियाला जॉर्जियाचा उपद्रव तर भारतात काश्मीरचा प्रश्न. हे प्रश्न सामंजस्याने सोडवून या देशांना एकत्र येणे जमणार आहे.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प