शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

‘वो काहे का साधू? - वो तो बडबोला, ‘मनमुखी’ है!’

By meghana.dhoke | Updated: January 25, 2025 09:27 IST

Mahakumbh 2025: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात ‘व्हायरल’ होणारे ‘मनमुखी’ साधू आणि त्यांना आखाड्याच्या बाहेर हाकलणाऱ्या ‘गुरूमुखीं’च्या संघर्षाची कहाणी!

- मेघना ढोके(संपादक, लोकमत, सखी डॉट कॉम) 

नाशिकच्या कुंभमेळ्यात एक नव्वदीला टेकलेले, पार कमरेतून वाकलेले, ‘इच्छा भिक्षा व्रत’ घेतलेले साधूबाबा भेटले होते. अंगावरचा एक पंचा आणि एक वाडगा सोडला तर त्यांच्याकडे दुसरं काहीही नव्हतं. अयोध्येतून आलेल्या एका खालशात उतरले होते. सकाळी उठून कुठल्याही खालशासमोर जाऊन उभे राहायचे. कुणी मूठभर तांदूळ दिले वाडग्यात तर आणायचे, दुसरं काहीही कुणी दिलं तर तिथेच ठेवून निघून येत; पण ‘मला तांदूळ द्या’ म्हणत नसत. कधी-कधी दिवसदिवस तांदूळ मिळत नसत. मग ‘आज परमेश्वराची हीच इच्छा’ म्हणून त्यांना उपास घडे. मूठभर तांदूळ मिळाले की, त्या दिवशी काट्याकुट्यांची तीन दगडांची चूल करून भात शिजवायचा आणि दिवसातून एकदाच खायचा.

त्यांना विचारलं, ‘बाबा, जर तुम्ही गेली सत्तर वर्षे असंच जगताय म्हणता तर या जत्रेत कसे येता?’ ते म्हणाले, ‘मनुष्य को सबसे जादा भाती है लोकेषणा! दुसरे का कहना की, आप अच्छे हो! ये जो भीड लगती है ना आजूबाजू, ये ताकद देती है, अपनी पीडा सहने की... नहीं तो अंधेरे मे कौन रोया, कौन देखा?’ - साधूबाबांचं म्हणणं होतं की, ‘कितीही पळा, पण इतरांनी आपली केलेली स्तुती, त्यानं वाटणारं सुख यातून सुटका नसते. ते मला नको असं म्हणणं हे ढोंग!’ माणसांचा  गराडा, कौतुकाच्या नजरांसाठी व्रतस्थ साधूही आपापल्या जगातून बाहेर पडून कुंभाच्या जत्रेत येतात. अनेक हटयोगी बाबांचे फोटो प्रसिद्ध होतात, आता तर व्हिडीओही व्हायरल होतात. 

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात ‘आयआयटी बाबा’ व्हायरल झाला! त्याची आयआयटीची कहाणी, त्याची पूर्वाश्रमीची मैत्रीण, आई-वडिलांची भांडणं आणि त्यानं सुखाच्या शोधात निघणं ही सारी कथा सनसनाटी व्हायरलला चटावलेल्या काळात वेगाने पसरली. पण त्याच्या आखाड्याने शिस्तभंगाची कारवाई करून ‘आयआयटी बाबा’ला आखाड्यातून काढून टाकलं. सध्या ॲम्बिसिडर बाबा, काँटेवाला बाबा, एन्व्हायर्नमेंट बाबा, रबडी बाबा, रुद्राक्ष बाबा आणि सुंदरी साध्वी हर्षा रिछारिया यांची प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यापैकी काहींवर आखाड्यांनी कारवाई केली. त्यांना तातडीने कुंभाबाहेर जाण्याचे आदेश दिले. कारण संसारी समाजाप्रमाणेच साधूसमाजाचेही काही नियम असतात. त्यात एक शब्द  अत्यंत अपमानास्पद म्हणून वापरला जातो : ‘मनमुखी’.

गुरूमुखी आणि मनमुखी असे दोन प्रकार. गुरूमुखी म्हणजे साधू परंपरेतले साधू. ते गंडाधारी शिष्य परंपरेत विशिष्ट नियमांचं पालन करून मग पुढे जाऊन महंत, महामंडलेश्वर आदी होतात. संसार सोडून पूर्णत: आपापल्या आखाड्यांशी, खालसांशी बांधलेले असतात. साधू समाजात गुरूमुखी साधूंना मोठा मान. गुरूनं दीक्षा दिल्यानं साधू बनलेले ते सगळे  गुरूमुखी. या साधूंचीही वंशावळ बनते. 

आणि मनमुखी? - ते एक दिवस स्वत:च्या मनानंच ‘साधू’ बनतात, म्हणून ते मनमुखी. त्यांचा कुणी गुरू नसतो. ते आखाड्यांच्या व्यवस्थांशी जोडलेले नसतात. गुरूमुखी साधू या ‘मनमुखीं’ना किल्लस मानतात, त्यांच्याविषयी रागाने, तिरस्काराने बोलतात. कुंभमेळ्यात खरा मान फक्त गुरूमुखींना असतो. पण टीव्ही, मागोमाग समाजमाध्यमं आली, त्यानंतर सगळे संदर्भच बदलले. मनमुखी साधू टीव्हीवर झळकू लागले. लोकप्रिय झाले. त्यांचा भक्तपरिवार, शिष्यपरिवार वाढला. पैसा-ग्लॅमर आलं. 

साधू समाज अशा मातब्बर मनमुखी साधूंना वैतागला आहे. अनेक कुंभांत मनमुखी साधूंनी काढलेल्या मिरवणुकीवरून वाद, भांडणं होतात. त्यांना साधुग्रामात स्थान देऊ नये, अशा मागण्या होतात. अनेक मनमुखी साधू प्रचंड गर्दी खेचतात. त्यांच्याकडे पैसाही जास्त असतो. तिथली गर्दी सुशिक्षित, शहरी, पैसेवाली. जुन्या परंपरेतले खालसे गरीब. खालशात ‘पंगत’ धरून बसणाऱ्या गोरगरीब लोकांचीच गर्दी जास्त. त्यात प्रश्न आता फक्त पैसा, ग्लॅमरचा राहिलेला नाही, तर पारंपरिक व्यवस्थेत बाहेरच्या मनमुखींनी येऊन मनमर्जी वागण्याचा आणि गर्दी खेचण्याचाही झाला आहे. meghana.dhoke@lokmat.com

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश