शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ये दिल कशाला मांगे मोअर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 10:08 IST

गडकरी म्हणतात, हवे ते मिळत नाही.  ‘आणखी’चा हव्यास सुटत नाही; पण नाराजीच्या या साखळ्या राजकारण्यांइतक्याच सामान्यांच्याही गळ्यात असतातच!

दिनकर रायकर - समन्वयक संपादक, लोकमत

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्याला जे पटते, जे वाटते, ते कुणाचाही मुलाहिजा न ठेवता स्पष्टपणे बोलून टाकणारा मोकळाढाकळा वैदर्भीय राजकारणी म्हणजे नितीन गडकरी, अशी त्यांची ख्याती आहे.गडकरी जसे सभेत बोलतात, तितकेच कामातूनही बोलतात. राज्यात आणि केंद्रातही त्यांच्या कामगिरीशी अपवादानेच कुणाची तुलना होऊ शकेल. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात गडकरींनी राजकीय नेत्यांच्या ‘असमाधानी वृत्तीबद्दल’ परखड भाष्य केले. प्रत्येक पक्षात, प्रत्येक राजकारणी असमाधानी आहे. मंत्रिपद नाही म्हणून आमदार नाराज, चांगले मंत्रिपद नाही म्हणून मंत्री नाराज, मुख्यमंत्रीपद नाही म्हणून चांगले मंत्री नाराज, अशी ही नाराजीची साखळी त्यांनी मांडली. या सगळ्या असमाधानी व्यवस्थेचे ते प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे त्यांचे भाषण आणखी रंगले, हे काही वेगळे सांगायला नकोच. ‘आहे त्यात समाधान माना, चांगले काम करा, सुखी व्हाल’ असा मोलाचा सल्लाही त्यांनी जाताजाता सगळ्यांना दिला. गडकरींना सगळेच मनापासून ऐकतात; पण त्यांचे विचार आचरणात आणत नाहीत, त्यासाठी ते कचरतात, हे राजकीय नेत्यांचे आणि सध्याच्या राजकारणाचेही दुर्दैव. गडकरींच्या म्हणण्याप्रमाणे राजकारण्यांनी अपेक्षांचे आणि महत्त्वाकांक्षांचे ओझे उतरून ठेवून कामाला सुरुवात केली आणि आपल्यावरील जबाबदारीला न्याय दिला, तर या देशात आणि राज्यातही काय बहर येईल ! विकासाचे किती प्रकल्प मार्गी लागतील! कामे कशी झपाट्याने होतील!!- पण असे काही होत नाही. ‘ये दिल मांगे मोअर’च्या जमान्यात समाधानी म्हणावा, असा एकही नाही. सत्ता आणि अधिकारपदाचे नाट्य ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सगळीकडे सारख्याच ईर्ष्येने सुरू असते. महत्त्वाकांक्षांची यादी काही केल्या संपत नाही. हवे आहे ते मिळत नाही आणि ‘आणखी’चा हव्यास तर काही केल्या सुटत नाही. मुदलातच समाधान नसले तर जनकल्याण कसे होणार? त्यामुळे सध्याच्या बहुतेक सगळ्या समस्यांचे मूळ कशात असेल, तर ते राजकीय नेतृत्वाच्या असमाधानात. - गडकरींच्या या कानपिचक्या सध्याच्या सर्वपक्षीय राजकीय नेतृत्वाला आहेत, हे खरेच. आता राजकारणी लोकांना त्यांच्यातलाच कुणी शालजोडीतले देतो, तेव्हा श्रोतृवृंदाकडून टाळ्या वाजणे साहजिक आहे; पण गडकरी जे बोलले ते फक्त राजकीय व्यक्तिमत्त्वांनाच लागू होते, असे मुळीच नाही. ते सामान्य माणसासाठीही तितकेच लागू आहे. मोठे घर, मोठी गाडी, आणखी मोठा पगार, दागदागिने, जमीन जुमला, बढत्या, पदे, मुलांची शिक्षणे, त्यांचा डामडौल अशी ही यादी लांबत जाते. ‘स्टेटस मेंटेन’ करणे हे व्यक्तिसापेक्ष आहे, याचा विसर पडतो आणि सुरू होतो तो मृगजळाचा हव्यास. या हव्यासातून, जे हाती आहे त्याचाही उपभोग घेता येत नाही आणि असलेल्या जबाबदारीलाही धड न्याय देता येत नाही. हव्यासाच्या मागे धावणाऱ्या प्रत्येकाच्या मनात उरतात ती नैराश्याची आणि असमाधानाची कधीही न संपणारी जळमटे. ही निराशा टाळण्यासाठी सोपा उपाय गडकरींनीच आपल्या भाषणात सांगितला आहे. ते म्हणतात तसे, ‘मिळाले आहे त्यात समाधान माना, खांद्यावर असलेल्या जबाबदारीला न्याय द्या आणि उत्तम काम करा;’  पण ते लक्षात घेतले पाहिजे. समजून घेतले पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे. - ‘सर्वपक्षीय नेत्यांना गडकरींच्या कोपरखळ्या’ एवढाच त्याचा अर्थ नाही. थोडी जबाबदारी जनतेनेही घ्यावी. थोडे आचरण सामान्यजनांनीही करावे. आपला देश आणि आपले राज्य नक्कीच पुढे जाईल. सगळेच राजकारण्यांवर ढकलायला हवे, असे थोडेच आहे?

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPoliticsराजकारणBJPभाजपा